शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख : तिशी ओलांडली तरी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाच देणारे ‘पर्मनंट बेकारां’चे जत्थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 07:58 IST

नोकरी मिळविण्याच्या संघर्षात तरुणांचे उमेदीचे वय निघून जाते. अर्धे वय संपलेल्या या तरुणांना व्यवस्था स्वीकारेल अशीही स्थिती नाही.

कलीम अजीम, सामाजिक विषयाचे चिंतक, पुणे

महाराष्ट्र सरकारने राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध पदांच्या परीक्षेसाठी वयोमर्यादेत एका वर्षाची शिथिलता घोषित केली आहे. जाहिरात प्रकाशित करण्यासाठी लागलेल्या विलंबामुळे काही परीक्षार्थींची वयोमर्यादा ओलांडली होती. अशा लाखो अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या शेवटच्या टर्मसाठी दिलासा मिळाला आहे. १ जानेवारी ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत पदभरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच याचा लाभ मिळेल. इतरांना जुने नियम लागू असतील.

तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी आणि ‘गट ब’ या पदांमध्ये राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकारी पदांसाठी ही परीक्षा होते. ही अतिशय कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक स्पर्धक परीक्षेला बसतात. त्या तुलनेत जागांची संख्या हजारांच्या आत असते. अनुत्तीर्ण झालेले स्पर्धक पुन्हा नव्याने परीक्षा देण्यासाठी दुसऱ्या जाहिरातीची वाट पाहतात. जागा नियमित निघाली की, स्पर्धक परीक्षा देऊ शकतो. अन्यथा त्यासाठी वाट पाहावी लागते. 

राज्य सेवेच्या परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा अनारक्षित जागांसाठी ३८, तर आरक्षित जागांसाठी ४३ मानली जाते. सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा शेकडो विद्यार्थ्यांना होईल. पण अनुत्तीर्ण स्पर्धकांचं काय? त्यांना पुन्हा कुठल्याही परीक्षेला बसता येणार नाही.

केंद्र व राज्य सरकारच्या पदभरतीच्या वयोमर्यादेत कमालीची तफावत जाणवते. सैन्य व पोलिस भरती किंवा इतर विभागाच्या भरतीची वयोमर्यादा खूप कमी असते. पूर्वी आयसीएसची वयोमर्यादा १८ ते २३ दरम्यान होती. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने ३२ वर्षांच्या मर्यादेची अट घातली आहे. शिवाय परीक्षेची किमान संख्यादेखील नेमून दिलेली आहे.

परीक्षा किती वेळा देऊ शकता, याची राज्य सेवा आयोगाकडे कुठलीही अट नाही. विविध विभागांतील शासकीय नोकर भरतीतील अनियमितता, अपारदर्शी भरतीप्रक्रिया, संस्थात्मक भ्रष्टाचार आणि सततच्या परीक्षा घोटाळ्यांच्या स्थितीत वाढते वय व किमान वयोमर्यादेच्या अटींविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. नोकरी मिळविण्याच्या संघर्षात तरुणांचे उमेदीचे वय निघून जाते. अर्धे वय संपलेल्या या तरुणांना व्यवस्था स्वीकारेल अशीही स्थिती नाही. मग या तरुणांनी करायचं काय? गुणवत्तेच्या घसरणीमुळे दरवर्षी ‘पर्मनंट बेकारां’चे जत्थे बाहेर पडतात. पुढे जाऊन एम्प्लॉयमेंट बाजारातील प्रचंड स्पर्धेशी दोन हात आहेतच.

एक विद्यार्थी चाळिशीपर्यतं नोकरीसाठी संघर्ष करतोय, तर दुसरा त्याचा बॅचमेट कौशल्याधारित शिक्षण घेऊन तिशीत चांगल्या ठिकाणी कामाला आहे. १० वर्षांत स्थिरस्थावर होऊन मोठ्या हुद्द्यावर पोहोचतो. पण पहिला तरुण अजून विद्यार्थीच आहे. एकीकडे दशकाचा प्रकांड अनुभव, सुबत्ता, संपन्नता, यशस्विता, बँक बॅलन्स, स्थिरता तर दुसरीकडे नैराश्य, बकालता, दारिद्र्य व अनिश्चितता अशा दोन प्रसंगांना वर्तमानकाळ सामोरा जात आहे.

एकीकडे वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी व दुसरीकडे ‘लॅटरल एंट्री’ने प्रशासकीय सेवेत थेट भरती. एकीकडे प्रचंड श्रम करून स्पर्धेतून बाद होण्याची चिन्हे, तर दुसरीकडे राजकीय प्रभावातून थेट प्रशासकीय नोकरी. या सांस्कृतिक संघर्षात सर्वसामान्य तरुणांचा निभाव कसा लागायचा? 

सार्वजनिक क्षेत्राचे झपाट्याने होणारे खासगीकरण, पाहता-पाहता शासकीय नोकऱ्या व त्यातील आरक्षित जागा आटत जाणं! दुसरीकडे कौशल्याधारित शिक्षण घेऊनही अनेक जण स्पर्धा परीक्षेच्या बाजारात स्वत:ला हरवून बसलेले दिसतात. शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत उमेदीच्या वयाला गंजत ठेवलं आहे. सरकारच्या अनास्थेमुळे नोकरी बाजारात साचलेपण आलेलं दिसते. अशा स्थितीत शासकीय नोकरीची दीर्घकालीन प्रतीक्षा आणि कौशल्य आधारित रोजगार या दोन बाबी पुन्हा पडताळून पाहण्याची गरज जाणवते.

अपयशानंतर प्रत्येकवर्षी अभ्यास म्हणजे वाढत्या वयाकडे दुर्लक्ष! वाढलेलं वय लक्षात येताच मानसिक अस्थिरता स्वाभाविक आहे. अशावेळी काळ आणि वेळेचे व्यवस्थापन अनिवार्य होऊन जाते.

देशातील सामाजिक संरचना भेदाभेदाची राहिली आहे. त्यात आर्थिक स्थिरतेची प्रस्थापना करताना व्यावहारिक दृष्टिकोन बाळगणे अपरिहार्य ठरते. म्हणजेच शासकीय नोकरीसाठीचा सांस्कृतिक संघर्ष सरत्या वयात गुरफटून जाता कामा नये.  अशा स्थितीत प्रतीक्षेची वयोमर्यादा एक जंजाळ ठरू शकते. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होऊ पाहात असताना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी नुसत्या घोषणा देऊन भागणार नाही तर व्यवस्था परिवर्तनाचे प्रयत्न हवे आहेत. शासन व नागरिक दोन्ही घटकांनी याविषयी विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा