शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

Lok Sabha Election 2019 : इतिहास चाळताना...वैचारिक मुद्यांवर लातूरच्या ऐतिहासिक लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 15:34 IST

सुसंस्कृत राजकारणाचा ‘लातूर पॅटर्न’ 

- धर्मराज हल्लाळे

लातूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिली लढत झाली ती शेतकरी कामगार पक्षाचे भाई उद्धवराव पाटील आणि काँग्रेसचे पी.जी. पाटील यांच्यात. या लढतीत भाई उद्धवराव पाटील यांनी बाजी मारली. पुढे १९८० पासून २००४ पर्यंत शिवराज पाटील चाकूरकर यांनी सात वेळा या मतदारसंघाचे विजयी नेतृत्व केले. देशपातळीवर मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. वैयक्तिक टीकेचा तर विषयच नसायचा. पक्षाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरण ते मतदारांना पटवून सांगत असत. जातीय समिकरणांचा कधी मेळ घातला नाही. त्यामुळेच शिवराज पाटील चाकूरकर १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ सातवेळा या मतदारसंघातून विजयी झाले. एस. काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील, जनता दलाचे डॉ. बापूसाहेब काळदाते, भाजपाचे डॉ. गोपाळराव पाटील आदी दिग्गज नेत्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते. 

१९८४ ची काँग्रेस विरुद्ध एस. काँग्रेस ही लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या एस. काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात डॉ. पद्मसिंह पाटील यांना उतरविले. या निवडणुकीत चमत्कार होईल, असे राजकीय अंदाज बांधले गेले. परंतु, या तुल्यबळ लढतीत डॉ. पद्मसिंह पाटील यांना २ लाख ३ हजार १२९ तर चाकूरकर यांना २ लाख ८१ हजार ४३६ मते मिळाली. ७८ हजार ३३७ मतांनी चाकूरकर यांचा या निवडणुकीत विजय झाला. १९८९ ला डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी चाकूरकरांच्या विरोधात तुल्यबळ लढत दिली. काँग्रेस विरुद्ध जनता दल अशी दुरंगी लढत झाली. त्यात चाकूरकर यांनी ३ लाख ४ हजार ७३३ मते घेऊन विजय मिळविला. तर बापूसाहेब काळदातेंना २ लाख ६० हजार ८७८ मते मिळाली होती. त्यानंतर १९९६ ला बापूसाहेब काळदाते पुन्हा चाकूरकरांच्या विरोधात उतरले. समोर शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे डॉ. गोपाळराव पाटील होते. तिरंगी लढत झाली. तिघेही दिग्गज. कोण बाजी मारणार, असा प्रश्न होता. महाराष्ट्रात जनता दलाचे वारे होते. त्यामुळे राजकीय विश्लेषक याच अंगाने अंदाज बांधत होते. पण या तिरंगी लढतीतही शिवराज पाटील चाकूरकर यांनी बाजी मारली. २ लाख ७९ हजार ७७५ मते त्यांनी घेतली. गोपाळराव पाटील २ लाख ४०३ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर बापूसाहेब काळदाते यांना १ लाख ३८ हजार ७२५ मते मिळाली अन् ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. जातीय समिकरणे नाहीत, एकमेकांची उणीदुणी नाही की, व्यक्तिगत टीका नसलेल्या या लढतीने सुसंस्कृत आदर्श पाया रचला आहे. 

१९७७ ला अस्तित्वात आलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक आणि वैचारिक मुद्यांवर लक्षवेधी लढती झाल्या असून, सुसंस्कृत राजकारणाचा लातूर पॅटर्न म्हणून या लढतींकडे आदराने पाहिले गेले आहे. वैयक्तिक टीकेचा लवलेश नाही की, एकमेकांची उणीदुणी नाहीत. केवळ विकास आणि राजकीय मुद्यांवर लढण्याची परंपरा लातूर लोकसभा मतदारसंघाने देशात निर्माण केली आहे. 

विकास अन् पक्षाचे धोरण...लातूर लोकसभा मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. बापूसाहेब काळदाते, डॉ. गोपाळराव पाटील या दिग्गज नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या. प्रचारात कधी व्यक्तिगत टीका नाही, भाषाही सुसंस्कृत, राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा लवलेशही नाही. विकास आणि पक्षाचे राष्ट्रीय धोरण आपापल्या शैलीत त्यांनी मतदारांसमोर मांडले. ही परंपरा सहाव्या लोकसभा निवडणुकीपासून आहे. १९८० पासून चौदाव्या लोकसभेपर्यंत चाकूरकर काँग्रेसकडून लढत राहिले आणि ते सातवेळा विजयीही झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकर