शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

महापोर्टल, जिल्हा बँका भरतीत घोळ : राज्यात ‘व्यापम’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 03:31 IST

Mahaportal : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी स्वतंत्रपणे भरती न करता शासनाच्या महाआयटी विभागाला आपल्या वर्ग ३ व ४ च्या जागांचा तपशील कळवायचा. त्यानंतर महाआयटी विभागामार्फत या सर्व कार्यालयांसाठी एकाचवेळी परीक्षा घेतली जाईल, असे हे धोरण होते.

- सुधीर लंके (आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)

‘मेगाभरती’मुळे सरकारी नोकऱ्यांतील ७२ हजार पदे भरली जातील असे स्वप्न दाखविले गेले. ‘महापरीक्षा’ पोर्टलमुळे लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची भरती एकाचवेळी ऑनलाइन व पारदर्शीपणे होईल, याबाबतही मोठी जाहिरातबाजी व दावे झाले. प्रत्यक्षात या पोर्टलची जी लफडी समोर आली ती गंभीर आहेत. राज्याच्या सहकार विभागाने जिल्हा सहकारी बँकांच्या नोकरभरतीबाबतही असेच आदर्शवत धोरण ठरविले होते. मात्र, त्याही धोरणाचा चोळामोळा केला गेला आहे. १९ सप्टेंबर २०१७ रोजी ‘महापरीक्षा’ पोर्टलचा आदेश निघाला होता.

राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी स्वतंत्रपणे भरती न करता शासनाच्या महाआयटी विभागाला आपल्या वर्ग ३ व ४ च्या जागांचा तपशील कळवायचा. त्यानंतर महाआयटी विभागामार्फत या सर्व कार्यालयांसाठी एकाचवेळी परीक्षा घेतली जाईल, असे हे धोरण होते. त्यानुसार राज्यात तलाठी, ज्युनिअर ऑडिटर, वनरक्षक अशा विविध पदांची भरती एकाचवेळी झाली. जिल्हा परिषदांतील पदांसाठीही असे एकत्रित अर्ज मागविले गेले होते. 

या पोर्टलमागील भूमिका चांगली दिसते. ऑनलाइन अर्ज व ऑनलाइन परीक्षेमुळे लाखो उमेदवारांचा वेळ, खर्च वाचणार होता. झटपट प्रक्रिया होणार होती. अहमदनगरमधील तलाठीपदासाठी थेट चंद्रपूरमधूनच परीक्षा देता येत होती. मात्र, या परीक्षेत काही केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडल्याची शंका अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केलेल्या चौकशीमुळे पुढे आली आहे. तलाठी भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यात ८४ जागा होत्या. परीक्षेनंतर नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २३६ उमेदवारांना जेव्हा कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले तेव्हा त्यांना यातील अनेक उमेदवारांच्या अर्जातील व परीक्षागृहातील छायाचित्रे, स्वाक्षऱ्या संशयास्पद दिसल्या. 

‘महाआयटी’कडे जेव्हा या उमेदवारांचे परीक्षा देतानाचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज मागितले गेले तेव्हा काही उमेदवारांचे फुटेजच मिळालेले नाही. काही उमेदवारांच्या जागेवर डमी उमेदवार बसलेले दिसले. यातील अनेक उमेदवारांनी इतर जिल्ह्यांतील केंद्रांवरून नगरसाठी परीक्षा दिली. म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती एका जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. महाआयटी व या भरतीचे काम पाहिलेल्या युएसटी ग्लोबल (मुंबई) या संस्थेकडे सर्व उमेदवारांचे परीक्षा देतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसणे हे गंभीर आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या तक्रारीनंतर ‘महापरीक्षा पोर्टल’ बंद झाले. मात्र, या पोर्टलद्वारे झालेली भरती योग्य आहे का? याची सखोल तपासणी सरकारने केलेली नाही.असाच घोटाळा जिल्हा सहकारी बँकांच्या भरतीत आहे. जिल्हा सहकारी बँकांत राज्यात सुमारे २४ हजार पदे आहेत. ही भरतीप्रक्रिया कशी राबवायची याबाबत सहकार विभाग, नाबार्ड यांनी नियुक्त केलेल्या ‘एसएलटीएफ’ समितीने तयार केलेले धोरण राज्य सरकारने एप्रिल २०१६ मध्ये स्वीकारले. त्यानुसार बँकिंग भरतीचा अनुभव असलेल्या खासगी संस्थेमार्फत ही प्रक्रिया पारदर्शीपणे व राजकीय हस्तक्षेपाशिवाय राबविण्याबाबत नियमावली ठरली. मात्र, या धोरणाचा गैरफायदा घेत सांगली, सातारा व अहमदनगर बँकेच्या भरतीत गडबडी झाल्या.

अहमदनगरला तर ‘नायबर’ नावाच्या संस्थेने परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासताना ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बंद ठेवली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांत फेरफार केले गेले. दुसऱ्याच एजन्सीला परस्पर भरतीचे काम दिले. पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक निवडले गेले. हे सर्व सहकार विभागाच्या चौकशीतच निष्पन्न झाले. मात्र, पुढे या भरतीच्या संशयास्पद उत्तरपत्रिकांची ‘फॉरेन्सिक’ तपासणी राज्याच्या माजी सहकार आयुक्तांनी एका खासगी एजन्सीकडून करून घेत पद्धतशीरपणे हा घोटाळा दडपला.

विद्यमान सहकार सचिव, सहकार आयुक्त व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील याबाबत हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून आहेत. आलेल्या तक्रारींवर ते चौकशीच करत नाहीत. ‘नायबर’ ही स्वयंसेवी संस्था असताना ते बँकांची भरतीप्रक्रिया कशी करू शकतात? इथपासूनच प्रश्न आहेत. नगर जिल्हा बँकेच्या भरतीत अण्णा हजारे यांची सरकारकडे लेखी तक्रार आहे; पण आता अण्णाही शांत आहेत व सरकारही. सरकारने धोरण ठरवूनही जिल्हा सहकारी बँकांच्या भरतीत असे चित्र असेल तर इतर खासगी बँकांत सगळे रान मोकळेच आहे.

गुणवंतांना डावलून भरतीत इतरांची वर्णी लागणार असेल तर भरती प्रक्रियेला अर्थच उरत नाही. मध्य प्रदेशात ‘व्यापम’ भरती घोटाळा झाला. महापोर्टल व जिल्हा बँकांच्या भरतीतही ‘व्यापम’ आहे का?  हे तपासायला हवे.  यंत्रणेने सरकारचे धोरण मोडीत काढणे म्हणजे एकप्रकारे सरकारचीच फसवणूक आहे. त्यामुळे सरकारने खोलात जाणे आवश्यक आहे.

टॅग्स :jobनोकरी