शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अदृश्य आजारांना सीमेवरच रोखूया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 04:42 IST

आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे.

- डॉ. विकास महात्मे, राज्यसभा सदस्य, पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ज्ञमराठीत एक म्हण आहे, ‘पुढच्यास ठेच मागल्यास शहाणपण’. खरे म्हणजे हे वाक्य आयुष्याची फार मोठी शिकवण देते. कोरोनाने जी ठेच दिली त्यातून शहाणपण घेण्याची वेळ आली आहे. उपचार, आहार, काढे, पीपीई, मास्क या विषयांवर चर्चा होत असते. मात्र, मी आज वेगळा विषय मांडू इच्छितो... ‘झुनोसिस’ची संकल्पना.झुनोसिस म्हणजे काय? : कोरोनाचा कहर आला कुठून, असे विचारले तर पटकन् उत्तर मिळते ‘चीनमधून’; पण चीन हा या महामारीच्या प्रवासाचा ‘मार्ग’ होता. कोरोनाची उत्पत्ती झाली चीनच्या ‘मार्केट’मधून व मार्केट कसले होते? तर ते होते चिनी लोक आहारात वापर करतात त्या वन्यप्राण्यांच्या मांसाचे! अनेक वैज्ञानिकांचा दावा आहे की, खवल्या मांजरात हा विषाणू होता व तेथून तो पसरला. म्हणजे एका प्राण्यापासून मानवाला तो आजार झाला. असे आजार जे प्राण्यांपासून मानवाला किंवा कधी कधी मानवापासून प्राण्यांना होतात, त्या आजारांना झुनोटिक आजार व या विज्ञानाला झुनोसिस असे म्हणतात.

कोरोना हा काही पहिला झुनोटिक आजार नव्हे. यापूर्वी केरळमध्ये ‘निपाह’ पसरला, तो वटवाघळापासून आला होता. तसेच ‘इबोला’ विषाणूही वटवाघळापासून आला; पण हे आजार वेळीच सतर्कतेने थांबवू शकलो. प्राण्यांच्या मूत्रविसर्जनातून लेप्टोस्पायरोसीस आजार होतो, उंदरांपासून प्लेग होतो. सिवेट कॅट या प्राण्यापासून सार्स पसरला, रेबीज झालेला कुत्रा चावला तर त्याची लाळ आपल्या खरचटलेल्या भागात किंवा ‘म्युकस मेंबरेन’च्या संपर्कात आली तर रेबीज होतो, हे वेळोवेळी ऐकले आहे. ब्रुसेलोसिस, तसेच व्हेक्टर बॉर्न (डाससदृश कीटकांच्या शरीरातील जंतू) आजारही आहेत. शास्त्रीयदृष्ट्या असे आढळले की, संसर्गजन्य रोग झालेले १० रुग्ण असतील, तर त्यातले जवळपास सहा झुनोटिक म्हणजे प्राण्यांपासून मानवाला झालेले असतात.
यावर काय करता येईल? : प्रथम आपली विचारधारा बदलावी लागेल. हे लक्षात घ्यावे लागेल की, मानवाला झुनोटिक आजारांचे संक्रमण होऊ नये असे वाटत असेल, तर या प्राण्यांमध्येही त्या विषाणूंचा शिरकाव होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. उदाहरणार्थ कुत्र्याला रेबीज होऊ नये म्हणून लस टोचली तर त्याची किंमत फारच कमी असते (साधारण ८० रु.). असा रेबीजची लस टोचलेला, पाळीव कुत्रा चावला तर आपण लगेच रेबीजची लस घेण्याची गरज नसते. मात्र, ज्या कुत्र्याने चावा घेतला त्याला रेबीजची लस दिलेली होती अथवा नाही, हेच माहिती नसेल तर कुत्रा चावलेल्याला रेबीजचे इंजेक्शन देणे गरजेचे असते, ज्याचा खर्च सुमारे २००० रुपये प्रतिव्यक्ती असतो. वर्षभरात देशात श्वानदंशांच्या सुमारे १७४ लाख केसीस होतात. मग यामागे होणाऱ्या खर्चाची कल्पनाच करायला नको. यातूनच रेबीज लसींचा तुटवडा निर्माण होतो. म्हणजे झुनोटिक आजारांसाठी ह्युमन हेल्थ प्रोफेशनल्स (मानवी आरोग्य विशेषज्ञ), जसे की डॉक्टर्स, नर्सेस व पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांनी एकत्र यावे लागेल.
‘वन हेल्थ’ म्हणजे काय? : प्राण्यांपासून मानवाला किंवा मानवापासून प्राण्याला होणाºया आजारांच्या नियमनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ‘वन हेल्थ’ संकल्पना आणली. अनेक देशांमध्ये ही कल्पना रुजली व कार्यान्वितही झाली. खरे तर भारतात जागोजागी ‘वन हेल्थ’ केंद्र सुरू करण्याची नितांत गरज आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी यासाठी कार्यरत आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री जी. पी. नड्डा, डॉ. हर्षवर्धन, महाराष्ट्राचे तत्कालीन पशुखात्याचे सचिव अनुपकुमार, ‘माफसू’चे उपकुलगुरू पातूरकर, ‘आयसीएमआर’चे गंगाखेडकर यांच्यासोबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले व देशातील पहिले ‘वन-हेल्थ’ केंद्र नागपुरात सुरू करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे या केंद्रात अत्यंत अडचणीच्या काळात कोरोनाची चाचणीही कार्यान्वित करून घेऊ शकलो. त्यामुळे कोरोना निदानासाठी मोलाचे योगदान केंद्र देत आहे.‘वन-हेल्थ’- आव्हाने : ‘वन-हेल्थ’चा विचार रुजविण्यासाठी व कृतीत आणण्यासाठी बरेच काम करावे लागेल. प्रथम डॉक्टरांमध्ये जागृती आणावी लागेल. आरोग्यसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ यांची टीम उभारावी लागेल. भारतातील हे एकमेव केंद्र ‘माफसू’च्या आवारात आहे; पण त्यासाठी स्वतंत्र इमारत व आवाराची आवश्यकता आहे. प्रत्येक राज्यात असे केंद्र हवे.
‘हेल्थ-आर्मी’ची संकल्पना : देशाच्या सीमांचे रक्षण करायला फौजा सदैव तयार असतात; पण दुर्दैव असे की, कोरोनासारखे आजार या सीमा जाणत नाहीत व जगभर पसरतात. म्हणून अशा आजारांना सीमेवरच रोखण्यासाठी वन-हेल्थ केंद्रांतर्गत ‘हेल्थ-आर्मी’ असायला हवी. या आर्मीत वैद्यकीय तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, विमानतळ व सी पोर्ट सुरक्षा, नियोजन तज्ज्ञ, आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्था, सामाजिक संस्था, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञ या सर्वांचा समावेश असेल. जगभरात कुठेही संसर्गजन्य आजाराच्या अस्तित्वाची माहिती मिळताच आपण सतर्क होऊन कार्यान्वित होण्यासाठी हेल्थ आर्मी सज्ज असेल. पहिला टप्पा म्हणजे असा धोका ओळखणे, त्याची तीव्रता समजून घेणे व त्यानुसार प्रणाली कार्यान्वित करणे. विमानतळ, सी-पोर्ट, आंतरराष्ट्रीय रेल्वे या माध्यमातून होऊ शकणाऱ्या भावी संसर्गाला तेथेच अडविणे. यासाठी युद्धपातळीवर वेळीच कृती झाली तर आपला देश या अदृश्य शत्रूंपासून वाचवू शकतो.आपण म्हणतो, राजकारणी ‘Divide and Rule Policy’चा वापर करतात; पण हल्लीचे विषाणूदेखील हीच पॉलिसी वापरून सर्वव्यापी बनत आहेत. म्हणून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. ‘चला, प्राण्यांपासून होणाºया आजारांचा एकत्रित सामना करूया.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या