शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

...किमान गरिबांच्या ताटातील घास हिरावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ...

मिलिंद कुलकर्णीयुध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. आपल्या ताटातील अर्ध्या भाकरीचा निम्मा तुकडा मुक्या प्राण्याला देणारा निर्धन व्यक्ती जसा असतो, तसा गरिबांसाठी असलेले धान्य हिसकावून त्याचा काळाबाजार करणारे श्रीमंत देखील असतात. सभोवताली असेच चित्र दिसून येत आहे.चित्रपटाची आवड असलेल्या मंडळींना जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपटातील काही प्रसंगाची पुनरावृत्ती ‘कोरोना’च्या संकटकाळात होत असल्याची अनुभूती आली असेल. चित्रपटातील व्यापारी गरिबांसाठी असलेले अन्नधान्य गोदामात साठवून ठेवतो आणि चित्रपटातील नायक गोदाम फोडून त्याचे वाटप करतो, अनाथ, निर्धनांना दिलदार मनाचा गरीब नायक आधार देतो असे प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. डोळ्यांच्या कडा पाणावतात. अगदी तसे घडताना दिसत आहे. एकीकडे जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलीस या विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा इमाने इतबारे करीत आहे तर काही विभाग मात्र सेवा बजावण्याऐवजी मेवा कसा मिळेल, याची चिंता करीत आहे.लॉकडाऊनच्या काळात गुटख्याचा साठा, अवैध दारुचे कारखाने उध्वस्त केल्याच्या कारवाई होत आहे. दारु दुकानांच्या गोदामाचे सील उघडून सर्रास दारुविक्री केली जात आहे. तब्बल १२ हजार बाटल्यांची विक्री केवळ एका गोदामातून झाल्याचे जळगावात उघड झाले. नंदुरबारातील दसरा चौकातील गोदामात अवैध दारुचा कारखाना चालविला जात असल्याचे आढळून आले. नंदुरबारात उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून सव्वा पाच लाखांची विदेशी दारु चोरट्यांनी लांबवली. एकीकडे जिवाला धोका असताना काही मात्र संकटकाळातही स्वार्थी प्रवृत्तीला लगाम घालू शकत नाही.हीच स्थिती स्वस्त धान्य दुकानांबाबतीत आहे. देशातील ८० कोटी लोकांना सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र हक्काचे धान्य जनतेला मिळत नाही. भ्रष्टाचाराची साखळी आपत्तीकाळातही सक्रीय आहे. त्याचा उद्रेक मग समाजमाध्यमाच्या रुपाने किंवा तहसील कार्यालयात आंदोलनाच्या कृतीने होत आहे. महिना झाला हाताला काम नाही, जमापुंजी संपत आलेली असताना दोन वेळेच्या जेवणासाठी किमान अन्नधान्य सहजपणे मिळायला काय हरकत आहे? रावेर तालुक्यातील वाघोडच्या एका तरुणाने व्हीडिओ तयार करुन रेशन दुकानदाराची मनमानी उघड केली. तेव्हा कुठे त्या दुकानदाराचा परवाना रद्द झाला. जळगावात तहसील कार्यालयात रेशनकार्ड परत करण्याच्या मागणीसाठी २०० लोक जमा झाले. त्यांना समाधानकारक उत्तराऐवजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. सामान्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागत आहे. जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी आठवडाभर बँकांच्या बाहेर ४० अंश तपमानात पाच -पाच तास उभे राहिले की गरिबांची गरज आणि निकट कळेल. अन्यथा सामान्यांसाठी प्रशासन हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेल.देशभरातील असंख्य मजूर पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे परतत आहे. हजारो कि.मी.ची पायपीट करीत आहे. निवारागृहात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. किमान त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सुखकर राहील, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. घरदार सोडून जिवाच्या भितीने फिरणाऱ्या या मंडळींचा क्वारंटाईनचा हा काळ चांगला जावा, म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. काही ते करीत आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. यवतमाळच्या एका मातेने पिंपळनेरला कन्येला जन्म दिला, काय स्वप्न पाहिली असतील बाळंतपणाची आणि काय घडले, हे आपण पहात आहोत. माणुसकी, संवेदना हे काही फक्त शब्द नाही, जगण्याचा मंत्र आहे, तो जितक्या लवकर आम्हाला उमगेल तो आमच्या माणूसपणाचा विजय असेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव