शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

Maharashtra Election 2019: टक्का घसरला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 06:12 IST

Maharashtra Election 2019: राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले

राज्य विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान काही अपवाद वगळता शांततेने पार पडले. एकूण मतदान ६० टक्क्यांएवढे झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. ते अर्थातच अपेक्षेहून कमी आहे. जनतेला मतदानाविषयी फारसा उत्साह नसल्याचे हे चिन्ह आहे. ‘आपण निवडून येणारच’ या आविर्भावातला सत्तारूढ पक्ष आणि आपण काहीही केले तरी विजयी होऊ शकणार नाही वा ईव्हीएम आपल्याला विजय मिळू देणार नाही, याचा विरोधकांना वाटणारा विश्वास यामुळेही हे मतदान कमी झाल्याची शक्यता आहे. तेवढीच महत्त्वाची आणखी एक बाब ही की, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी विभागात अगदी मुंबईतसुद्धा ते कमी झाले. नेते काही म्हणत असले तरी जनतेची मतदानाविषयीची अनास्था सांगणारी ही बाब आहे.

निवडणुकीच्या निकालांचे आगाऊ अंदाज बांधणारे व सांगणारे कमी मतदानाचा सत्तारूढांना लाभ होतो, असे सांगतात. मात्र ते दरवेळी खरे असेलच असे नाही. या निवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झंझावाती दौरे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही अनेक ठिकाणी सभा घेऊन पक्षाचा दणक्यात प्रचार केला. काश्मीरमधील रद्द केलेले ३७0 कलम आणि पाकिस्तानवर आणलेला जागतिक दबाव व केंद्र-राज्य सरकारने केलेली जनताभिमुख कामे यावर त्यांनी भर दिला. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार हेही त्यांनी ठासून सांगितले. वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र या जोडीने खूपच चांगले काम केले आहे, हे पंतप्रधानांनी स्वत: व अमित शहा यांनी अनेक प्रचारसभेत अधोरेखित केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेक प्रचारसभा घेतल्या.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघाबाहेर जाता आले नाही, हेही खरेच. काही अपवाद वगळता शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांचाच प्रचार केला. कणकवली मतदारसंघात नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना भाजपने दिलेली उमेदवारी शिवसेनेला आवडली नाही. त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार देऊन त्यांना जोरदार आव्हान दिले. येथील निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसचे राहुल गांधी आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे वगळता दुसरे कोणतेही राष्ट्रीय नेते महाराष्ट्रात आले नाहीत. ज्यांच्या हाती तिकिटांचे वाटप होते, ते पुढारीही ‘निवडून येणारा’ उमेदवार देण्याऐवजी जातीपातीच्या व नातेसंबंधाच्या राजकारणात जास्तीचे अडकलेले दिसले. या निवडणुकीत जनतेला खरा जाणवला तो चेहरा शरद पवारांचा होता. वयाच्या ८० व्या वर्षी या अनुभवी नेत्याने जो उत्साह दाखवला व राज्याच्या अनेक भागांत जी दमदार भाषणे दिली, ती सर्वाधिक लोकांच्या लक्षात राहिली. त्यांच्या पक्षातले अनेक वजनदार नेते पक्ष सोडून सत्तेच्या आश्रयाला गेले, पण पवारांनी एकट्याच्या जिद्दीवर पक्षाची धुरा वाहून नेली. राज्यात पुन्हा एकदा युतीचे सरकार येईल, अशी चर्चा जनमानसात होती.

मात्र त्यांच्या जागा कमी होतील, त्यातही शिवसेना तिच्या बऱ्याच जागा गमावील, असेही त्यांना वाटत होते. जाणकारांच्या मते, विदर्भ व मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा वाढतील, तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आपल्या जागा वाढवता येतील. सत्तेचा दावा मात्र त्यांच्या आघाडीला करता येणार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात किंवा त्यांची युथ काँग्रेसही या निवडणुकीत कुठे दिसली नाही. विरोधकांकडे प्रचाराची साधनेही अल्प प्रमाणात दिसली. पण तरीही शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राज्यात परिवर्तन होणारच, हे जोरकसपणे सांगत राहिले. पण त्यांचा पूर्वेतिहास लोकांना ठाऊक असल्याने जनतेचा त्यांना खुला पाठिंबा दिसला नाही.

एक मात्र खरे की, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यास सरकार काहीसे अपुरे पडते आहे, हेही लपून राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर जनता कोणाला कौल देते, हे पाहण्यासाठी आपल्याला २४ तारखेची वाट पाहावी लागेल. ‘आपण निवडून येणारच’ या आविर्भावातला सत्तारूढ पक्ष आणि आपण काहीही केले तरी विजयी होऊ शकणार नाही वा ईव्हीएम आपल्याला विजय मिळू देणार नाही, याचा विरोधकांना वाटणारा विश्वास हे मुद्दे या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान