शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

माणूस घडविण्यासाठी

By admin | Updated: December 31, 2015 03:00 IST

नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या आराखड्यावरुन राज्यात बराच वादही झाला. मुलांच्या पाठीवर दप्तराचे व अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे,

- विजय बाविस्कर नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसं असावं, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्याबाबतच्या आराखड्यावरुन राज्यात बराच वादही झाला. मुलांच्या पाठीवर दप्तराचे व अपेक्षांचे भले मोठे ओझे आहे, पण तरीही ‘शाळा आहे शिक्षण नाही’, अशी खंत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. शाळेबाहेर एक मोठी बिनभिंतीची शाळा असते, तेथे मुलांवर काय संस्कार होतात, ज्या पालकांसोबत मुले आपला मोठा काळ व्यतीत करतात त्या पालकांची मुलांबाबतची ‘पालकनीती’ काय, हे महत्त्वाचे मुद्दे सरकारी पटलावर अद्यापही फारसे महत्त्वाचे बनलेले नाहीत. ‘पालकत्व’ हा जिव्हाळ्याचा विषय असला, तरी तो दुर्लक्षितच आहे. पालकत्वासाठी सहसा कुणी शिक्षण-प्रशिक्षण घेत नाही. पालकनीती परिवार व ‘खेळघर’ नावाची संस्था यासाठी धडपडते आहे. मुलाला समजदार पालक मिळावा, हे या परिवाराचे ध्येय आहे. पुण्यातील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील ज्या मुलांच्या घरात शिक्षणाचे काहीही वातावरण नाही, धाकटी भावंडं सांभाळावी, हीच ज्यांच्याकडून पालकांची अपेक्षा होती, अशा मुलांसाठी हे खेळघर सुरू झालं. मुलांनी आनंदानं शिकावं, त्यासाठी पोषक वातावरण तयार करावं, सर्वात महत्त्वाचे मुले शिकण्यासाठी स्वत:हून राजी व्हावीत, तसेच त्यांच्या पालकांमध्येही पालकपण रुजावं, असा या संस्थेचा आग्रह आहे. त्यातून खेळघर ही संकल्पना बहरत गेली. अधिकाधिक जबाबदार पालक निर्माण करण्यासाठी संस्था कार्यशाळा घेते. जे पालक संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी संस्था हस्तपुस्तिकाच तयार करते. ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ हे खेळघराचे नवीन पुस्तक आले आहे. पालकांसाठी वाटाड्या म्हणून या पुस्तिका पूरक ठरतील, असे त्यांना वाटते. पण, हे काम एकट्या-दुकट्या संस्थेचे नाही. असे खेळघर प्रत्येक वस्तीत व घरोघर तयार व्हावे. पालकनीती प्रत्येक उंबऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. वंचितता ही फक्त आर्थिक, सामाजिकच असते असे नव्हे. काही वैशिष्ट्यपूर्ण शाळा व संस्था सोडता अनेक मुले संकल्पनापूर्ण शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे लहान-मोठे, गरीब-श्रीमंत अशी सर्व मुले एकत्र व आनंदाने शिकतील, अशी शिक्षणनीती, खेळघर आकारास यायला हवे. तरच, माणूस घडेल. सांगा कसं जगायचं...कण्हत कण्हत की गाणं म्हणत?...अशा शब्दातून जीवनानुभव श्रीमंत व समृद्ध करणारी भावकविता देणारे कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे आपल्यातून जाणे, हे चटका लावून जाणारे आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं सांगणाऱ्या पाडगावकरांनी जगण्यावर मनमुक्त प्रेम केले आणि आपल्यालाही करायला शिकविले. त्यांच्या अक्षरकिल्लीने सकारात्मक जगण्याची नवी दृष्टी मिळाली. पाडगावकरांचे पुण्याशीही अतूट नाते होते. पुणेकरांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. त्यांच्या कवितांना डोळ्यात, डोक्यात आणि हृदयात सामावून घेतले. त्यांच्या आविष्काराला उदंड प्रतिसाद कायम दिला. मनमुराद दाद दिली. त्यांचे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. ऋणानुबंध घट्ट होते. ते ‘अर्धे पुणेकर’ होते. सर्जनशील, संवेदनशील, सहवेदनेशी एकरूप होणारा हा कवी आज काळाच्या पडद्याआड गेल्याने समस्त पुणेकरही हळहळले आहेत. एक अक्षरनक्षत्र निखळले आहे. आनंदयात्री पाडगावकरांनी जो सकारात्मक जगण्याचा संदेश आपल्या कवितांमधून दिला, तो अंगीकारून पुढे जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. पाडगावकरांवर ओथंबून प्रेम करणाऱ्या पुण्याचे क्षितिज प्रगतीच्या दिशेने उजळते आहे. शहर ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. प्रगतीची ही घोडदौड सुरू असताना पाडगावकरांना अपेक्षित असलेले सकारात्मकतेचे बीज आणि माणूसपण जिवंत राहावे.. हीच नववर्षाच्या आनंदयात्रेसाठी शुभेच्छा!