शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Lok Sabha Election 2019 : सत्तारांचे दबावतंत्राचे राजकारण नेमके कोणासाठी ?

By सुधीर महाजन | Updated: March 25, 2019 19:46 IST

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले आहे.

- सुधीर महाजन

गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांचा झोत आपल्यावर सतत टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आता २९ मार्च रोजी लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेणार आहेत. हे जाहीर करताना आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असला तरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याचे सांगतानाच आपण भाजपमध्येसुद्धा जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून सर्वांनाच गोंधळात पाडले. संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. या दोन घडामोडींदरम्यान परवा मध्यरात्री अडीच वाजता त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे ‘ट्रबल शूटर’ सिंचनमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या गूढ भेटीची चित्रफीत प्रसारित झाली म्हणल्यापेक्षा करण्यात आली. या मध्यरात्रीच्या भेटीने काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाला. याचा आनंद सत्तारांनीसुद्धा घेतला. या भेटीत त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. केवळ आभार मानण्यासाठी मध्यरात्री ‘गुजगोष्टी’ होतात हे न कळण्याइतका सामान्य माणूस दूधखुळा नाही.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दाखवत सत्तारांनी ‘कात्रजचा घाट’ नेमका कोणाला दाखवला, हे काही दिवसांत स्पष्ट होईल; पण तोपर्यंत संभ्रम निर्माण करीत राजकीय गोंधळ उडवून देण्यात तरी ते यशस्वी झाले. गेल्या वर्षभरात औरंगाबादच्या जिल्हा काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्याचा आढावा घेतला तर लोकसभेसाठी त्यावेळी अब्दुल सत्तार यांनीच विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांचे नाव पुढे आणले. झांबड यांनी तयारी सुरू करताच त्यांच्या उमेदवारीची शिफारस करणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली. आपल्या वार्डात ते बुथ कमिट्या बनवू शकले नाहीत ते लोकसभा कशी लढवणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी प्रा. बनसोड हा नवखा चेहरा पुढे आणला. हे नाव पुढे बरेच दिवस चर्चेत राहिले आणि बनसोड हे सुद्धा काँग्रेसची उमेदवारी मिळणारच या आशेवर नियोजन करीत राहिले आणि झांबड यांच्याप्रमाणे त्यांचाही पत्ता सत्तारांनी कापला.

दरम्यान, उमेदवारांची चाचपणी श्रेष्ठींकडून सुरू झाली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार या चर्चेने जोर धरला. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणही लढण्याच्या तयारीत होते. पुढे ही चर्चा मागे पडली. सत्तारांनी औरंगाबाद, तर माजी आमदार कल्याण काळे यांनी जालन्यातून लढावे, असा प्रस्ताव श्रेष्ठींकडून येताच दोघांनीही नकार दिला. याचवेळी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी सुभाष झांबड यांची उमेदवारी जाहीर झाली. हे घडताच सत्तार यांनी पक्षाच्या राजीनाम्याची घोषणा केली. आता सत्तार यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढायची आहे. झांबड पण त्यांच्यासाठी निवडणूक न लढण्याची भाषा करतात. असे असतानाही सत्तार अपक्ष लढणार, असे सांगतात. सत्तारांचे हे दबावतंत्र आणि हूल देण्याचे राजकारण नेमके कोणासाठी आहे, हाच कळीचा प्रश्न आहे? त्याचे उत्तर येत्या चार दिवसांत मिळेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेस