शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?

By अतुल कुलकर्णी | Updated: November 27, 2024 06:54 IST

वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल!

अतुल कुलकर्णीसंपादक, लोकमत, मुंबई

विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकमत’ला मुलाखत दिली होती. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार होऊ शकतो का?’- असे विचारले असता, “आम्ही एकत्र येऊ नये म्हणून आतले आणि बाहेरचे दोघेही प्रयत्न करत आहेत. जगभरात एकमेकांचे वर्षानुवर्षाचे दुश्मन वाद मिटवून एकत्र येऊ शकतात पण उद्धवना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते. भाऊ नाही...” असे उत्तर राज यांनी दिले होते. याच काळात “एक है, तो सेफ है” अशी घोषणा दिली गेली. ही घोषणा भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांसाठी दिली असली तरी निकालानंतरच्या परिस्थितीत ती उद्धव आणि राज यांना तंतोतंत लागू पडते आहे. त्यासाठी दोन्ही भावांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागेल.

दोघांनी एकत्र यावे म्हणून या आधी ज्यांनी कोणी प्रयत्न केला त्यात त्यांचा स्वार्थ होता. कधी कधी परिस्थिती तुम्हाला नाइलाजाने का होईना बदलायला भाग पाडते. रिपाइं - भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप, काँग्रेस - शिवसेना हे भिन्न विचारांचे, भिन्न भूमिकांचे पक्ष राजकीय गरजेपोटी शहाणपण दाखवत एकत्र आले. या सगळ्यांनी सत्तेसाठी स्वतःच्या वैचारिक भूमिकांसोबत तडजोड केली. उद्धव आणि राज यांच्यात तर भावाभावाचे नाते आहे. दोघांवर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आहे. दोघांचेही ते दैवत आहेत. त्यामुळे दोघे एकत्र आले तर त्यांचा फायदा होईल की नाही माहिती नाही; पण राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा नक्की मिळेल. 

दोन भावांमध्ये पटले नाही म्हणूनच राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ सोडली. ९ मार्च २००६ रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष काढला. लगेच २००७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांत त्यांचे ६ नगरसेवक निवडून आले. २००९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा १३ आमदार विजयी करून राज यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आणले. नाशिक महापालिका ताब्यात आली. त्यामुळे राज यांची हवा तयार झाली. २०१४ मध्ये मोदींची लाट आली. त्यात राज यांचा एकमेव आमदार निवडून आला. २०१४ ची निवडणूक जाहीर झाली आणि यांचे पुत्र अमितचे गंभीर आजारपण सुरू झाले. त्यामुळेही पाच वर्षे राज यांना पक्षाकडे लक्ष देता आले नाही. २०१९च्या विधानसभेत पुन्हा एकच आमदार निवडून आला. त्याच काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. अमितचे आजारपण सुरूच होते. त्याही स्थितीत राज यांनी २०१४ला महाराष्ट्राची ब्लू प्रिंट आणली. मात्र ब्लू प्रिंट आली त्याचदरम्यान भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाला. ब्लू प्रिंटवर कुठे चर्चाच झाली नाही.

पुढे २०१७ ला मुंबई डोळ्यापुढे ठेवून राज यांनी ‘मुंबई शहर आपल्याला कसे अत्याधुनिक करायचे आहे’ याचा आराखडा मांडला. जावेद अख्तर, आमिर खान, सलीम खान, रितेश देशमुख अशी बडी मंडळी व्यासपीठावर होती. त्यावेळी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राज यांचे फक्त ७ नगरसेवक निवडून आले. त्यातले ६ नगरसेवक २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी पळवले. अमितचे आजारपण पाच-सहा वर्षे चालू होते. त्यादरम्यान एका मुलाखतीत राज यांनी आपण अंगठ्या, माळा घालणे बंद केले आहे. आपला देवावर विश्वास राहिला नाही अशीही खंत व्यक्त केली होती. त्यामुळे पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष झाले. २००६ ला पहिल्यांदा बांधायला घेतलेला पक्ष १४ वर्षांनी म्हणजे २०१९ ला त्यांनी पुन्हा नव्याने बांधायला सुरुवात केली पण बांधणी नीट झालीच नाही. आता पुन्हा ६ वर्षांनी २०२४ च्या विधानसभा निकालानंतर राज यांच्यावर नव्याने पक्ष उभा करण्याची वेळ आली आहे.

यादरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या विधानसभा निवडणुकीत एका ठाकरेंची उंची कमी करताना दुसरे ठाकरे वाढू नयेत यासाठी कोणी, कसे व किती प्रयत्न केले, याची कल्पना राज ठाकरे यांना असेलच. आपल्याशी चर्चा न करता राज यांनी माहीमची जागा परस्पर उभी केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत सांगितले होते. त्यावर “काही गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ती जर ठेवली नाही, तर राजकारण हे बदलत असते. बदलत्या काळात पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्हालाही काही गोष्टींचा विचार करता येईल,” असे उत्तर राज यांनी दिले होते. दुसरीकडे आपला आणि आपल्या पक्षाचा कोणी व कसा वापर करून घेतला, याचीही जाणीव राज यांना निकालाने करून दिली असेल. या अशा आठवणी सोबत घेऊन नव्याने वाटचाल करण्याची वेळ राज यांच्यावर आली आहे.

ही पार्श्वभूमी जशी राज ठाकरे यांची आहे, तशीच उद्धव ठाकरेंचीही आहे. दोघेही स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहणे पसंत करतात. त्यातल्या त्यात राज ठाकरे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटतात. मायकल जॅक्सनच्या संगीतापासून वर्तमानपत्राच्या सौंदर्यशास्त्रापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास तर आहेच, शिवाय या सगळ्या विषयांवर मनमोकळ्या गप्पा करायला त्यांना आवडते. त्यांच्याकडे कलासक्त वृत्ती, स्वतःची सौंदर्यदृष्टी आहे. राज कॅरीकेचर करण्यात माहीर आहेत. त्यातून त्यांना मिळालेली दृष्टी राजकारणात उपयोगी पडू शकते. उद्धव उत्तम फोटोग्राफर आहेत. लेन्समधून त्यांना जे पाहता येते, ते इतरांना दिसत नाही. दोघांनाही या गोष्टींचा फायदा होईल की नुकसान, याचा हिशोब त्यांनीच मांडायचा आहे. उद्धव-राज यांच्यासोबत वय आहे. आदित्य-अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. गरज फक्त दोघांनीही झोकून देत महाराष्ट्र पिंजून काढण्याची आहे. या चौघांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडेल.

प्रत्येक मराठी माणसाकडे बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेमाचे रोखीचे बॉण्ड आहेत. गावागावात जाऊन ते बॉण्ड जमा करून घेण्याचीच काय ती गरज आहे.ज्या भाजपचे १९८० मध्ये केवळ १४ आमदार होते, त्या भाजपला १३२ आमदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ४४ वर्षे लागली. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही “मी थांबणार नाही. लढणार आहे. तरुण पिढीचा विश्वास वाढविणार आहे. उद्याच मी कराडला निघालोय.” असे शरद पवार ८३ व्या वर्षी म्हणू शकतात, मग राज ठाकरे यांना कशाची आडकाठी आहे..? राजकारणात कधीच कोणी संपत नसतो. तसेच अशक्य ते शक्य करून दाखविण्याचा खेळ म्हणजे राजकारण असे म्हणतात, ते काही उगीच नव्हे!    atul.kulkarni@lokmat.com

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा