शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:21 IST

रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

- जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञानलेखकसध्या आपल्या भारत देशाचे चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने यशस्वीपणे झेपावत आहे. त्या आधी १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्रीहरीकोटा तळावरून एकाच वेळी १०४ देशी-परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या घटनांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) आकाशाला गवसणीच घातली. इस्रोची स्थापना (१९६३) हा डॉ. विक्रम साराभाईच्या कारकिर्दीचा कळस होता. रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

ते सांगत, विकसनशील देशाला अवकाश संशोधनासंबधी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज काय, असा सूर जगभर सर्वत्र निघतो आहे, पण आमचा हेतू पारदर्शक आहे. आम्हाला चंद्रस्वारी किंवा अन्य ग्रहावर याने पाठवून, तसेच मानवसहित याने पाठवून विकसित देशांशी आर्थिक स्पर्धा मुळीच करायची नाही. एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे मनुष्य आणि समाज विकसित करायचा असेल, तर आमचा देश अवकाश संशोधनात पिछाडीवर राहून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवून, आम्हाला आमच्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत.
विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. तो पारतंत्र्याचा काळ होता व स्वातंत्र्याची चळवळ जोम घेऊ लागली होती. विक्रमच्या कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होते, त्यामुळे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सी.एफ.अँड्रूज; या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीची त्यांच्या घरी ऊठबस होत असे. या थोर व्यक्तीच्या सहवासाचा नि विचारांचा तरुण विक्रमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांच्या मातोश्री सरलाबेन मोंटेसरी शिक्षण पद्धतीवर द रिट्रीट शाळा चालवत, तिथेच ते शिकले. त्यांचे पुढचे शिक्षण गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर, ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील ट्रायपास परीक्षा उतीर्ण झाले. तद्नंतर, १९४० साली,तेथील बी.ए. व त्याच्या दोन वर्षांनंतर एम. ए. पदव्या पदरात पाडून घेतल्या.
डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम सारभाईंनी आपल्या देशातले पहिले रॉकेट लौंचिंग केंद्र बांधण्यासाठी केरळातील तिरुअनंतपुरममधील थुंबागाव निवडले होते. त्या प्रदेशावरून विषुववृत जाते व अवकाशयाने सोडण्यास तीच जागा योग्य होती. शिवाय, तिरुअनंतपुरम विमानतळ पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होता. समुद्रकिनारा व रेल्वेलाइन्स यात पसरलेला थुंबाचा तो ६०० एकरचा पट्टा या कामी उपयोगी होता. थुंबा गावातील मेरी माग्दलेनच्या चर्चमध्ये अवकाश संशोधन करणारी प्रयोगशाळा थाटायची होती, पण त्या थुंबा गावात गरीब ख्रिस्ती कोळी लोकांची वस्ती होती. त्रिवेंद्रमचे बिशाप राइट रेव्हरंड डॉ.पीटर बर्नड परेरा त्यांचे मेंढपाळ (आध्यात्मिक नेते) होते. त्रिवेंद्रमचे कलेक्टर के. माधवन बिशाप परेरांना भेटले आणि त्यांच्याकडे थुंबागावाची मागणी केली. बिशाप परेरा आध्यात्मिक नेते होते, तरीही त्यांची वृत्ती विज्ञानवादी होती. त्यांनी आपल्या भाविकांना विश्वासात घेऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली व त्या शास्त्रज्ञाचा मार्ग सुकर झाला झाला होता. तेथूनच २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारताचे पहिले रॉकेट यशस्वीरीत्या आकाशात रवाना झाले होते.
डॉ.विक्रम साराभाई यांनी देश-विकासासाठी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नाना संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, तिरुअनंतपूरचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अहमदाबादमधील त्यांच्या स्वत:च्या सहा संस्थांचे विलीनीकरण करून उभारलेले स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, कल्पकम येथील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर, कोलकोतातील व्हेरियबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बिहारमधील जादूगुडा येथे उभारलेली युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया इ. संस्थाच्या निर्मितीत ते आघाडीवर होते. अशाप्रकारे त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली. ३० डिसेंबर, १९७१ रोजी तिरुअनंतपुरम इथे ही महान विभूती झोपेत असताना वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी अनंतात विलीन झाली.

टॅग्स :isroइस्रो