शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

तो पिलाने के लिए किसानोंका बहाना चाहिए!

By विजय दर्डा | Updated: January 31, 2022 05:47 IST

Wine sale: ...खरे तर, सरकारचे आभारच मानले पाहिजेत ! वाइन हे कृषी-उत्पादन तर आहे! पण, सारखे खुसपट काढणाऱ्या भाजपला हे कोण आणि कसे सांगणार?

-  विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

शेतकऱ्यांच्या गालावर खुशीची लाली आणण्याची इतकी दूरदर्शी व्यवस्था केल्याबद्दल आपण सगळ्यांनी खरे म्हणजे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभार मानले पाहिजेत. शेतमालावर आधारित उत्पादन असलेली वाईन किराणा दुकाने, सुपर बाजार आणि मॉलमध्ये उपलब्ध करून देण्याचा आदेश सरकारने काढला आहे. हे फार म्हणजे फारच  उत्तम झाले म्हणायचे ! तुम्ही कशाला उगीचच आरडाओरडा करताय? हुजूर,  जरा समजून घ्या, आपली संस्कृती बदलतेय. किराणा दुकानातून सामान घेता घेता आपण मॉलमध्ये पोहोचलो. मग तिथे ॲग्रो-प्रॉडक्टस असायला पाहिजेत की नको? एवढी साधी गोष्ट तुम्हाला समजत कशी नाही? आपण मॉल संस्कृती स्वीकारली, मॅकडोनाल्ड, पिझ्झा स्वीकारले; मग आताच का उगा आरडाओरडा? जनतेचा इतका विचार करणाऱ्या सरकारचे मनापासून आभारच मानले पाहिजेत. हरिवंशराय बच्चन नाही का म्हणाले...मुसलमान औ’ हिंदू है दो  एक मगर उनका प्यालाएक मगर उनका मदिरालय,  एक मगर उनकी हालादोनो रहते एक न जब तक  मंदिर मस्जिद न जाते,बैर बढाते मंदिर मस्जीद  मेल कराती मधुशाला !इतकेच नव्हे;  हरिवंशराय बच्चन त्याही पुढे जाऊन म्हणतात,मेरे शव पर वह रोये, हो जिसके आंसू मे हाला आह भरे वो, जो हो सुरभीत  मदिरा पी कर मतवाला,दे मुझको कान्धा जिनके  पग मद डगमग होते हो और जलूं उस ठौर जहां पर  कभी रही हो मधुशाला ! 

मी तर, याच्याही पुढचा विचार करावा म्हणतो. सुपर मार्केटमध्ये सध्या संत्री-मोसंबी तर, मिळतातच. शेतकऱ्यांसाठी सरकारने आपले मन आणखी विशाल केले तर, मग मोसंबीपासून तयार झालेली ‘मोसंबी’ आणि नारिंगीपासून तयार झालेली ‘संत्रा’ही सुपर मार्केटमध्ये मिळू लागेल. मधुशालेत जाऊन शरमिंदा होण्याची वेळच कशाला कुणावर यावी?

‘मोसंबी’ घ्या, ‘मोसंबी’ प्या... ‘संत्रा’ घ्या, ‘संत्रा’ प्या... तशी तर, इलायचीही येते. हे सगळेच ॲग्रो प्रॉडक्टस आहेत ना ! याचा फायदा (वाईनरिज मार्फत) शेतकऱ्याला मिळावा असा मोठा विचार सरकारने केला असेल. या निर्णयामुळे कारखान्यांना फायदा होईल म्हणून ओरडणाऱ्यांना तेथे काम करणाऱ्या हजारो हातांना मजुरी मिळेल हे का, दिसत नाही? 

- आता ॲग्रो प्रॉडक्टस नेहमीच चांगले असतात हे भाजपवाल्यांना कोण समजावून सांगणार? ते आपले उगीचच विनाकारण विरोध करत सुटले आहेत ! आता भाजपवाले ‘या असल्या गोष्टीं’ना हात लावत नाहीत- अगदी चुकून स्पर्शसुद्धा  करत नाहीत,  हे आपण जाणतो. पण, म्हणून उगीचच  महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केल्याचा ओरडा करायचा, ही  काय बकवास आहे? या भाजपवाल्यांना ना शेतकऱ्यांचा फायदा सहन होतो, ना पिणाऱ्यांचा ! अरे भाजपवाल्यांनो, बच्चन साहेबांच्या या ओळी कधी तुमच्या नजरेखालून गेल्या आहेत का? ते म्हणतात.. बिना पिये जो मधुशालाको  बुरा कहे वो मतवाला पी जाने पार उसके मूंह पर  पड जायेगा ताला,दास-द्रोहियो दोनो में है  जीत सुरा की, प्याले कीविश्वविजयिनी बनकर  जग में आई मेरी मधुशालाहे बच्चन साहेबही अजबच म्हणायचे! मधुशाला लिहून गेले. इतक्या वर्षांनंतर सरकारने त्यांचे ऐकले, पण हे भाजपवाले काही त्यांचे ऐकायला तयार नाहीत. अरे मित्रांनो, आपली संस्कृती सोमरसाची आहे. भैरवनाथाचा प्रसाद कधी चाखला नाही का तुम्ही? 

