शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपची सेनेवर कुरघोडी आणि एमआयएमची मुसंडी रंगत आणणार

By सुधीर महाजन | Updated: September 28, 2019 22:50 IST

अशोक चव्हाण, संभाजी पाटील, मुंडे बहिण-भावाकडे लक्ष

- सुधीर महाजन 

मराठवाड्यात भाजपने शिवसेनेवर केलेली कुरघोडी हे गेल्या विधानसभा निवडणुकीचे फलित म्हणता येईल. सेनेची केवळ पीछेहाटच झाली नाही, तर बालेकिल्ला समजला जाणाºया औरंगाबादमधील एक जागा ‘एमआयएम’ने हिसकावून घेतली. ही ओहोटी सेनेला रोखता आली नाही आणि आता लोकसभेची औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमने तर सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत खैरेंसारखा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की सेनेवर आली, यावरूनच सेनेच्या अवस्थेची कल्पना येते आणि आता या पार्श्वभूमीवर सेना निवडणुकीला सामोरी जात आहे. पाच वर्षांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी केली. 

या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, या लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढतात का याकडे लक्ष आहे, तर बीडमधील राजकारणाला भाऊबंदकीने ग्रासले आहे. तेथे पंकजा आणि धनंजय या बहीण-भावाच्या लढतीकडे साºया राज्याचे लक्ष असेल. 

अशीच लढत बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये अपेक्षित आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी यांच्यामुळे एमआयएमला औरंगाबादेत सेनेचा पराभव करता आला; पण आता विधानसभेसाठी ही आघाडी तुटल्याने औरंगाबाद शहरातील राजकीय समीकरण बदलू शकते. 

 

प्रचाराचे मुद्दे

1. दुष्काळ हा प्रमुख प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत.

 

2. पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.

 

3. पिण्याचे पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अपुºया पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे. 

 

मराठवाडा

साधनसामुग्रीची समृद्धता आणि नियोजनावर हुकूम अंमलबजावणी हे भाजपत प्रकर्षाने जाणवते. 

एकूण जागा 46

भाजप 18

शिवसेना 10

काँग्रेस01

राष्टÑवादी 08

एमआयएम 01

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक