शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

किशोरीच्या आत्महत्येमागील वेदना

By सुधीर लंके | Updated: September 16, 2018 10:16 IST

किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे.

किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे. किशोरी ही अहमदनगर तालुक्यातील कापूरवाडी या खेड्यातील तरुणी. काकडे हे मराठा कुटुंब. किशोरीचे वडील शेतकरी आहेत. ते स्वत: इतिहास विषयातील पदवीधर आहेत. भावासोबत एकत्र राहतात. एकत्र कुटुंब. शेती आणि दूध धंद्यावर हे कुटुंब उदरनिर्वाह करते. किशोरीने आत्महत्या का केली? हे तिच्या कुटुंबाला अगोदर उलगडले नव्हते. पोलिसांनीही ते सांगितले नव्हते. नंतर तिच्या वसतीगृहातील खोलीत चिठ्ठी सापडल्याचे समोर आले. ‘चांगले गुण मिळूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे,’ असे किशोरीने त्यात लिहिले आहे.

चिठ्ठीतील तपशील पोलिसांनी जाहीर केलेला नाही. तिच्या वडिलांना ही चिठ्ठी पोलिसांकडून वाचायला मिळाली. ‘माझ्या एकटीला एका वर्षासाठी कॉलेजचे शुल्क, वसतीगृहाचे शुल्क, क्लासची फी मिळून ४२ हजार रुपये लागले. घरात माझ्यासह सख्खे-चुलत मिळून सात भावंडे आहेत. एवढ्या भावंडांचा खर्च आमचे कुटुंब कसे करणार?’ असा हिशेब तिने या चिठ्ठीत मांडल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. शेतकºयाच्या मुलीने मांडलेला हा हिशेब अत्यंत वेदनादायी आहे. तो राज्यकर्त्यांनी व समाजधुरिणांनी समजावून घ्यावा असा आहे.किशोरी ही गुणवान होती. वडिलांनी मुलाला कला शाखेत तर तिला आवर्जून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. कोणत्या मुलाने कशात करिअर करावे याबाबत या घरात स्वातंत्र्य दिसते. तिच्या घरी जाऊन तिचा शालेय संग्रह पाहिला की तिची गुणवत्ता दिसते. ‘धरु नका मुलाची आशा, डोळ्यासमोर ठेवा पी.टी. उषा’ हे तिच्या एका वहितील बोधवाक्य आहे. अगदी चौथीपासूनची शाळेची गुणपत्रके तिने एका फाईलमध्ये व्यवस्थित जतन करुन ठेवली आहेत. ती पाहताना हृदय गलबलते. ‘खेळताना सांघिक भावना आहे’. ‘वाचन, चित्र काढणे व गाणे ऐकणे आवडते’, ‘आपले म्हणणे नेमके व कल्पकतेने मांडते’, हे तिच्याबद्दलचे तिच्या शिक्षकांचे अभिप्राय या गुणपत्रकांमध्ये दिसतात. अनेक बोधकथांची तिने सुबक कात्रण वही केली आहे. त्यात ‘शेतकºयांचे भांडण’ ही देखील एक बोधकथा आहे. चित्रकलेची तिला आवड होती. बैलपोळ्याची अनेक चित्रे तिने काढली होती. आत्महत्येच्या अगोदरच्या दिवशी तिने गावाकडे येऊन बैलपोळा साजरा केला. स्वत: पुरणपोळी केली. बैलांच्या जोडीसोबत फोटो काढला. बैलांसह घरच्या सर्वांना गोडधोड खाऊ घातले व दुसºया दिवशी जगाचा निरोप घेतला. शिवाजी महाराजांची चित्रेही तिने रेखाटली होती. ‘लोकमत’ राजधानी दिल्लीत मराठी भाषेतून सुरु झाला याचे तिलाही अप्रूप होते. आपल्या संग्रहात तिने यादिवसाचा अंक जपून ठेवलेला दिसतो.

किशोरीच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त झाली. असे प्रसंग घडल्यानंतर अशी हळहळ व्यक्त होते. पण, त्याची कारणमीमांसा होत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून ही आत्महत्या झाल्याचे समोर आले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाºयांचा आकडा हा तीसच्या पुढे गेला आहे. आत्महत्या हा आरक्षणावरील पर्याय नाही. कारण, व्यक्तीच राहणार नसेल तर आरक्षणाचा फायदा कोणाला? ही बाब आंदोलकांनी व सरकारनेही तरुणांच्या मनावर बिंबविण्याची आवश्यकता आहे.दुसरी बाब आहे, सरकारी नितीची. घटनात्मक अडचणींमुळे आरक्षण देता येत नाही असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु किशोरीचा प्रश्न हा महाविद्यालयीन शुल्काचा होता. विनाअनुदान तत्व नसते तर कदाचित तिने हे पाऊल उचलले नसते. अनुदानित-विनाअनुदानित, सरकारी -कंत्राटी असे भेद सरकारने उभे केले आहेत. जातीय भेदांइतकेच हे भेदही समाजाचे शोषण करतात. विनाअनुदानित शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करणाºयाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवावी लागते हे नगर जिल्ह्यातीलच चित्र आहे. विनाअनुदान तत्वाच्या नावाखाली काही संस्था, कॉलेज जो पैसा मिळवितात त्याचा हिशेबही एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. किशोरीचा बळी हा केवळ आरक्षणाचा बळी नाही. तो विनाअनुदान तत्वाचाही बळी आहे. तरुणांमध्ये आज जी मोठी चीड आहे त्याला हे धोरणही कारणीभूत आहे.

विनाअनुदान तत्त्व संपुष्टात आणण्यासाठी कुठलाही घटनात्मक अडसर नाही. ‘विनाअनुदान’ हा एक शब्द काढला तरी मोठा भेदाभेद संपेल. मात्र, या मूळ मुद्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होते आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात भेदाची पहिली ठिणगी या भेदाने पडते. खासगी शाळांचे पीक जोमाने बहरते आहे हीही समाजात एक नवी भिंत उभी राहते आहे. कारण अशा शाळा कुणासाठी मर्यादित झाल्या आहेत हे सर्वश्रूत आहे. रयत शिक्षण संस्थेत बहुजन व सर्वसामान्यांची मुले शिकावीत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अपार कष्ट उपसले. या ज्ञानदानाच्या कामासाठी लक्ष्मीबार्इंचे मंगळसूत्र विकले. त्यांच्याच संस्थेतील मुलीने शिक्षणाचा आर्थिक हिशेब मांडत आत्महत्या करावी हे कुणाचे अपयश आहे? कर्मवीरांचा वारसा सांगणाºया सर्वांनीच याबाबत चिंतीत व्हायला हवे. किशोरी ही शेतकरी व सर्वच गरीब वर्गाचे भांडण कोणाशी आहे हे सांगून गेली. ही आत्महत्या शिक्षणक्षेत्राच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.(लेखक हे ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत)

टॅग्स :Suicideआत्महत्याEducationशिक्षण