शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Maharashtra Election 2019: मतदारांनो, घराबाहेर पडा व मतदान करा!

By विजय दर्डा | Updated: October 21, 2019 06:22 IST

प्रMaharashtra Election 2019: त्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे.

- विजय दर्डा

प्रत्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. त्यांची प्रकर्षाने आठवण येण्याचे कारण असे की, भारतीय लोकशाहीचे पहिले मतदार म्हणून त्यांची नोंद केली गेली आहे. खरे तर भारतात लोकसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. पण त्या वेळी जोरदार हिमवृष्टीमुळे दुर्गम भागांतील लोकांना मतदान करणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेत त्या निवडणुकीचे हिमाचल प्रदेशमधील मतदान पाच महिने आधीच म्हणजे ऑक्टोबर १९५१ मध्ये घेण्यात आले होते. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी श्याम सरन नेगी यांनी सर्वप्रथम मतदान केले व त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते कटाक्षाने मतदान करत आले आहेत. मला वाटते की, आपणही सर्वांनी नेगीजींचे अनुकरण करायला हवे. काहीही झाले तरी अवश्य मतदान करायलाच हवे!

मताधिकार ही लोकशाहीमधील तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, हे लक्षात घ्या. केवळ तुमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी नव्हे, तर देशातील लोकशाहीला बळकटी देण्यासाठीही तुम्ही मतदान करणे गरजेचे असते. आपल्या आशा-आकांक्षांची पूर्तता करेल व सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करेल, असे प्रतिनिधी तुम्ही निवडून द्यायचे असतात. अनेक लोक राजकारणाबद्दल नकारात्मक भूमिका बाळगतात व त्या चिखलात पडण्याची इच्छा नाही, असे सांगतात. हीच सबब सांगत ते मतदान करायला जात नाहीत. तुम्ही मतदान न करणे याचा अर्थ देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी होण्याच्या हक्कावर तुम्ही पाणी सोडता. मग तक्रार करण्याचा अधिकारही तुम्ही गमावून बसता. आपला देश असा असावा, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडून पाठविणे हे तुमचे कर्तव्य आहे. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीच शासन करत असतात. मग तुम्ही मतदानास नकार कसा काय देऊ शकता? राज्यघटनेने तुम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे तेव्हा मतदान करणे हे तुमचे कर्तव्यही ठरते.

सन १९८८ पर्यंत भारतात मतदानासाठी किमान वयाची मर्यादा २१ वर्षे होती. परंतु शिक्षणाचा वाढता प्रसार व लोकांमधील वाढती जागृती लक्षात घेऊन राज्यघटनेत ६१ वी दुरुस्ती करून मतदानाचे किमान वय १८ वर्षे असे कमी केले गेले. तरुण पिढीचा लोकशाहीमधील सहभाग वाढावा, हेही यामागचे एक कारण होते. त्यानंतर तरुण पिढी निवडणुकांमध्ये अधिकाधिक हिरिरीने भाग घेत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मतदान करणाऱ्या युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. तरीही आपले महाराष्ट्र राज्य या बाबतीत अव्वल राज्यांमध्ये नसावे, याची मला नेहमीच खंत वाटते.

एरवी महाराष्ट्र हे एक विकसित राज्य म्हणून ओळखले जाते. पण मतदानाची आकडेवारी पाहिली तर पहिल्या १० अव्वल राज्यांमध्येही आपला क्रमांक लागत नाही. महाराष्ट्रात सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होत असते. याउलट नागालँडसारखे छोटे व भौगोलिकदृष्ट्या अधिक दुर्गम असलेले राज्य सरासरी ८७-८८ टक्के मतदान नोंदवत असते. लक्षद्वीप, त्रिपुरा, दादरा व नगर हवेली, पुद्दुचेरी, आसाम या ठिकाणीही मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांच्या पार जाते. मग महाराष्ट्रात असे भरघोस मतदान का होत नाही, असा प्रश्न पडतो. बहुसंख्य मतदारांची उदासीनता व आळस हे याचे सरळ-साधे कारण आहे. आपण मतदान केले किंवा नाही केले तरी त्याने काय फरक पडणार आहे, असा लोक विचार करतात. परंतु हा विचार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. प्रत्येकानेच असा विचार केला तर शासनव्यवस्थेतील सामान्य नागरिकांचा सहभाग कमी होईल व लोकशाहीचे प्रातिनिधिक स्वरूपही तेवढेच कमी होईल. जो आपले योग्य प्रतिनिधित्व करेल असे वाटेल त्याला मत द्या, पण मतदान अवश्य करा.

बºयाच लोकांना नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर जावे लागल्याने निवडणुकीच्या दिवशी मतदान करता येत नाही, ही गोष्टही मला खटकते. हल्लीचा काळ तंत्रज्ञान व इंटरनेटचा आहे. त्यामुळे मतदार कुठेही असला तरी त्याला मतदान करता येईल, अशी व्यवस्था निवडणूक आयोगाने करायला हवी. या नाही तरी पुढील निवडणुकीत तरी अशी सोय उपलब्ध व्हायलाच हवी.

जगात अनेक देशांत मतदान सक्तीचे आहे. यात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम, ब्राझिल, सिंगापूर, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचा समावेश आहे. मतदान न करणाºयास तेथे दंड केला जातो. भारतातही याची फारशी चर्चा नसली तरी अशी मागणी केली जात आहे. मला असे वाटते की, नागरिकांमध्ये एवढी जागरूकता यायला हवी की सक्ती न करताही त्यांनी मतदान करावे. ही जबाबदारी आता तरुण पिढीने पार पाडावी लागेल. आपल्या आजूबाजूचे लोक मतदान करतील यासाठी त्यांनी अवश्य पुढाकार घ्यावा. जे मतदानासाठी गेले नसतील त्यांना जाण्यासाठी उद्युक्त करावे. आज प्रत्येकाने घराबाहेर पडून न चुकता मतदान करावे, असा माझा आग्रह आहे.

(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान