शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

By सुधीर महाजन | Updated: March 25, 2019 19:46 IST

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले आहे.

- सुधीर महाजन

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांचा झोत आपल्यावर सतत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आता २९ मार्च रोजी लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार आहेत. हे जाहीर करताना आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले. संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या दोन घडामोडींदरम्यान परवा मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे ‘ट्रबल शूटर’ सिंचनमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या गूढ भेटीची चित्रफीत प्रसारित झाली म्हणल्यापेक्षा करण्यात आली. या मध्यरात्रीच्या भेटीने काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाला. याचा आनंद सत्तारांनीसुद्धा घेतला. या भेटीत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. केवळ आभार मानण्यासाठी मध्यरात्री ‘गुजगोष्टी’ होतात हे न कळण्याइतका सामान्य माणूस दूधखुळा नाही.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दाखवत सत्तारांनी ‘कात्रजचा घाट’ नेमका कोणाला दाखवला, हे काही दिवसांत स्पष्ट होईल; पण तोपर्यंत संभ्रम निर्माण करीत राजकीय गोंधळ उडवून देण्यात तरी ते यशस्वी झाले. गेल्या वर्षभरात औरंगाबादच्या जिल्हा काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याचा आढावा घेतला तर लोकसभेसाठी त्यावेळी अब्दुल सत्तार यांनीच विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांचे नाव पुढे आणले. झांबड यांनी तयारी सुरू करताच त्यांच्या उमेदवारीची शिफारस करणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली. आपल्या वार्डात ते बुथ कमिट्या बनवू शकले नाहीत ते लोकसभा कशी लढवणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी प्रा. बनसोड हा नवखा चेहरा पुढे आणला. हे नाव पुढे बरेच दिवस चर्चेत राहिले आणि बनसोड हे सुद्धा काँग्रेसची उमेदवारी मिळणारच या आशेवर नियोजन करीत राहिले आणि झांबड यांच्याप्रमाणे त्यांचाही पत्ता सत्तारांनी कापला.

दरम्यान, उमेदवारांची चाचपणी श्रेष्ठींकडून सुरू झाली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार या चर्चेने जोर धरला. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणही लढण्याच्या तयारीत होते. पुढे ही चर्चा मागे पडली. सत्तारांनी औरंगाबाद, तर माजी आमदार कल्याण काळे यांनी जालन्यातून लढावे, असा प्रस्ताव श्रेष्ठींकडून येताच दोघांनीही नकार दिला. याचवेळी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाली. हे घडताच सत्तार यांनी पक्षाच्या राजीनाम्याची घोषणा केली. आता सत्तार यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढायची आहे. झांबड पण त्यांच्यासाठी निवडणूक न लढण्याची भाषा करतात. असे असतानाही सत्तार अपक्ष लढणार, असे सांगतात. सत्तारांचे हे दबावतंत्र आणि हूल देण्याचे राजकारण नेमके कोणासाठी आहे, हाच कळीचा प्रश्न आहे? त्याचे उत्तर येत्या चार दिवसांत मिळेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेस