शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मलईही शेतकऱ्यांनाच मिळू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

दुधाला चांगला दर मिळावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून शेतकरी महासंघाने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहराकडे जाणारा भाजीपाला व दूध रोखून धरले आहे. आपल्या पाडसासाठी पान्हावलेल्या गाई-म्हशींच्या पाडसांच्या तोंडचे दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे किंवा मोफत वाटले जात आहे.

- बाळासाहेब बोचरेदुधाला चांगला दर मिळावा म्हणून गेल्या चार दिवसांपासून शेतकरी महासंघाने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहराकडे जाणारा भाजीपाला व दूध रोखून धरले आहे. आपल्या पाडसासाठी पान्हावलेल्या गाई-म्हशींच्या पाडसांच्या तोंडचे दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे किंवा मोफत वाटले जात आहे. नाकाबंदी करण्यासाठी रस्त्यावरच ‘दूध प्या दूध’ म्हणायची वेळ आली आहे. अद्याप महाराष्टÑात त्या आंदोलनाची झळ पोहोचली नसली तरी उत्तर भारतात या आंदोलनाचे परिणाम दिसू लागले आहेत. दुधाचे दर वाढवून द्या ही आंदोलकांची मागणी आहे. त्यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या महासंघाने आंदोलकांचे नेतृत्व केले आहे. शेतकºयांना योग्य भाव मिळालाच पाहिजे यामध्ये कोणत्याच राजकीय पक्षाचे दुमत असण्याचे कारण नाही. आंदोलन शेतकºयांचे असले तरी बºयाच वेळेला शेतकरी बाजूलाच राहतो आणि ज्यांचे हितसंबंध आहेत तेच आंदोलनात उतरल्याचे दिसते. वर्षानुवर्षे सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकºयांचा ढाल म्हणूनच वापर केलेला आहे. गतवर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनाला पूर्णत: राजकीय पार्श्वभूमी असल्याचे दिसून आले. गतवर्षीच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला २७ रुपये लिटर भाव जाहीर केला. पण वर्षभरात त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी ज्यासाठी आंदोलन झाले त्याचे फलित शेतकºयांना मिळालेच नाही. राज्यातील दूध संकलन करणाºया संस्था कुणाच्या हातात आहेत हे शेतकºयांना चांगले माहीत आहे. सरकारने जरी दर वाढवून दिला तरी तो द्यायचा की नाही हे दूध संस्थाचालकांच्याच हातात होते. सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दराने म्हणजे १९ ते २१ रुपये दराने या संस्थांनी दूध खरेदी केल्यामुळे शेतकºयांच्या पदरात काहीच पडले नाही. चाणाक्ष शेतकºयांनी या आंदोलनाचे आत्मपरीक्षण केलेले दिसते. त्यामुळे यावेळच्या आंदोलनाला अद्याप तरी धार आलेली दिसत नाही. खुल्या बाजारात मुंबई वगळता राज्याच्या ग्रामीण भागात पॅकिंग केलेल्या दुधाचा भाव ४४ रुपये लिटर आहे आणि खरेदी मात्र २० रुपये लिटर. त्यामुळे लिटरमागे तब्बल २४ रुपये कुठे जातात हे शेतकºयांना कुणीच सांगत नाही किंवा कळू देत नाही. दुधाची उपलब्धता म्हणावी तर तीही कमीच आहे. देशात दूध उत्पादनात महाराष्टÑ सातव्या क्रमांकावर आहे. तरीही राज्यात उत्पादित होणारे दूध हे राज्याला पुरेसे नाही. राज्यात आजमितीला ८७ लाख लिटर दुधाचे संकलन होते. म्हणजे माणसी सरासरी केवळ ७० मिली इतके दुधाचे उत्पादन आहे. तरीही दुधाला योग्य भाव मिळत नाही याचे अश्चर्य वाटते. गरजेपेक्षा जादा दूध कुठून येते याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. नुसता दर जाहीर केला म्हणजे सरकारचे काम संपले असे होत नाही. किमान सरकारने जाहीर केलेला २७ रुपये दर देणे संस्थांना परवडतो की नाही हे पहावे. परवडत असूनही ज्या संस्था शेतकºयांना जाहीर दर देत नसतील तर अशा संस्थांवर कारवाईचा बडगा उगारलाच पाहिजे. राज्यात अतिरिक्त दूध झाले असेल तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय केले पाहिजे. आज आंदोलन करतो शेतकरी. दर जाहीर करते सरकार अन् मलई मिळते दुसºयालाच अशी अवस्था होऊन बसली आहे. शेतकºयांच्या आंदोलनाची मलई शेतकºयांनाच मिळायला हवी. 

टॅग्स :Farmerशेतकरी