शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मतदारांनो, घराबाहेर पडा व मतदान करा!

By विजय दर्डा | Updated: October 21, 2019 06:22 IST

प्रMaharashtra Election 2019: त्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे.

- विजय दर्डा

प्रत्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. त्यांची प्रकर्षाने आठवण येण्याचे कारण असे की, भारतीय लोकशाहीचे पहिले मतदार म्हणून त्यांची नोंद केली गेली आहे. खरे तर भारतात लोकसभेची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. पण त्या वेळी जोरदार हिमवृष्टीमुळे दुर्गम भागांतील लोकांना मतदान करणे शक्य होणार नाही, हे लक्षात घेत त्या निवडणुकीचे हिमाचल प्रदेशमधील मतदान पाच महिने आधीच म्हणजे ऑक्टोबर १९५१ मध्ये घेण्यात आले होते. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी श्याम सरन नेगी यांनी सर्वप्रथम मतदान केले व त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते कटाक्षाने मतदान करत आले आहेत. मला वाटते की, आपणही सर्वांनी नेगीजींचे अनुकरण करायला हवे. काहीही झाले तरी अवश्य मतदान करायलाच हवे!

मताधिकार ही लोकशाहीमधील तुमची सर्वात मोठी शक्ती आहे, हे लक्षात घ्या. केवळ तुमच्या मतदारसंघाच्या विकासासाठी नव्हे, तर देशातील लोकशाहीला बळकटी देण्यासाठीही तुम्ही मतदान करणे गरजेचे असते. आपल्या आशा-आकांक्षांची पूर्तता करेल व सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यासाठी प्रयत्न करेल, असे प्रतिनिधी तुम्ही निवडून द्यायचे असतात. अनेक लोक राजकारणाबद्दल नकारात्मक भूमिका बाळगतात व त्या चिखलात पडण्याची इच्छा नाही, असे सांगतात. हीच सबब सांगत ते मतदान करायला जात नाहीत. तुम्ही मतदान न करणे याचा अर्थ देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी होण्याच्या हक्कावर तुम्ही पाणी सोडता. मग तक्रार करण्याचा अधिकारही तुम्ही गमावून बसता. आपला देश असा असावा, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडून पाठविणे हे तुमचे कर्तव्य आहे. लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीच शासन करत असतात. मग तुम्ही मतदानास नकार कसा काय देऊ शकता? राज्यघटनेने तुम्हाला मतदानाचा हक्क दिला आहे तेव्हा मतदान करणे हे तुमचे कर्तव्यही ठरते.

सन १९८८ पर्यंत भारतात मतदानासाठी किमान वयाची मर्यादा २१ वर्षे होती. परंतु शिक्षणाचा वाढता प्रसार व लोकांमधील वाढती जागृती लक्षात घेऊन राज्यघटनेत ६१ वी दुरुस्ती करून मतदानाचे किमान वय १८ वर्षे असे कमी केले गेले. तरुण पिढीचा लोकशाहीमधील सहभाग वाढावा, हेही यामागचे एक कारण होते. त्यानंतर तरुण पिढी निवडणुकांमध्ये अधिकाधिक हिरिरीने भाग घेत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मतदान करणाऱ्या युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. तरीही आपले महाराष्ट्र राज्य या बाबतीत अव्वल राज्यांमध्ये नसावे, याची मला नेहमीच खंत वाटते.

एरवी महाराष्ट्र हे एक विकसित राज्य म्हणून ओळखले जाते. पण मतदानाची आकडेवारी पाहिली तर पहिल्या १० अव्वल राज्यांमध्येही आपला क्रमांक लागत नाही. महाराष्ट्रात सरासरी ६० टक्क्यांच्या आसपास मतदान होत असते. याउलट नागालँडसारखे छोटे व भौगोलिकदृष्ट्या अधिक दुर्गम असलेले राज्य सरासरी ८७-८८ टक्के मतदान नोंदवत असते. लक्षद्वीप, त्रिपुरा, दादरा व नगर हवेली, पुद्दुचेरी, आसाम या ठिकाणीही मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांच्या पार जाते. मग महाराष्ट्रात असे भरघोस मतदान का होत नाही, असा प्रश्न पडतो. बहुसंख्य मतदारांची उदासीनता व आळस हे याचे सरळ-साधे कारण आहे. आपण मतदान केले किंवा नाही केले तरी त्याने काय फरक पडणार आहे, असा लोक विचार करतात. परंतु हा विचार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. प्रत्येकानेच असा विचार केला तर शासनव्यवस्थेतील सामान्य नागरिकांचा सहभाग कमी होईल व लोकशाहीचे प्रातिनिधिक स्वरूपही तेवढेच कमी होईल. जो आपले योग्य प्रतिनिधित्व करेल असे वाटेल त्याला मत द्या, पण मतदान अवश्य करा.

बºयाच लोकांना नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर जावे लागल्याने निवडणुकीच्या दिवशी मतदान करता येत नाही, ही गोष्टही मला खटकते. हल्लीचा काळ तंत्रज्ञान व इंटरनेटचा आहे. त्यामुळे मतदार कुठेही असला तरी त्याला मतदान करता येईल, अशी व्यवस्था निवडणूक आयोगाने करायला हवी. या नाही तरी पुढील निवडणुकीत तरी अशी सोय उपलब्ध व्हायलाच हवी.

जगात अनेक देशांत मतदान सक्तीचे आहे. यात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम, ब्राझिल, सिंगापूर, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचा समावेश आहे. मतदान न करणाºयास तेथे दंड केला जातो. भारतातही याची फारशी चर्चा नसली तरी अशी मागणी केली जात आहे. मला असे वाटते की, नागरिकांमध्ये एवढी जागरूकता यायला हवी की सक्ती न करताही त्यांनी मतदान करावे. ही जबाबदारी आता तरुण पिढीने पार पाडावी लागेल. आपल्या आजूबाजूचे लोक मतदान करतील यासाठी त्यांनी अवश्य पुढाकार घ्यावा. जे मतदानासाठी गेले नसतील त्यांना जाण्यासाठी उद्युक्त करावे. आज प्रत्येकाने घराबाहेर पडून न चुकता मतदान करावे, असा माझा आग्रह आहे.

(चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड, लोकमत समूह)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान