शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : नरेंद्र मोदींच्या या विजयाची सात कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 04:30 IST

टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.

- बरखा दत्त((ज्येष्ठ पत्रकार )याही वेळी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असे मला नेहमीच वाटत होते व मी तसे वारंवार लिहिलेही होते. पण सन २०१४ मध्ये झाले तसेच झाले व इतर सर्व पत्रकारांप्रमाणे मलाही या विजयाचे स्वरूप एवढे मोठे असेल व मोदींना लोकांमध्ये एवढा मोठा सुप्त पाठिंबा आहे, याची मलाही कल्पना आली नव्हती.निवडणुकीच्या काळात मी ज्यांचे मत अजमावले त्यापैकी बहुतांश मतदारांचा प्रश्न ठरलेला होता : (मोदींशिवाय) दुसरे आहे कोण? म्हणून मी थट्टेने या निवडणुकीला ‘लेकिन और है कौन’ निवडणूक म्हणायचे. पण खरे तर ही ‘आयेगा तो मोदीही’ निवडणूक होती. मोदींना मतदारांनी अत्यंत स्फूर्तीने दिलेली पसंती होती.मोदींच्या या देदीप्यमान विजयामागे मला जी कारणे दिसतात त्यापैकी काही अशी :- देशाचे नेतृत्व खंबीर व सतत नजरेसमोर असायला हवे, अशी देशाच्या जनतेला मोठी आस आहे. देशासाठी कोणताही धोका पत्करायला तयार असलेला नेता अशी मोदींची प्रतिमा आधीपासून होती. बालाकोट हवाई हल्ल्यांनी त्यास बळकटी दिली, एवढेच.- भाजपने ‘तुकडे तुकडे गँग’ असे म्हणून विरोधकांची संभावना करणे व आपल्याच देशाच्या नागरिकांना देशद्रोही म्हणणे हे विखारी होते. पण स्पर्धेतील इतर पक्ष याला स्वत:चा कोणताही पर्याय देऊ शकले नाहीत.- टोकाचा मोदीविरोध व जातीची समीकरणेही भाजपचा विजयरथ रोखू शकली नाहीत. खरं तर कागदावर गणित केल्यास ‘महागठबंधन’ सशक्त दिसत होते. पण मोदींनी हे गणित व जातीची समीकरणे फोल ठरविली. यावरून जातीपातींच्या पलीकडे जाणारे नेतृत्व म्हणून लोक मोदींचा वाढता स्वीकार करू लागल्याचे दिसते.- राजकीय हिंदुत्व हे आता एक वास्तव म्हणून स्वीकारावेच लागेल. हे फक्त बंगालमध्येच नव्हे तर पश्चिम व उत्तर भारताच्या फार मोठ्या पट्ट्यात हे दिसून आले. परिणामकारक संवाद यंत्रणेने राष्ट्रवाद व हिंदुत्वाची अशी काही सांगड घातली गेली की, बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्यावर अन्याय होत असल्याचे वाटू लागले. याचे भांडवल करायला भाजप बसलीच होती.- आर्थिक आघाडीवर पाहिले तर रोजगार, जीडीपी वाढीच्या मोजणीवरून झालेला वाद, जीएसटी लागू करताना सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि नोटाबंदी यावरून बरीच टीका होऊनही सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांनी या नाराजीवर मात केली.- दिल्लीच्या प्रस्थापित सत्ता वर्तुळात बाहेरून आलेल्या मोदींना अनेकांनी स्वीकारले नव्हते. त्याची चर्चाही बरीच झाली. तुम्ही म्हणाल, याचा मतांशी काही संबंध नाही. लोक अगदी याच शब्दात बोलत नसले तरी त्यांच्या मनातील भावनाही याचा विरोध करणाऱ्या होत्या, हे नाकारून चालणार नाही.- मोदींच्या यशाच्या चढत्या आलेखाचा आढावा काँग्रेसचे अपयश व त्यांच्या नेत्यांच्या बेफिकीर वृत्तीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. एकाच घराण्यावर पूर्णपणे विसंबून असलेल्या पक्षाला संघटना बांधणीत अडचणी येणे ठरलेलेच आहे. जेव्हा असे घराणेबाज नेतृत्वही पक्षाला यश मिळवून देऊ शकत नाही तेव्हा काँग्रेसने खरे तर आपल्या अस्तित्वासंबंधीच काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. अन्यथा, काँग्रेस जिवंत ठेवण्यात तरी काय अर्थ आहे, हा योगेंद्र यादव यांनी विचारलेला प्रश्न सार्थच म्हणावा लागेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा