शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 15:34 IST

सुसंस्कृत राजकारणाचा ‘लातूर पॅटर्न’ 

- धर्मराज हल्लाळे

लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली लढत झाली ती शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे पी.जी. पाटील यांच्यात. या लढतीत भाई उद्धवराव पाटील यांनी बाजी मारली. पुढे १९८० पासून २००४ पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी सात वेळा या मतदारसंघाचे विजयी नेतृत्व केले. देशपातळीवर मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. वैयक्तिक टीकेचा तर विषयच नसायचा. पक्षाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण ते मतदारांना पटवून सांगत असत. जातीय समिकरणांचा कधी मेळ घातला नाही. त्यामुळेच शिवराज पाटील चाकूरकर १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ सातवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. एस. काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील, जनता दलाचे डॉ. बापूसाहेब काळदाते, भाजपाचे डॉ. गोपाळराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

१९८४ ची काँग्रेस विरुद्ध एस. काँग्रेस ही लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एस. काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पद्मसिंह पाटील यांना उतरविले. या निवडणुकीत चमत्कार होईल, असे राजकीय अंदाज बांधले गेले. परंतु, या तुल्यबळ लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार १२९ तर चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४३६ मते मिळाली. ७८ हजार ३३७ मतांनी चाकूरकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. १९८९ ला डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी चाकूरकरांच्या विरोधात तुल्यबळ लढत दिली. काँग्रेस विरुद्ध जनता दल अशी दुरंगी लढत झाली. त्यात चाकूरकर यांनी ३ लाख ४ हजार ७३३ मते घेऊन विजय मिळविला. तर बापूसाहेब काळदातेंना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती. त्यानंतर १९९६ ला बापूसाहेब काळदाते पुन्हा चाकूरकरांच्या विरोधात उतरले. समोर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे डॉ. गोपाळराव पाटील होते. तिरंगी लढत झाली. तिघेही दिग्गज. कोण बाजी मारणार, असा प्रश्न होता. महाराष्ट्रात जनता दलाचे वारे होते. त्यामुळे राजकीय विश्लेषक याच अंगाने अंदाज बांधत होते. पण या तिरंगी लढतीतही शिवराज पाटील चाकूरकर यांनी बाजी मारली. २ लाख ७९ हजार ७७५ मते त्यांनी घेतली. गोपाळराव पाटील २ लाख ४०३ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर बापूसाहेब काळदाते यांना १ लाख ३८ हजार ७२५ मते मिळाली अन् ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जातीय समिकरणे नाहीत, एकमेकांची उणीदुणी नाही की, व्यक्तिगत टीका नसलेल्या या लढतीने सुसंस्कृत आदर्श पाया रचला आहे. 

१९७७ ला अस्तित्वात आलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि वैचारिक मुद्यांवर लक्षवेधी लढती झाल्या असून, सुसंस्कृत राजकारणाचा लातूर पॅटर्न म्हणून या लढतींकडे आदराने पाहिले गेले आहे. वैयक्तिक टीकेचा लवलेश नाही की, एकमेकांची उणीदुणी नाहीत. केवळ विकास आणि राजकीय मुद्यांवर लढण्याची परंपरा लातूर लोकसभा मतदारसंघाने देशात निर्माण केली आहे. 

विकास अन् पक्षाचे धोरण...लातूर लोकसभा मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. बापूसाहेब काळदाते, डॉ. गोपाळराव पाटील या दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या. प्रचारात कधी व्यक्तिगत टीका नाही, भाषाही सुसंस्कृत, राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा लवलेशही नाही. विकास आणि पक्षाचे राष्ट्रीय धोरण आपापल्या शैलीत त्यांनी मतदारांसमोर मांडले. ही परंपरा सहाव्या लोकसभा निवडणुकीपासून आहे. १९८० पासून चौदाव्या लोकसभेपर्यंत चाकूरकर काँग्रेसकडून लढत राहिले आणि ते सातवेळा विजयीही झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकर