शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

आजचा अग्रलेख: निर्णय तर घेतले; पण...; पायाभूत सुविधा प्रकल्प यावेत, ही खरी गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 06:12 IST

सरकारची सक्रियता निवडणुकीच्या चार महिने आधीपासूनच वाढायला लागते, हा अनुभव जुनाच

विधानसभा निवडणूक जवळ येत चालली, तसा राज्यातील शिंदे सरकारने एकामागून एक निर्णयांचा सपाटा लावला आहे. ‘लाडकी बहीण’सारखे थेट लाभ पोहोचविणारे निर्णय घेतले जात आहेत. सरकार कितीही म्हणत असले, तरी अशा निर्णयांना निवडणुकीच्या राजकारणाचा गंध असतोच. लाखो भगिनींना वर्षाकाठी अठरा हजार रुपये देणारी ही योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची तारीख जवळ येईल, तसा निर्णयांचा झपाटा वाढलेला असेल. आचारसंहिता लागू होण्याच्या चार-आठ दिवस आधीपासून एकाच दिवशी शंभर-दीडशे जीआर निघणे सुरू होईल.

सरकारची सक्रियता निवडणुकीच्या चार महिने आधीपासूनच वाढायला लागते, हा अनुभव जुनाच. त्यातच राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, निवडणूक जिंकण्यासाठी काय  करता येईल, याबाबत तिन्ही पक्षांच्या काही संकल्पना आहेत आणि त्यामुळे निर्णयांची एकच गर्दी झाली आहे. अशावेळी राज्याच्या तिजोरीची स्थिती हा विषय दुय्यम असतो. राज्य अडचणीत असले, तर कर्ज घेण्याचा मार्ग उपलब्ध आहेच आणि शिवाय घेतलेले कर्ज हे नियमांच्या मर्यादेतच घेतलेले आहे, असे समर्थनही सदैव उपलब्ध असल्याने चिंता करण्याचे कारण नाहीच.

मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ३७ हजार कोटी रुपये खर्चून सहा हजार किलोमीटरचे रस्ते डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय झाला, याचे समर्थन आणि टीका दोन्ही होऊ शकते. पायाभूत सुविधांचे जाळे विणताना ते कंत्राटदारधार्जिणे असू नये, अशी अपेक्षा आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय झाले की, त्याबाबतची शंका बळावते. वर्षानुवर्षे त्याच त्या रस्त्यांवर डांबरांचे लेप एकावर एक लावण्यात आले, पण पुन्हा खड्डे पडले ते पडलेच. या खड्ड्यांपासून कायमची मुक्ती म्हणून सिमेंट रस्त्यांचा पर्याय आता अनेक ठिकाणी स्वीकारला जात आहे. मात्र, या रस्त्यांना लागून एकात्मिक सुविधा (जसे नाल्या, पाण्याचा नीट निचरा होण्यासाठीच्या इतर सोयी) उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर सिमेंट रस्त्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होतात, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यातूनच, ‘आम्हाला आता सिमेंट रस्ते नकोत, त्यांच्यामुळे पूरपरिस्थिती व इतर अडचणी उद्भवतात’, असा सूर नागपुरातच उमटला आणि त्यासाठी लोक रस्त्यावरही उतरले.

आताचा निर्णय तर संपूर्ण राज्यासाठीचा आहे आणि थोडे थोडके नव्हे, तर सहा हजार किलोमीटरचे रस्ते हे सिमेंटचे होणार आहेत. या रस्त्यांमुळे जनजीवन कुठेही बाधित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी हमी राज्य सरकारने द्यायला हवी. डांबर लाॅबी, सिमेंट लॉबी, असे बरेचदा कानावर येत असते, अर्थातच लोकांना या लॉबींशी वगैरे देणेघेणे नाही. रस्त्यांचे स्वरूप बदलल्याने सामान्यांची डोकेदुखी वाढणार नाही, उलट त्यांना दर्जेदार रस्ते मिळतील. असेच होणार असेल, तर विरोध करण्याचे कारण नाही. समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून त्या गरजांची पूर्तता करणारे पायाभूत सुविधा प्रकल्प यावेत, ही खरी गरज आहे.

‘आज गरज नसली, तरी पुढची पन्नास वर्षे गृहित धरून आम्ही प्रकल्प आणत आहोत’, असे समर्थन राज्यकर्त्यांकडून अनेकदा केले जाते. या प्रकल्पाच्या उभारणीमुळे विस्थापित होणे, प्रकल्प उभारणी होत असताना, सर्व गैरसोयींचा सामना करणे हे सगळे आजच्या पिढीच्या नशिबी येते. विकासाच्या या अतिरेकी माऱ्यामुळे लोक कंटाळून गेले आहेत आणि ‘नको तो तुमचा विकास’, असा संताप ऐकू येऊ लागला आहे. याची गंभीर दखलही राज्यकर्त्यांनी घेणे आवश्यक आहे.

नगरपंचायतींच्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला राजकारणाची किनार आहेच. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे, अशा नगराध्यक्षांच्या जागी नव्याने निवडणूक सरकारला नको असणार. कारण, या निवडणुकीतील जय-पराजयाचे परिणाम विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतात. सरकारच्या या निर्णयाने विद्यमान नगराध्यक्षांना आयताच कार्यकाळ वाढवून मिळाला आहे.

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याच्या निर्णयाने या जमिनी दाबून बसलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचे चांगभले होईल. पण, त्याचवेळी निर्णयाची सकारात्मक अंमलबजावणी झाली, तर देवस्थानांना चांगली मिळकतदेखील होऊ शकेल. विदर्भ, मराठवाड्यात दुग्धविकासासाठी १४९ कोटी रुपयांची तरतूद या मागास भागांना दिलासा देणारी असली, तरी या पूर्वी अशाच पद्धतीने झालेल्या योजनांना यश येऊ शकलेले नव्हते. दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी-म्हशींचे वाटप वगैरे लोकांना खुश करणारे निर्णय याहीवेळी होऊ नयेत, इतकेच.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार