शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

तो पिलाने के लिए किसानोंका बहाना चाहिए!

By विजय दर्डा | Updated: January 31, 2022 05:47 IST

Wine sale: ...खरे तर, सरकारचे आभारच मानले पाहिजेत ! वाइन हे कृषी-उत्पादन तर आहे! पण, सारखे खुसपट काढणाऱ्या भाजपला हे कोण आणि कसे सांगणार?

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

शेतकऱ्यांच्या गालावर खुशीची लाली आणण्याची इतकी दूरदर्शी व्यवस्था केल्याबद्दल आपण सगळ्यांनी खरे म्हणजे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले पाहिजेत. शेतमालावर आधारित उत्पादन असलेली वाईन किराणा दुकाने, सुपर बाजार आणि मॉलमध्ये उपलब्ध करून देण्याचा आदेश सरकारने काढला आहे. हे फार म्हणजे फारच  उत्तम झाले म्हणायचे ! तुम्ही कशाला उगीचच आरडाओरडा करताय? हुजूर,  जरा समजून घ्या, आपली संस्कृती बदलतेय. किराणा दुकानातून सामान घेता घेता आपण मॉलमध्ये पोहोचलो. मग तिथे ॲग्रो-प्रॉडक्टस असायला पाहिजेत की नको? एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत कशी नाही? आपण मॉल संस्कृती स्वीकारली, मॅकडोनाल्ड, पिझ्झा स्वीकारले; मग आताच का उगा आरडाओरडा? जनतेचा इतका विचार करणाऱ्या सरकारचे मनापासून आभारच मानले पाहिजेत. हरिवंशराय बच्चन नाही का म्हणाले...मुसलमान औ’ हिंदू है दो  एक मगर उनका प्यालाएक मगर उनका मदिरालय,  एक मगर उनकी हालादोनो रहते एक न जब तक  मंदिर मस्जिद न जाते,बैर बढाते मंदिर मस्जीद  मेल कराती मधुशाला !इतकेच नव्हे;  हरिवंशराय बच्चन त्याही पुढे जाऊन म्हणतात,मेरे शव पर वह रोये, हो जिसके आंसू मे हाला आह भरे वो, जो हो सुरभीत  मदिरा पी कर मतवाला,दे मुझको कान्धा जिनके  पग मद डगमग होते हो और जलूं उस ठौर जहां पर  कभी रही हो मधुशाला ! 

मी तर, याच्याही पुढचा विचार करावा म्हणतो. सुपर मार्केटमध्ये सध्या संत्री-मोसंबी तर, मिळतातच. शेतकऱ्यांसाठी सरकारने आपले मन आणखी विशाल केले तर, मग मोसंबीपासून तयार झालेली ‘मोसंबी’ आणि नारिंगीपासून तयार झालेली ‘संत्रा’ही सुपर मार्केटमध्ये मिळू लागेल. मधुशालेत जाऊन शरमिंदा होण्याची वेळच कशाला कुणावर यावी?

‘मोसंबी’ घ्या, ‘मोसंबी’ प्या... ‘संत्रा’ घ्या, ‘संत्रा’ प्या... तशी तर, इलायचीही येते. हे सगळेच ॲग्रो प्रॉडक्टस आहेत ना ! याचा फायदा (वाईनरिज मार्फत) शेतकऱ्याला मिळावा असा मोठा विचार सरकारने केला असेल. या निर्णयामुळे कारखान्यांना फायदा होईल म्हणून ओरडणाऱ्यांना तेथे काम करणाऱ्या हजारो हातांना मजुरी मिळेल हे का, दिसत नाही? 

- आता ॲग्रो प्रॉडक्टस नेहमीच चांगले असतात हे भाजपवाल्यांना कोण समजावून सांगणार? ते आपले उगीचच विनाकारण विरोध करत सुटले आहेत ! आता भाजपवाले ‘या असल्या गोष्टीं’ना हात लावत नाहीत- अगदी चुकून स्पर्शसुद्धा  करत नाहीत,  हे आपण जाणतो. पण, म्हणून उगीचच  महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केल्याचा ओरडा करायचा, ही  काय बकवास आहे? या भाजपवाल्यांना ना शेतकऱ्यांचा फायदा सहन होतो, ना पिणाऱ्यांचा ! अरे भाजपवाल्यांनो, बच्चन साहेबांच्या या ओळी कधी तुमच्या नजरेखालून गेल्या आहेत का? ते म्हणतात.. बिना पिये जो मधुशालाको  बुरा कहे वो मतवाला पी जाने पार उसके मूंह पर  पड जायेगा ताला,दास-द्रोहियो दोनो में है  जीत सुरा की, प्याले कीविश्वविजयिनी बनकर  जग में आई मेरी मधुशालाहे बच्चन साहेबही अजबच म्हणायचे! मधुशाला लिहून गेले. इतक्या वर्षांनंतर सरकारने त्यांचे ऐकले, पण हे भाजपवाले काही त्यांचे ऐकायला तयार नाहीत. अरे मित्रांनो, आपली संस्कृती सोमरसाची आहे. भैरवनाथाचा प्रसाद कधी चाखला नाही का तुम्ही? 

आपले सिनेमेही तेच तर शिकवतात. ‘रोटी, कपडा और मकान’चे ते गाणे आठवते का? त्यात नायिका म्हणते... ‘पंडितजी मेरे मरनेके बाद, गंगाजल के बदले थोडी सी मदिरा टपका देना...!’ आता अशात आपले सरकार किराणा दुकानात वाइन विकण्याच्या गोष्टी करतेय, तर त्यात वाईट काय आहे? अरे हो, मला एक घटना आठवली. प्रफुल्लभाई नागरी उड्डयन मंत्री होते. त्याकाळात मी, राहुल गांधी, राजीव शुक्ला आणि अन्य काही जण नागरी उड्डयन खात्याच्या एका संसदीय समितीचे सदस्य होतो. एक दिवस असा प्रस्ताव आला की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षापासून तयार झालेली वाइन देशांतर्गत विमानात प्रवाशांना देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल. नुसता विषय निघाला आणि काही लोक भडकले. प्रस्तावाचे समर्थक म्हणत होते, वाइनमध्ये केवळ ७-८ टक्के मद्यार्क असतो. त्यापेक्षा जास्त तर खोकल्याच्या औषधात असतो ! सर्वांनी म्हटले, की ते ॲग्रोप्रॉड्क्ट आहे जरूर, पण आपली प्रतिमा काय होईल? आपण अनुमती दिलीत तर पिणाऱ्यांच्या नजरेतून आपण उतरू. चोरून लपून तर पितोच; पण ‘प्या खुशाल’ असे खुल्लम खुल्ला म्हणणेही किती बेशरमीची गोष्ट होईल ! - एका मिनिटात हा प्रस्ताव फेटाळला गेला.

- आता पाहा ना ! गांधींची जन्मभूमी गुजरात आणि त्यांची कर्मभूमी सेवाग्राममध्ये दारूबंदी आहे. पण सगळ्या जगाला माहिती आहे, की गुजरातेत सर्वाधिक दारू विकली जाते. मद्यसम्राट रईसला कोण ओळखत नाही? ‘रईस’ हा प्रसिद्ध सिनेमा त्याच्यावरच तर निघाला. तरी गांधींच्या नावावर पाखंड चालूच ! दारू विक्री खरोखर बंद होईल तेव्हा खरे ! वर्धा आणि चंद्रपुरात दारूविक्री बंद केली तर चोरून विकणाऱ्यांची चांदी झाली. नकली, विषारी दारू लोकांचे जीव घेऊ लागली. चंद्रपुरात तर दारूबंदी उठवावी लागली. हुजूर, एक सांगू? - केवळ समाजाची परिपक्वता आणि सभ्यताच हे चक्र थांबवू शकते. दारूचा तिचा तिचा असा महिमा आहे, हे कसे नाकारणार? 

जवळपास सर्व राज्यांचा तो उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. त्यात भाजपशासीत राज्येही आहेतच. निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी दारू काय करते हे तर आपण जाणतोच. राजकीय पक्ष खुल्या हाताने ही भेट मतदारांना देतात.

दारूचा महिमा गाण्यात कवी गीतकारांनी आजवर पुष्कळ कागद काळे केले... कोणा कोणाची नावे घेऊ? एक खासदार तर भरपूर पिऊन संसदेत मोठे भाषणही देऊन गेले. गायकांनीही महिमा गायला. पंकज उधास तर असा सूर लावतात... ‘हुई महन्गी बहुत शराब की थोडी थोडी पिया करो..!’ आमचे सरकार तर हे सारेच अवघड गणित सोपे करण्याचा प्रयत्न करते आहे. चालू द्या ! सर्वांना मिळो, भरपूर मिळो... सारे तृप्त होवोत ! तेव्हा आपण मोकळ्या मनाने सरकारचे आभार मानावेत हे बरे !

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र