शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

...किमान गरिबांच्या ताटातील घास हिरावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ...

मिलिंद कुलकर्णीयुध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. आपल्या ताटातील अर्ध्या भाकरीचा निम्मा तुकडा मुक्या प्राण्याला देणारा निर्धन व्यक्ती जसा असतो, तसा गरिबांसाठी असलेले धान्य हिसकावून त्याचा काळाबाजार करणारे श्रीमंत देखील असतात. सभोवताली असेच चित्र दिसून येत आहे.चित्रपटाची आवड असलेल्या मंडळींना जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपटातील काही प्रसंगाची पुनरावृत्ती ‘कोरोना’च्या संकटकाळात होत असल्याची अनुभूती आली असेल. चित्रपटातील व्यापारी गरिबांसाठी असलेले अन्नधान्य गोदामात साठवून ठेवतो आणि चित्रपटातील नायक गोदाम फोडून त्याचे वाटप करतो, अनाथ, निर्धनांना दिलदार मनाचा गरीब नायक आधार देतो असे प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. डोळ्यांच्या कडा पाणावतात. अगदी तसे घडताना दिसत आहे. एकीकडे जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलीस या विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा इमाने इतबारे करीत आहे तर काही विभाग मात्र सेवा बजावण्याऐवजी मेवा कसा मिळेल, याची चिंता करीत आहे.लॉकडाऊनच्या काळात गुटख्याचा साठा, अवैध दारुचे कारखाने उध्वस्त केल्याच्या कारवाई होत आहे. दारु दुकानांच्या गोदामाचे सील उघडून सर्रास दारुविक्री केली जात आहे. तब्बल १२ हजार बाटल्यांची विक्री केवळ एका गोदामातून झाल्याचे जळगावात उघड झाले. नंदुरबारातील दसरा चौकातील गोदामात अवैध दारुचा कारखाना चालविला जात असल्याचे आढळून आले. नंदुरबारात उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून सव्वा पाच लाखांची विदेशी दारु चोरट्यांनी लांबवली. एकीकडे जिवाला धोका असताना काही मात्र संकटकाळातही स्वार्थी प्रवृत्तीला लगाम घालू शकत नाही.हीच स्थिती स्वस्त धान्य दुकानांबाबतीत आहे. देशातील ८० कोटी लोकांना सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र हक्काचे धान्य जनतेला मिळत नाही. भ्रष्टाचाराची साखळी आपत्तीकाळातही सक्रीय आहे. त्याचा उद्रेक मग समाजमाध्यमाच्या रुपाने किंवा तहसील कार्यालयात आंदोलनाच्या कृतीने होत आहे. महिना झाला हाताला काम नाही, जमापुंजी संपत आलेली असताना दोन वेळेच्या जेवणासाठी किमान अन्नधान्य सहजपणे मिळायला काय हरकत आहे? रावेर तालुक्यातील वाघोडच्या एका तरुणाने व्हीडिओ तयार करुन रेशन दुकानदाराची मनमानी उघड केली. तेव्हा कुठे त्या दुकानदाराचा परवाना रद्द झाला. जळगावात तहसील कार्यालयात रेशनकार्ड परत करण्याच्या मागणीसाठी २०० लोक जमा झाले. त्यांना समाधानकारक उत्तराऐवजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. सामान्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागत आहे. जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी आठवडाभर बँकांच्या बाहेर ४० अंश तपमानात पाच -पाच तास उभे राहिले की गरिबांची गरज आणि निकट कळेल. अन्यथा सामान्यांसाठी प्रशासन हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेल.देशभरातील असंख्य मजूर पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे परतत आहे. हजारो कि.मी.ची पायपीट करीत आहे. निवारागृहात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. किमान त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सुखकर राहील, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. घरदार सोडून जिवाच्या भितीने फिरणाऱ्या या मंडळींचा क्वारंटाईनचा हा काळ चांगला जावा, म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. काही ते करीत आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. यवतमाळच्या एका मातेने पिंपळनेरला कन्येला जन्म दिला, काय स्वप्न पाहिली असतील बाळंतपणाची आणि काय घडले, हे आपण पहात आहोत. माणुसकी, संवेदना हे काही फक्त शब्द नाही, जगण्याचा मंत्र आहे, तो जितक्या लवकर आम्हाला उमगेल तो आमच्या माणूसपणाचा विजय असेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव