शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अदृश्य आजारांना सीमेवरच रोखूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 04:42 IST

आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.

- डॉ. विकास महात्मे, राज्यसभा सदस्य, पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ज्ञमराठीत एक म्हण आहे, ‘पुढच्यास ठेच मागल्यास शहाणपण’. खरे म्हणजे हे वाक्य आयुष्याची फार मोठी शिकवण देते. कोरोनाने जी ठेच दिली त्यातून शहाणपण घेण्याची वेळ आली आहे. उपचार, आहार, काढे, पीपीई, मास्क या विषयांवर चर्चा होत असते. मात्र, मी आज वेगळा विषय मांडू इच्छितो... ‘झुनोसिस’ची संकल्पना.झुनोसिस म्हणजे काय? : कोरोनाचा कहर आला कुठून, असे विचारले तर पटकन् उत्तर मिळते ‘चीनमधून’; पण चीन हा या महामारीच्या प्रवासाचा ‘मार्ग’ होता. कोरोनाची उत्पत्ती झाली चीनच्या ‘मार्केट’मधून व मार्केट कसले होते? तर ते होते चिनी लोक आहारात वापर करतात त्या वन्यप्राण्यांच्या मांसाचे! अनेक वैज्ञानिकांचा दावा आहे की, खवल्या मांजरात हा विषाणू होता व तेथून तो पसरला. म्हणजे एका प्राण्यापासून मानवाला तो आजार झाला. असे आजार जे प्राण्यांपासून मानवाला किंवा कधी कधी मानवापासून प्राण्यांना होतात, त्या आजारांना झुनोटिक आजार व या विज्ञानाला झुनोसिस असे म्हणतात.

कोरोना हा काही पहिला झुनोटिक आजार नव्हे. यापूर्वी केरळमध्ये ‘निपाह’ पसरला, तो वटवाघळापासून आला होता. तसेच ‘इबोला’ विषाणूही वटवाघळापासून आला; पण हे आजार वेळीच सतर्कतेने थांबवू शकलो. प्राण्यांच्या मूत्रविसर्जनातून लेप्टोस्पायरोसीस आजार होतो, उंदरांपासून प्लेग होतो. सिवेट कॅट या प्राण्यापासून सार्स पसरला, रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याची लाळ आपल्या खरचटलेल्या भागात किंवा ‘म्युकस मेंबरेन’च्या संपर्कात आली तर रेबीज होतो, हे वेळोवेळी ऐकले आहे. ब्रुसेलोसिस, तसेच व्हेक्टर बॉर्न (डाससदृश कीटकांच्या शरीरातील जंतू) आजारही आहेत. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळले की, संसर्गजन्य रोग झालेले १० रुग्ण असतील, तर त्यातले जवळपास सहा झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला झालेले असतात.
यावर काय करता येईल? : प्रथम आपली विचारधारा बदलावी लागेल. हे लक्षात घ्यावे लागेल की, मानवाला झुनोटिक आजारांचे संक्रमण होऊ नये असे वाटत असेल, तर या प्राण्यांमध्येही त्या विषाणूंचा शिरकाव होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ कुत्र्याला रेबीज होऊ नये म्हणून लस टोचली तर त्याची किंमत फारच कमी असते (साधारण ८० रु.). असा रेबीजची लस टोचलेला, पाळीव कुत्रा चावला तर आपण लगेच रेबीजची लस घेण्याची गरज नसते. मात्र, ज्या कुत्र्याने चावा घेतला त्याला रेबीजची लस दिलेली होती अथवा नाही, हेच माहिती नसेल तर कुत्रा चावलेल्याला रेबीजचे इंजेक्शन देणे गरजेचे असते, ज्याचा खर्च सुमारे २००० रुपये प्रतिव्यक्ती असतो. वर्षभरात देशात श्वानदंशांच्या सुमारे १७४ लाख केसीस होतात. मग यामागे होणाऱ्या खर्चाची कल्पनाच करायला नको. यातूनच रेबीज लसींचा तुटवडा निर्माण होतो. म्हणजे झुनोटिक आजारांसाठी ह्युमन हेल्थ प्रोफेशनल्स (मानवी आरोग्य विशेषज्ञ), जसे की डॉक्टर्स, नर्सेस व पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांनी एकत्र यावे लागेल.
‘वन हेल्थ’ म्हणजे काय? : प्राण्यांपासून मानवाला किंवा मानवापासून प्राण्याला होणाºया आजारांच्या नियमनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘वन हेल्थ’ संकल्पना आणली. अनेक देशांमध्ये ही कल्पना रुजली व कार्यान्वितही झाली. खरे तर भारतात जागोजागी ‘वन हेल्थ’ केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी यासाठी कार्यरत आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री जी. पी. नड्डा, डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्राचे तत्कालीन पशुखात्याचे सचिव अनुपकुमार, ‘माफसू’चे उपकुलगुरू पातूरकर, ‘आयसीएमआर’चे गंगाखेडकर यांच्यासोबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले व देशातील पहिले ‘वन-हेल्थ’ केंद्र नागपुरात सुरू करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या केंद्रात अत्यंत अडचणीच्या काळात कोरोनाची चाचणीही कार्यान्वित करून घेऊ शकलो. त्यामुळे कोरोना निदानासाठी मोलाचे योगदान केंद्र देत आहे.‘वन-हेल्थ’- आव्हाने : ‘वन-हेल्थ’चा विचार रुजविण्यासाठी व कृतीत आणण्यासाठी बरेच काम करावे लागेल. प्रथम डॉक्टरांमध्ये जागृती आणावी लागेल. आरोग्यसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांची टीम उभारावी लागेल. भारतातील हे एकमेव केंद्र ‘माफसू’च्या आवारात आहे; पण त्यासाठी स्वतंत्र इमारत व आवाराची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यात असे केंद्र हवे.
‘हेल्थ-आर्मी’ची संकल्पना : देशाच्या सीमांचे रक्षण करायला फौजा सदैव तयार असतात; पण दुर्दैव असे की, कोरोनासारखे आजार या सीमा जाणत नाहीत व जगभर पसरतात. म्हणून अशा आजारांना सीमेवरच रोखण्यासाठी वन-हेल्थ केंद्रांतर्गत ‘हेल्थ-आर्मी’ असायला हवी. या आर्मीत वैद्यकीय तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, विमानतळ व सी पोर्ट सुरक्षा, नियोजन तज्ज्ञ, आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ या सर्वांचा समावेश असेल. जगभरात कुठेही संसर्गजन्य आजाराच्या अस्तित्वाची माहिती मिळताच आपण सतर्क होऊन कार्यान्वित होण्यासाठी हेल्थ आर्मी सज्ज असेल. पहिला टप्पा म्हणजे असा धोका ओळखणे, त्याची तीव्रता समजून घेणे व त्यानुसार प्रणाली कार्यान्वित करणे. विमानतळ, सी-पोर्ट, आंतरराष्ट्रीय रेल्वे या माध्यमातून होऊ शकणाऱ्या भावी संसर्गाला तेथेच अडविणे. यासाठी युद्धपातळीवर वेळीच कृती झाली तर आपला देश या अदृश्य शत्रूंपासून वाचवू शकतो.आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. ‘चला, प्राण्यांपासून होणाºया आजारांचा एकत्रित सामना करूया.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या