शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

माणूस घडविण्यासाठी

By admin | Updated: December 31, 2015 03:00 IST

नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या आराखड्यावरुन राज्यात बराच वादही झाला. मुलांच्या पाठीवर दप्तराचे व अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे,

- विजय बाविस्कर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या आराखड्यावरुन राज्यात बराच वादही झाला. मुलांच्या पाठीवर दप्तराचे व अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे, पण तरीही ‘शाळा आहे शिक्षण नाही’, अशी खंत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. शाळेबाहेर एक मोठी बिनभिंतीची शाळा असते, तेथे मुलांवर काय संस्कार होतात, ज्या पालकांसोबत मुले आपला मोठा काळ व्यतीत करतात त्या पालकांची मुलांबाबतची ‘पालकनीती’ काय, हे महत्त्वाचे मुद्दे सरकारी पटलावर अद्यापही फारसे महत्त्वाचे बनलेले नाहीत. ‘पालकत्व’ हा जिव्हाळ्याचा विषय असला, तरी तो दुर्लक्षितच आहे. पालकत्वासाठी सहसा कुणी शिक्षण-प्रशिक्षण घेत नाही. पालकनीती परिवार व ‘खेळघर’ नावाची संस्था यासाठी धडपडते आहे. मुलाला समजदार पालक मिळावा, हे या परिवाराचे ध्येय आहे. पुण्यातील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील ज्या मुलांच्या घरात शिक्षणाचे काहीही वातावरण नाही, धाकटी भावंडं सांभाळावी, हीच ज्यांच्याकडून पालकांची अपेक्षा होती, अशा मुलांसाठी हे खेळघर सुरू झालं. मुलांनी आनंदानं शिकावं, त्यासाठी पोषक वातावरण तयार करावं, सर्वात महत्त्वाचे मुले शिकण्यासाठी स्वत:हून राजी व्हावीत, तसेच त्यांच्या पालकांमध्येही पालकपण रुजावं, असा या संस्थेचा आग्रह आहे. त्यातून खेळघर ही संकल्पना बहरत गेली. अधिकाधिक जबाबदार पालक निर्माण करण्यासाठी संस्था कार्यशाळा घेते. जे पालक संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी संस्था हस्तपुस्तिकाच तयार करते. ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ हे खेळघराचे नवीन पुस्तक आले आहे. पालकांसाठी वाटाड्या म्हणून या पुस्तिका पूरक ठरतील, असे त्यांना वाटते. पण, हे काम एकट्या-दुकट्या संस्थेचे नाही. असे खेळघर प्रत्येक वस्तीत व घरोघर तयार व्हावे. पालकनीती प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. वंचितता ही फक्त आर्थिक, सामाजिकच असते असे नव्हे. काही वैशिष्ट्यपूर्ण शाळा व संस्था सोडता अनेक मुले संकल्पनापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे लहान-मोठे, गरीब-श्रीमंत अशी सर्व मुले एकत्र व आनंदाने शिकतील, अशी शिक्षणनीती, खेळघर आकारास यायला हवे. तरच, माणूस घडेल. सांगा कसं जगायचं...कण्हत कण्हत की गाणं म्हणत?...अशा शब्दातून जीवनानुभव श्रीमंत व समृद्ध करणारी भावकविता देणारे कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे आपल्यातून जाणे, हे चटका लावून जाणारे आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं सांगणाऱ्या पाडगावकरांनी जगण्यावर मनमुक्त प्रेम केले आणि आपल्यालाही करायला शिकविले. त्यांच्या अक्षरकिल्लीने सकारात्मक जगण्याची नवी दृष्टी मिळाली. पाडगावकरांचे पुण्याशीही अतूट नाते होते. पुणेकरांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांच्या कवितांना डोळ्यात, डोक्यात आणि हृदयात सामावून घेतले. त्यांच्या आविष्काराला उदंड प्रतिसाद कायम दिला. मनमुराद दाद दिली. त्यांचे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. ऋणानुबंध घट्ट होते. ते ‘अर्धे पुणेकर’ होते. सर्जनशील, संवेदनशील, सहवेदनेशी एकरूप होणारा हा कवी आज काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त पुणेकरही हळहळले आहेत. एक अक्षरनक्षत्र निखळले आहे. आनंदयात्री पाडगावकरांनी जो सकारात्मक जगण्याचा संदेश आपल्या कवितांमधून दिला, तो अंगीकारून पुढे जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. पाडगावकरांवर ओथंबून प्रेम करणाऱ्या पुण्याचे क्षितिज प्रगतीच्या दिशेने उजळते आहे. शहर ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. प्रगतीची ही घोडदौड सुरू असताना पाडगावकरांना अपेक्षित असलेले सकारात्मकतेचे बीज आणि माणूसपण जिवंत राहावे.. हीच नववर्षाच्या आनंदयात्रेसाठी शुभेच्छा!