शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
7
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
8
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
11
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
12
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
13
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
14
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
15
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
16
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
17
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
18
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
19
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
20
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम

चला कबुतरं उडवूया! भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान, विवेकाला फाटा देणार आहोत का?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 13, 2025 11:57 IST

भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तिणीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचे दुर्भिक्ष, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जाताहेत का ?

मुंबईसारख्या महानगरातील शांतताप्रिय नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणे आणि सगळी कामं बाजूला सारून दाणे टाकण्यास सरकारला बाध्य करणे, हे वाटते तितके सोपे काम नाही; पण शांततेचं प्रतीक आणि प्रेमाचा संदेशवाहक असलेल्या कपोतांनी (कबुतरांनी) ही किमया करून दाखवली आहे! आपल्या राजकीय निष्ठा आणि विष्ठांनी महानगरांना आणि पर्यायाने नागरिकांना वेठीला धरण्याचा मक्ता आजवर राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांच्या नावे होता. यात आता कबुतरांची भर पडली! हा तर माणसांच्या संगतीचा, पंक्तीचा आणि सहवासाचा परिणाम असू शकतो. मुंबईत राहून कबुतरांना एवढे शहाणपण तर आलेच असेल. आपल्या हक्कांसाठी उगीच एखाद्याच्या दारात तिष्ठत बसण्यापेक्षा फडफड करून त्यांची झोपमोड केल्याखेरीज अथवा विष्ठा करून जगणे मुश्कील केल्याशिवाय कोणालाच जाग येत नाही, हा ‘कबुतरी’ धडा मराठी माणसांनी शिकण्यासारखा आहे. राज्यातील जनतेचे सगळे प्रश्न बाजूला ठेवून सरकार कबुतरांसाठी धडपड करत आहे. यावरून या सजीव पक्ष्याची महत्ता राजकीय पक्षांहून अधिक असल्याचे अधोरेखित होते.

पूर्वी मुंबईत सगळीकडे झाडी होती, त्यावर कावळ्यांचं राज्य होतं. दादर, परळ, लालबाग, विलेपार्ले इथे मराठी माणसांचा वावर होता. गिरणी कामगारांच्या चाळींमध्ये पितृपक्षात कावळ्यांना मिष्ठान्न मिळायचं आणि तेही पिंडीवर गपगुमान बसून आपली भूमिका बजावायचे; पण गिरण्या बंद झाल्या. झाडं तोडली गेली. टोलेजंगी इमारती उभ्या राहिल्या. मराठी माणूस उपनगरांतून बाहेर फेकला गेला. कावळे परांगदा झाले. आणि या निर्वासनाच्या पोकळीत कबुतरांनी घर केलं! आज दादरमधून मराठी माणूस हद्दपार झाला असला, तरी कबुतरखाना मात्र शाबूत आहे. दाणे टाकणाऱ्या श्रीमंतांच्या पुण्यकर्मांवर तो टिकून आहे. तुम्ही कितीही उपद्रवी असाल. जर तुमच्यामागे धनशक्ती असेल, तर तुमचं पंखही कोणी वाकडं करू शकत नाही, हा धडा कबुतरांनी शिकवला आहे.

प्रश्न केवळ मुंबईतील कबुतरांचा अथवा कोल्हापुरातील हत्तींचा नाही, तर त्या खेळात गुंतलेल्या भावना, श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा वापर करून सामान्य माणसाच्या विवेकावर अतिक्रमण करणाऱ्या प्रवृत्तीचा आहे. भूतदयेच्या नावाखाली आपण विज्ञान आणि विवेकाला फाटा देणार आहोत का? महादेवी हत्तीवरून सुरू झालेला वाद केवळ श्रद्धा व विज्ञान यामधील संघर्ष नाही. यात एक सुसूत्र आखणी आहे. शेतकरी आत्महत्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य, शिक्षण-आरोग्याच्या समस्या यांसारख्या खऱ्या प्रश्नांपासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे रंगवले जातात. कबुतरांमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले तरी चालेल, आमच्या पुण्यकर्माच्या आड कोणी येता कामा नये, असा आग्रह कसा काय धरला जातो? कपोतांना दाणापाणी हे पुण्यकर्म कुठल्या धर्मग्रंथात सांगितले आहे?

जॉर्ज अर्वेल यांच्या ‘ॲनिमल फार्म’ या राजकीय रूपककथेत सुरुवातीला सत्तेवर आलेले प्राणी ‘आपण सर्व समान आहेत’ अशी घोषणा करतात; पण सत्ता स्थिरावत जाते, तसतसे नियम बदलतात. आणि शेवटी संविधानात बदल होतो की,“काही प्राणी इतरांपेक्षा अधिक समान आहेत!” कबुतरांच्या बाबतीत हेच तर होतंय. या जंगलातून बाहेर पडायचं असेल, तर बुद्धीवादी वर्गाने विवेक, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. नाहीतर उरतात फक्त दाणे, विष्ठा आणि फडफड...

टॅग्स :pigeonsकबुतरenvironmentपर्यावरण