शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक: डॉ. विक्रम साराभाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 04:21 IST

रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

- जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञानलेखकसध्या आपल्या भारत देशाचे चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने यशस्वीपणे झेपावत आहे. त्या आधी १५ फेब्रुवारी, २०१७ रोजी श्रीहरीकोटा तळावरून एकाच वेळी १०४ देशी-परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या घटनांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रोने) आकाशाला गवसणीच घातली. इस्रोची स्थापना (१९६३) हा डॉ. विक्रम साराभाईच्या कारकिर्दीचा कळस होता. रशियाने त्यांचे स्फुटनिक यान अवकाशात सोडले होते, तेव्हा साराभाईंनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्त्व पटवून दिले होते.

ते सांगत, विकसनशील देशाला अवकाश संशोधनासंबधी लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची गरज काय, असा सूर जगभर सर्वत्र निघतो आहे, पण आमचा हेतू पारदर्शक आहे. आम्हाला चंद्रस्वारी किंवा अन्य ग्रहावर याने पाठवून, तसेच मानवसहित याने पाठवून विकसित देशांशी आर्थिक स्पर्धा मुळीच करायची नाही. एक गोष्ट आम्हाला स्पष्टपणे जाणवते, ती म्हणजे मनुष्य आणि समाज विकसित करायचा असेल, तर आमचा देश अवकाश संशोधनात पिछाडीवर राहून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ उठवून, आम्हाला आमच्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत.
विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट, १९१९ रोजी अंबालाल आणि सरलाबेन या दाम्पत्याच्या पोटी झाला होता. तो पारतंत्र्याचा काळ होता व स्वातंत्र्याची चळवळ जोम घेऊ लागली होती. विक्रमच्या कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होते, त्यामुळे रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री, मोतीलाल व जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, मौलाना आझाद, सी.एफ.अँड्रूज; या ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळीची त्यांच्या घरी ऊठबस होत असे. या थोर व्यक्तीच्या सहवासाचा नि विचारांचा तरुण विक्रमच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडला. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण घरीच झाले. त्यांच्या मातोश्री सरलाबेन मोंटेसरी शिक्षण पद्धतीवर द रिट्रीट शाळा चालवत, तिथेच ते शिकले. त्यांचे पुढचे शिक्षण गुजरात कॉलेजमध्ये झाले. नंतर, ते इंग्लंडला गेले व केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते १९३९ साली रसायन आणि भौतिक या विषयातील ट्रायपास परीक्षा उतीर्ण झाले. तद्नंतर, १९४० साली,तेथील बी.ए. व त्याच्या दोन वर्षांनंतर एम. ए. पदव्या पदरात पाडून घेतल्या.
डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम सारभाईंनी आपल्या देशातले पहिले रॉकेट लौंचिंग केंद्र बांधण्यासाठी केरळातील तिरुअनंतपुरममधील थुंबागाव निवडले होते. त्या प्रदेशावरून विषुववृत जाते व अवकाशयाने सोडण्यास तीच जागा योग्य होती. शिवाय, तिरुअनंतपुरम विमानतळ पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होता. समुद्रकिनारा व रेल्वेलाइन्स यात पसरलेला थुंबाचा तो ६०० एकरचा पट्टा या कामी उपयोगी होता. थुंबा गावातील मेरी माग्दलेनच्या चर्चमध्ये अवकाश संशोधन करणारी प्रयोगशाळा थाटायची होती, पण त्या थुंबा गावात गरीब ख्रिस्ती कोळी लोकांची वस्ती होती. त्रिवेंद्रमचे बिशाप राइट रेव्हरंड डॉ.पीटर बर्नड परेरा त्यांचे मेंढपाळ (आध्यात्मिक नेते) होते. त्रिवेंद्रमचे कलेक्टर के. माधवन बिशाप परेरांना भेटले आणि त्यांच्याकडे थुंबागावाची मागणी केली. बिशाप परेरा आध्यात्मिक नेते होते, तरीही त्यांची वृत्ती विज्ञानवादी होती. त्यांनी आपल्या भाविकांना विश्वासात घेऊन त्या प्रकल्पाला मान्यता दिली व त्या शास्त्रज्ञाचा मार्ग सुकर झाला झाला होता. तेथूनच २१ नोव्हेंबर, १९६३ रोजी सोडियम बाष्प पेलोड तंत्र वापरून भारताचे पहिले रॉकेट यशस्वीरीत्या आकाशात रवाना झाले होते.
डॉ.विक्रम साराभाई यांनी देश-विकासासाठी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नाना संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, तिरुअनंतपूरचे विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अहमदाबादमधील त्यांच्या स्वत:च्या सहा संस्थांचे विलीनीकरण करून उभारलेले स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर, कल्पकम येथील फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर, कोलकोतातील व्हेरियबल एनर्जी सायक्लोट्रोन प्रोजेक्ट, हैद्राबादमधील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, बिहारमधील जादूगुडा येथे उभारलेली युरेनियम कार्पोरेशन ऑफ इंडिया इ. संस्थाच्या निर्मितीत ते आघाडीवर होते. अशाप्रकारे त्यांनी सुरू केलेल्या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाला जागतिक कीर्ती लाभली. ३० डिसेंबर, १९७१ रोजी तिरुअनंतपुरम इथे ही महान विभूती झोपेत असताना वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी अनंतात विलीन झाली.

टॅग्स :isroइस्रो