शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मलईही शेतकऱ्यांनाच मिळू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

दुधाला चांगला दर मिळावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून शेतकरी महासंघाने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहराकडे जाणारा भाजीपाला व दूध रोखून धरले आहे. आपल्या पाडसासाठी पान्हावलेल्या गाई-म्हशींच्या पाडसांच्या तोंडचे दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे किंवा मोफत वाटले जात आहे.

- बाळासाहेब बोचरेदुधाला चांगला दर मिळावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून शेतकरी महासंघाने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहराकडे जाणारा भाजीपाला व दूध रोखून धरले आहे. आपल्या पाडसासाठी पान्हावलेल्या गाई-म्हशींच्या पाडसांच्या तोंडचे दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे किंवा मोफत वाटले जात आहे. नाकाबंदी करण्यासाठी रस्त्यावरच ‘दूध प्या दूध’ म्हणायची वेळ आली आहे. अद्याप महाराष्टÑात त्या आंदोलनाची झळ पोहोचली नसली तरी उत्तर भारतात या आंदोलनाचे परिणाम दिसू लागले आहेत. दुधाचे दर वाढवून द्या ही आंदोलकांची मागणी आहे. त्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या महासंघाने आंदोलकांचे नेतृत्व केले आहे. शेतकºयांना योग्य भाव मिळालाच पाहिजे यामध्ये कोणत्याच राजकीय पक्षाचे दुमत असण्याचे कारण नाही. आंदोलन शेतकºयांचे असले तरी बºयाच वेळेला शेतकरी बाजूलाच राहतो आणि ज्यांचे हितसंबंध आहेत तेच आंदोलनात उतरल्याचे दिसते. वर्षानुवर्षे सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकºयांचा ढाल म्हणूनच वापर केलेला आहे. गतवर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पूर्णत: राजकीय पार्श्वभूमी असल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला २७ रुपये लिटर भाव जाहीर केला. पण वर्षभरात त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी ज्यासाठी आंदोलन झाले त्याचे फलित शेतकºयांना मिळालेच नाही. राज्यातील दूध संकलन करणाºया संस्था कुणाच्या हातात आहेत हे शेतकºयांना चांगले माहीत आहे. सरकारने जरी दर वाढवून दिला तरी तो द्यायचा की नाही हे दूध संस्थाचालकांच्याच हातात होते. सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दराने म्हणजे १९ ते २१ रुपये दराने या संस्थांनी दूध खरेदी केल्यामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. चाणाक्ष शेतकºयांनी या आंदोलनाचे आत्मपरीक्षण केलेले दिसते. त्यामुळे यावेळच्या आंदोलनाला अद्याप तरी धार आलेली दिसत नाही. खुल्या बाजारात मुंबई वगळता राज्याच्या ग्रामीण भागात पॅकिंग केलेल्या दुधाचा भाव ४४ रुपये लिटर आहे आणि खरेदी मात्र २० रुपये लिटर. त्यामुळे लिटरमागे तब्बल २४ रुपये कुठे जातात हे शेतकºयांना कुणीच सांगत नाही किंवा कळू देत नाही. दुधाची उपलब्धता म्हणावी तर तीही कमीच आहे. देशात दूध उत्पादनात महाराष्टÑ सातव्या क्रमांकावर आहे. तरीही राज्यात उत्पादित होणारे दूध हे राज्याला पुरेसे नाही. राज्यात आजमितीला ८७ लाख लिटर दुधाचे संकलन होते. म्हणजे माणसी सरासरी केवळ ७० मिली इतके दुधाचे उत्पादन आहे. तरीही दुधाला योग्य भाव मिळत नाही याचे अश्चर्य वाटते. गरजेपेक्षा जादा दूध कुठून येते याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. नुसता दर जाहीर केला म्हणजे सरकारचे काम संपले असे होत नाही. किमान सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देणे संस्थांना परवडतो की नाही हे पहावे. परवडत असूनही ज्या संस्था शेतकºयांना जाहीर दर देत नसतील तर अशा संस्थांवर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. राज्यात अतिरिक्त दूध झाले असेल तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय केले पाहिजे. आज आंदोलन करतो शेतकरी. दर जाहीर करते सरकार अन् मलई मिळते दुसºयालाच अशी अवस्था होऊन बसली आहे. शेतकºयांच्या आंदोलनाची मलई शेतकºयांनाच मिळायला हवी. 

टॅग्स :Farmerशेतकरी