शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 13, 2025 11:57 IST

भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तिणीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जाताहेत का ?

मुंबईसारख्या महानगरातील शांतताप्रिय नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणे आणि सगळी कामं बाजूला सारून दाणे टाकण्यास सरकारला बाध्य करणे, हे वाटते तितके सोपे काम नाही; पण शांततेचं प्रतीक आणि प्रेमाचा संदेशवाहक असलेल्या कपोतांनी (कबुतरांनी) ही किमया करून दाखवली आहे! आपल्या राजकीय निष्ठा आणि विष्ठांनी महानगरांना आणि पर्यायाने नागरिकांना वेठीला धरण्याचा मक्ता आजवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या नावे होता. यात आता कबुतरांची भर पडली! हा तर माणसांच्या संगतीचा, पंक्तीचा आणि सहवासाचा परिणाम असू शकतो. मुंबईत राहून कबुतरांना एवढे शहाणपण तर आलेच असेल. आपल्या हक्कांसाठी उगीच एखाद्याच्या दारात तिष्ठत बसण्यापेक्षा फडफड करून त्यांची झोपमोड केल्याखेरीज अथवा विष्ठा करून जगणे मुश्कील केल्याशिवाय कोणालाच जाग येत नाही, हा ‘कबुतरी’ धडा मराठी माणसांनी शिकण्यासारखा आहे. राज्यातील जनतेचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून सरकार कबुतरांसाठी धडपड करत आहे. यावरून या सजीव पक्ष्याची महत्ता राजकीय पक्षांहून अधिक असल्याचे अधोरेखित होते.

पूर्वी मुंबईत सगळीकडे झाडी होती, त्यावर कावळ्यांचं राज्य होतं. दादर, परळ, लालबाग, विलेपार्ले इथे मराठी माणसांचा वावर होता. गिरणी कामगारांच्या चाळींमध्ये पितृपक्षात कावळ्यांना मिष्ठान्न मिळायचं आणि तेही पिंडीवर गपगुमान बसून आपली भूमिका बजावायचे; पण गिरण्या बंद झाल्या. झाडं तोडली गेली. टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या. मराठी माणूस उपनगरांतून बाहेर फेकला गेला. कावळे परांगदा झाले. आणि या निर्वासनाच्या पोकळीत कबुतरांनी घर केलं! आज दादरमधून मराठी माणूस हद्दपार झाला असला, तरी कबुतरखाना मात्र शाबूत आहे. दाणे टाकणाऱ्या श्रीमंतांच्या पुण्यकर्मांवर तो टिकून आहे. तुम्ही कितीही उपद्रवी असाल. जर तुमच्यामागे धनशक्ती असेल, तर तुमचं पंखही कोणी वाकडं करू शकत नाही, हा धडा कबुतरांनी शिकवला आहे.

प्रश्न केवळ मुंबईतील कबुतरांचा अथवा कोल्हापुरातील हत्तींचा नाही, तर त्या खेळात गुंतलेल्या भावना, श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा वापर करून सामान्य माणसाच्या विवेकावर अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जातात. कबुतरांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले तरी चालेल, आमच्या पुण्यकर्माच्या आड कोणी येता कामा नये, असा आग्रह कसा काय धरला जातो? कपोतांना दाणापाणी हे पुण्यकर्म कुठल्या धर्मग्रंथात सांगितले आहे?

जॉर्ज अर्वेल यांच्या ‘ॲनिमल फार्म’ या राजकीय रूपककथेत सुरुवातीला सत्तेवर आलेले प्राणी ‘आपण सर्व समान आहेत’ अशी घोषणा करतात; पण सत्ता स्थिरावत जाते, तसतसे नियम बदलतात. आणि शेवटी संविधानात बदल होतो की,“काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत!” कबुतरांच्या बाबतीत हेच तर होतंय. या जंगलातून बाहेर पडायचं असेल, तर बुद्धीवादी वर्गाने विवेक, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. नाहीतर उरतात फक्त दाणे, विष्ठा आणि फडफड...

टॅग्स :pigeonsकबुतरenvironmentपर्यावरण