आपले सिनेमेही तेच तर शिकवतात. ‘रोटी, कपडा और मकान’चे ते गाणे आठवते का? त्यात नायिका म्हणते... ‘पंडितजी मेरे मरनेके बाद, गंगाजल के बदले थोडी सी मदिरा टपका देना...!’ आता अशात आपले सरकार किराणा दुकानात वाइन विकण्याच्या गोष्टी करतेय, तर त्यात वाईट काय आहे? अरे हो, मला एक घटना आठवली. प्रफुल्लभाई नागरी उड्डयन मंत्री होते. त्याकाळात मी, राहुल गांधी, राजीव शुक्ला आणि अन्य काही जण नागरी उड्डयन खात्याच्या एका संसदीय समितीचे सदस्य होतो. एक दिवस असा प्रस्ताव आला की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षापासून तयार झालेली वाइन देशांतर्गत विमानात प्रवाशांना देण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल. नुसता विषय निघाला आणि काही लोक भडकले. प्रस्तावाचे समर्थक म्हणत होते, वाइनमध्ये केवळ ७-८ टक्के मद्यार्क असतो. त्यापेक्षा जास्त तर खोकल्याच्या औषधात असतो ! सर्वांनी म्हटले, की ते ॲग्रोप्रॉड्क्ट आहे जरूर, पण आपली प्रतिमा काय होईल? आपण अनुमती दिलीत तर पिणाऱ्यांच्या नजरेतून आपण उतरू. चोरून लपून तर पितोच; पण ‘प्या खुशाल’ असे खुल्लम खुल्ला म्हणणेही किती बेशरमीची गोष्ट होईल ! - एका मिनिटात हा प्रस्ताव फेटाळला गेला.

- आता पाहा ना ! गांधींची जन्मभूमी गुजरात आणि त्यांची कर्मभूमी सेवाग्राममध्ये दारूबंदी आहे. पण सगळ्या जगाला माहिती आहे, की गुजरातेत सर्वाधिक दारू विकली जाते. मद्यसम्राट रईसला कोण ओळखत नाही? ‘रईस’ हा प्रसिद्ध सिनेमा त्याच्यावरच तर निघाला. तरी गांधींच्या नावावर पाखंड चालूच ! दारू विक्री खरोखर बंद होईल तेव्हा खरे ! वर्धा आणि चंद्रपुरात दारूविक्री बंद केली तर चोरून विकणाऱ्यांची चांदी झाली. नकली, विषारी दारू लोकांचे जीव घेऊ लागली. चंद्रपुरात तर दारूबंदी उठवावी लागली. हुजूर, एक सांगू? - केवळ समाजाची परिपक्वता आणि सभ्यताच हे चक्र थांबवू शकते. दारूचा तिचा तिचा असा महिमा आहे, हे कसे नाकारणार? 

जवळपास सर्व राज्यांचा तो उत्पन्नाचा मोठा स्त्रोत आहे. त्यात भाजपशासीत राज्येही आहेतच. निवडणूक काळात मतदानाच्या आदल्या दिवशी दारू काय करते हे तर आपण जाणतोच. राजकीय पक्ष खुल्या हाताने ही भेट मतदारांना देतात.

दारूचा महिमा गाण्यात कवी गीतकारांनी आजवर पुष्कळ कागद काळे केले... कोणा कोणाची नावे घेऊ? एक खासदार तर भरपूर पिऊन संसदेत मोठे भाषणही देऊन गेले. गायकांनीही महिमा गायला. पंकज उधास तर असा सूर लावतात... ‘हुई महन्गी बहुत शराब की थोडी थोडी पिया करो..!’ आमचे सरकार तर हे सारेच अवघड गणित सोपे करण्याचा प्रयत्न करते आहे. चालू द्या ! सर्वांना मिळो, भरपूर मिळो... सारे तृप्त होवोत ! तेव्हा आपण मोकळ्या मनाने सरकारचे आभार मानावेत हे बरे !

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र