शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

हरवलेली रसिकता

By admin | Published: October 20, 2016 6:11 AM

आपली कल्पकता, विचार आणि कौशल्य यांचा उपयोग करून माणूस निसर्गातील सौंदर्याला आपल्यात आणून आपल्या कलाकृती घडवीत असतो.

आपली कल्पकता, विचार आणि कौशल्य यांचा उपयोग करून माणूस निसर्गातील सौंदर्याला आपल्यात आणून आपल्या कलाकृती घडवीत असतो. माणूस हा सौंदर्याचा आस्वादही घेऊ शकतो आणि कलेच्या आविष्कारातून सौंदर्याची निर्मितीही करू शकतो. त्यातून काव्य, नाटक, संगीत, चित्र जन्म घेते. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित कलांचा निर्भेळ आस्वाद घेण्याची वृत्ती म्हणजे रसिकता होय. सौंदर्य हे निर्मितीने जेवढे फुलते त्यापेक्षाही रसिकतेच्या आस्वादाने अधिक खुलते. रसिकत्व ही परमेश्वराने मानवाला दिलेली एक मोठी देणगीच आहे. थोडे वर्तमान स्थितीकडे पाहिल्यास लक्षात येईल, की आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत आणि सारखे धावत सुटलेल्या स्पर्धेच्या युगात आपण ही रसिकता हरवून बसलो आहोत. ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टान्त दिला आहे. वाघेवीण नादु। नेही कवणाही सादु।का अपुष्पी मकरंदु।न लभे जैसा।। फुलांचा सुगंध दरवळायला लागला की, आपोआप भ्रमर जमा होऊ लागतात. वाद्ये लावली आहेत, गाण्याची सुंदर मैफल रंगत आहे, गाण्याचे स्वर दूरवर पसरले आहेत, स्वरांचा अभिषेक होतो आहे, गाण्यातला प्रत्येक शब्द स्वरांनी नटला आहे, पण त्याचा आनंद घेण्यासाठी रसिकतेचा मात्र अभाव आहे. अशा सुरेल संगीताच्या मैफलीला रसिकांची म्हणावी तशी उपस्थिती लाभली नाही तर? फुलांच्या सुगंधासाठी भ्रमराला आवतण द्यावे लागत नाही. इथे बऱ्याच वेळा मैफलीसाठी माणसे जमवावी लागतात. कित्येक वेळा व्याख्यानमालेत श्रोत्यांअभावी वक्त्याला थांबावे लागते. उत्तम वक्ता असला तरी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याशिवाय भाषण रंगणार नाही. मग चांगल्या वक्त्याला आणावे की नाही या विवंचनेत सापडणारे संयोजक आपणास नेहमी पहायला मिळतात. रसिकतेने ऐकणारा श्रोता लाभणार नसेल तर वक्त्याचा विचारसंवाद इथेच थांबेल.रंगभूमीवरील उत्तम उत्तम नाटकेही रसिकांच्या अभावी कमी कमी होत आहेत. ‘माझ्या कानावर चहूबाजुंनी चांगले विचार पडोत’ असे म्हणणारी श्रवण संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. ‘वेळ नाही काय करावे’ हे कारण त्यासाठी पुढे केले जात आहे. जीवन जगताना ज्यातून आनंद मिळवायचा ती आनंदाची शिदोरीच आपणापासून दुरावत चालली आहे. तर दुसरीकडे प्रदूषण, ताण-तणाव, समस्या, कलह, जीवघेण्या स्पर्धा यांच्यामागे धावता धावता जगणेही क्लेशदायी होऊन बसले आहे. कोणत्याही प्राप्त स्थितीत जीवनाचा आनंद घेण्यासाठी काही वेळ बाजूला ठेवायलाच हवा. रसिकतेची अनुभूती हाच आनंद आहे. हरवलेली रसिकता हेच दु:ख होय. काकासाहेब कालेलकरांनी म्हटले होते. जगातील खरे दु:ख हे निर्धनता नसून निरसता आहे.-डॉ. रामचंद्र देखणे