शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

...किमान गरिबांच्या ताटातील घास हिरावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ...

मिलिंद कुलकर्णीयुध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. आपल्या ताटातील अर्ध्या भाकरीचा निम्मा तुकडा मुक्या प्राण्याला देणारा निर्धन व्यक्ती जसा असतो, तसा गरिबांसाठी असलेले धान्य हिसकावून त्याचा काळाबाजार करणारे श्रीमंत देखील असतात. सभोवताली असेच चित्र दिसून येत आहे.चित्रपटाची आवड असलेल्या मंडळींना जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपटातील काही प्रसंगाची पुनरावृत्ती ‘कोरोना’च्या संकटकाळात होत असल्याची अनुभूती आली असेल. चित्रपटातील व्यापारी गरिबांसाठी असलेले अन्नधान्य गोदामात साठवून ठेवतो आणि चित्रपटातील नायक गोदाम फोडून त्याचे वाटप करतो, अनाथ, निर्धनांना दिलदार मनाचा गरीब नायक आधार देतो असे प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. डोळ्यांच्या कडा पाणावतात. अगदी तसे घडताना दिसत आहे. एकीकडे जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलीस या विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा इमाने इतबारे करीत आहे तर काही विभाग मात्र सेवा बजावण्याऐवजी मेवा कसा मिळेल, याची चिंता करीत आहे.लॉकडाऊनच्या काळात गुटख्याचा साठा, अवैध दारुचे कारखाने उध्वस्त केल्याच्या कारवाई होत आहे. दारु दुकानांच्या गोदामाचे सील उघडून सर्रास दारुविक्री केली जात आहे. तब्बल १२ हजार बाटल्यांची विक्री केवळ एका गोदामातून झाल्याचे जळगावात उघड झाले. नंदुरबारातील दसरा चौकातील गोदामात अवैध दारुचा कारखाना चालविला जात असल्याचे आढळून आले. नंदुरबारात उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून सव्वा पाच लाखांची विदेशी दारु चोरट्यांनी लांबवली. एकीकडे जिवाला धोका असताना काही मात्र संकटकाळातही स्वार्थी प्रवृत्तीला लगाम घालू शकत नाही.हीच स्थिती स्वस्त धान्य दुकानांबाबतीत आहे. देशातील ८० कोटी लोकांना सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र हक्काचे धान्य जनतेला मिळत नाही. भ्रष्टाचाराची साखळी आपत्तीकाळातही सक्रीय आहे. त्याचा उद्रेक मग समाजमाध्यमाच्या रुपाने किंवा तहसील कार्यालयात आंदोलनाच्या कृतीने होत आहे. महिना झाला हाताला काम नाही, जमापुंजी संपत आलेली असताना दोन वेळेच्या जेवणासाठी किमान अन्नधान्य सहजपणे मिळायला काय हरकत आहे? रावेर तालुक्यातील वाघोडच्या एका तरुणाने व्हीडिओ तयार करुन रेशन दुकानदाराची मनमानी उघड केली. तेव्हा कुठे त्या दुकानदाराचा परवाना रद्द झाला. जळगावात तहसील कार्यालयात रेशनकार्ड परत करण्याच्या मागणीसाठी २०० लोक जमा झाले. त्यांना समाधानकारक उत्तराऐवजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. सामान्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागत आहे. जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी आठवडाभर बँकांच्या बाहेर ४० अंश तपमानात पाच -पाच तास उभे राहिले की गरिबांची गरज आणि निकट कळेल. अन्यथा सामान्यांसाठी प्रशासन हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेल.देशभरातील असंख्य मजूर पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे परतत आहे. हजारो कि.मी.ची पायपीट करीत आहे. निवारागृहात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. किमान त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सुखकर राहील, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. घरदार सोडून जिवाच्या भितीने फिरणाऱ्या या मंडळींचा क्वारंटाईनचा हा काळ चांगला जावा, म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. काही ते करीत आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. यवतमाळच्या एका मातेने पिंपळनेरला कन्येला जन्म दिला, काय स्वप्न पाहिली असतील बाळंतपणाची आणि काय घडले, हे आपण पहात आहोत. माणुसकी, संवेदना हे काही फक्त शब्द नाही, जगण्याचा मंत्र आहे, तो जितक्या लवकर आम्हाला उमगेल तो आमच्या माणूसपणाचा विजय असेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव