शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘लम्पी’मुळे पशुवैद्यकीय अडचणी उजागर

By किरण अग्रवाल | Updated: September 18, 2022 11:21 IST

Lumpy exposes veterinary problems : कोरोनाकाळात एकूणच आरोग्य विभागातील उणिवा व मर्यादा ज्यापद्धतीने पुढे आल्या, त्याचप्रमाणे लम्पीमुळे पशुवैद्यक क्षेत्रातील अडचणीकडे लक्ष वेधले गेले आहे.

- किरण अग्रवाल 

जनावरांवरील लम्पी रोगामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शासनाकडून लसीकरणाला वेग देण्यात आला आहे, त्याचसोबत गावोगावी पशुचिकित्सकांची उपलब्धता होईल हे बघणे गरजेचे आहे. संसर्ग वाढण्यापूर्वीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

 कोणतेही संकट हे त्रासदायीच असते हे खरे, पण भविष्याच्यादृष्टीने ते धडा देऊन जाणारेही असते. कोरोनाच्या बिमारीतून मनुष्य बाहेर पडत नाही तोच ‘लम्पी’च्या लपेट्यात पशुधन आल्याने बळीराजाची चिंता वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे, कारण यानिमित्ताने पशुवैद्यक क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष व त्यातील उणिवा उजागर होत आहेत.

 कोरोनाच्या संकटाने जनजीवन धास्तावले होते, तसे ‘लम्पी’मुळे शेतकरी वर्ग काळजीत पडला आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा खरा सोबती बैल असो, की दूध दुभत्या गायी-म्हशी; गोठ्यातील या जनावरांकडे पशुधन म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. हे पशुधनच लम्पीमुळे धोक्यात आले आहे. जनावरांना होणारा हा त्वचारोग संसर्गजन्य असल्याने यासंदर्भातील भीती वाढून गेली आहे. पशुसंवर्धन विभाग व राज्य शासनानेही याबाबत तातडीने पावले उचलत लसीकरणाच्या मोहिमेला वेग दिला आहे, राज्यस्तरावर यासंदर्भातील संपर्कासाठी मंत्रालयात समन्वय कक्षही स्थापन करण्यात आला असून, प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी कार्यदलाचे गठनही केले गेले आहे, पण कोरोनाकाळात एकूणच आरोग्य विभागातील उणिवा व मर्यादा ज्यापद्धतीने पुढे आल्या, त्याचप्रमाणे लम्पीमुळे पशुवैद्यक क्षेत्रातील अडचणीकडे लक्ष वेधले गेले आहे.

 अकोला जिल्ह्यात सुमारे सातशेपेक्षा अधिक जनावरांना लम्पीची लागण झाली असून, या जनावरांच्या संपर्कातील १५ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातही अकोल्यापेक्षा दोन-चारशे कमी अधिक संख्येच्या फरकाने जनावरांना लागण झाली आहे. हे प्रमाण आज मर्यादित आहे, त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून तातडीने जागरूक होणे व जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे बनले आहे. अमरावती विभागात सुमारे तीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून, त्यातील सुमारे एक लाख जनावरांचे लसीकरण पूर्णही करण्यात आले आहे. पशुवैद्यक विभागाने यासंदर्भात तत्परतेने पावले उचलली आहेत; मात्र अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी लसींचा पुरवठा झालेला नसल्याची तक्रार आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी पशुवैद्यक दवाखाने असले तरी तेथे पशुचिकित्सक नाहीत. या विभागातील पदभरतीचा अनुशेष बाकी असल्याने बहुतेक ठिकाणचा कारभार हा प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू आहे. मनुष्यासाठीच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात जिथे सुविधा व अधिकाऱ्यांची वानवा असते, तिथे जनावरांसाठीच्या दवाखान्यांकडे कोण लक्ष पुरविणार? एकेका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे एकापेक्षा अधिक गावे आहेत म्हटल्यावर तेदेखील कुठे कुठे लक्ष पुरविणार? त्यामुळे काही ठिकाणी ग्रामपंचायतींनाच लसीकरणासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. तेव्हा या क्षेत्राकडे झालेले दुर्लक्ष या संकटाच्या निमित्ताने दूर होणे अपेक्षित आहे.

 सध्या शेतीचा हंगाम जोरात आहे. शेतामधील कामांपासून बळीराजाला उसंत नाही. अशा काळात पशुधनावर आलेल्या संकटाने बळीराजा बेजार झालेला दिसत आहे. कुटुंबातील कोरोनाग्रस्तांची अवस्था पाहून जसा प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलेला दिसे, तसे आता जनावरांवर आलेल्या या संकटाने बळीराजाचा जीव तूट तूट तुटताना दिसत आहे. तेव्हा लम्पीच्या लपेट्यातून पशुधनाची सोडवणूक करण्यासाठी अधिक गतिमानतेने कार्यरत होण्याची गरज आहे. यासाठी प्रशासनाने प्रसंगी सक्तही व्हायला हवे. लम्पीच्या संसर्गाची शक्यता बघता गुरांच्या आठवडे बाजारावर निर्बंध असताना खामगावमध्ये असा बाजार भरलाच कसा, याचीही चौकशी व्हायला हवी.

 सारांशात, लम्पीचा संसर्ग वाढण्यापूर्वीच त्याबाबतच्या जन-जागरणासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने गावातील गोठ्या-गोठ्यांपर्यंत पोहोचण्याची व जनावरांच्या लसीकरणाची मोहीम तीव्र केली जाणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगAkolaअकोला