शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोलवर सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया! जाणून घ्या, काय म्हणाल्या?
2
Mumbai Local: मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात लेटमार्कने! पश्चिम रेल्वे विस्कळीत, बोरीवलीत तांत्रिक बिघाड
3
शहाजीबापू पाटील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात; CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, केली तब्येतीची विचारपूस
4
Fact Check : राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होतील असा दावा करणारी शाहरुख खानची 'ती' पोस्ट खोटी
5
अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा
6
T20 WC 2024 : पोलार्ड इंग्लंडच्या ताफ्यात! गतविजेत्यांना पुन्हा एकदा चॅम्पियन करण्यासाठी मैदानात
7
Anil Ambaniच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी; रिलायन्स पॉवर, इन्फ्रामध्ये जोरदार वाढ; जाणून घ्या?
8
Gold Price Today: ३ जून रोजी स्वस्त झालं Gold, निवडणुकांच्या निकालापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण
9
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
10
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
11
“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील
12
रवीना टंडनवर झालेल्या खोट्या आरोपांवर कंगना रणौतची प्रतिक्रिया, म्हणाली, "ही धोक्याची घंटा..."
13
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
14
आरोग्य सांभाळा! जास्त तहान लागत असेल तर सावधान; 'या' ५ आजारांचा वाढू शकतो धोका
15
अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट
16
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
17
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
18
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
19
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवार मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
20
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी

माणुसकी जपूया, मुक्या जीवांची काळजी घेऊया!

By किरण अग्रवाल | Published: May 12, 2024 11:44 AM

Let's preserve humanity : तापमानाचा पारा टिपेस पोहोचला आहे. निसर्गाला मंजूळ स्वर देणाऱ्या पशुपक्ष्यांना या स्थितीत जपणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना बसणारा चटका, त्यांची तहान जाणून घेत व माणुसकी जपत त्यांच्यासाठी शक्य असेल तसे दाणा-पाण्याची व्यवस्था करूया..!

- किरण अग्रवाल

  

उन्हाचा चटका मनुष्यप्राण्यालाच घायाळ करणारा व त्याच्या घशाला कोरड पाडणारा असल्याने मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न संवेदनशील मनांना अस्वस्थ करणाराच ठरत आहे. याबाबतही निव्वळ प्रशासनाकडे बोट दाखविण्यापेक्षा माणुसकी धर्माला जागत प्रत्येकाने आपापल्या परीने व्यवस्था करण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

अकोल्यातील उन्हाळा तसाही इतरांना घाम फोडणाराच ठरत असतो. यंदा तर सूर्य जरा जास्तच आग ओकत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अकोलाच नव्हे, तर बुलढाणा व वाशिम याही जिल्ह्यांमधील लहानमोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षाच्या तुलनेने खूपच खालावला आहे. उन्हाचा कडाका मोठा असल्याने बाष्पीभवनही वेगाने घडून येत आहे, त्यामुळे आहे तो जलसाठाही लवकरच अपुरा पडण्याची चिन्हे आहेत.

मुद्दा असा की, हा उन्हाचा चटका केवळ मनुष्यांनाच बसत नसून पशुपक्ष्यांचेही अंग भाजून काढणारा ठरत आहे. पाणीटंचाईची समस्या मनुष्यासाठी आहे, तशी पशुपक्ष्यांसाठीही आहे. मनुष्य तरी आरडाओरड करू शकतो, मुक्या प्राण्यांनी बिचाऱ्यांनी काय करावे? तेव्हा याही दृष्टीने नियोजन व उपाययोजना होणे गरजेचे आहे.

मनुष्याला लागते, तसे पाळीव प्राण्यांनाही ऊन लागण्याच्या घटना वाढू लागल्या असून, पशुचिकित्सालयांमध्ये गर्दी वाढली आहे. पशुखाद्यांचे भावही कमालीचे वाढले आहेत. एकतर शेती कसण्यासाठी राहिली नाही आणि दुसरीकडे पशुधन सांभाळणे अवघड ठरत आहे, त्यामुळे गुरांच्या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्याही वाढून गेली आहे. कदाचित इतरांना या गोष्टीची तीव्रता तितकीशी जाणवणारही नसेल, मात्र संबंधित घटकाची म्हणजे बळीराजाची या संदर्भातील उलाघाल असह्य ठरणारीच आहे. कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी त्याच्याकडील बैल असो, की दुभते जनावर; हे कुटुंबातल्या सदस्या सारखेच असते. पण उन्हाच्या कडाक्यात त्यांना कसे तगवायचे? त्यांच्यासाठी चारा-पाणी कुठून जुळवायचे? अशा विवंचनेत अनेक कुटुंबे आहेत.

अर्थात हेदेखील झाले पाळीव प्राण्यांचे. भटक्या पशुप्राण्यांची अवस्था तर खूपच दयनीय होते आहे. त्यांनाही पिण्याच्या पाण्याचीच मारामार, तर खाण्याचे काय असा प्रश्न आहे. त्यामुळे भूतदया दाखवीत या मुक्या जीवांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकानेच स्वयंस्फूर्तीने पुढे येणे गरजेचे आहे. हे कामही शासनाने किंवा यंत्रणांनीच करावे अशी अपेक्षा न ठेवता, यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जंगल क्षेत्रात वनविभागातर्फे कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेतच, शहरात नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. संत एकनाथांनी व्याकुळ गाढवाला पाणी पाजल्याचा आदर्श आपल्यासमोर आहेच. संतांची हीच शिकवण आचरणात आणण्याची गरज आहे.

आपल्याकडे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांकडून तसेच संध्याकाळी काही जणांकडून रस्त्यातील भटक्या कुत्र्यांना बिस्किटे वा टोस्ट खाऊ घातले जातात ही खूप समाधानाची बाब आहे. उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्थाही करायला हवी. काही ठिकाणी ती केलीही जात आहे, त्याचे प्रमाण वाढायला हवे. ‘लोकमत’मधून केल्या जात असलेल्या जनजागृती व पाठपुराव्यामुळे अनेक कुटुंबात लहान मुलांना यासंबंधीची जबाबदारी देण्यात आली असून, ते पक्ष्यांसाठी घराच्या बाल्कनीत, अंगणात वा छतावर पाण्याचे भांडे ठेवत आहेत, त्यांच्यासाठी दाण्याची सोय करत आहेत. या कृतीतून होणारे भूतदयचे व माणुसकीचे संस्कार महत्त्वाचे ठरतील.

सारांशात, उन्हाचा चटका केवळ मनुष्यालाच बसत नसून तो मुक्या जीवांनाही बसत आहे, तेव्हा भटक्या मुक्या जीवांचे उन्हापासून रक्षण करतानाच त्यांच्यासाठी दाणापाण्याची काळजी घेऊया... तीच खरी भूतदया व तोच खरा माणुसकी धर्म!