शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

...किमान गरिबांच्या ताटातील घास हिरावू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:07 IST

मिलिंद कुलकर्णी युध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. ...

मिलिंद कुलकर्णीयुध्द, साथीचे आजार, महापूर, दुष्काळ अशा आपत्तीच्या काळात समाजातील दोन प्रवृत्ती ठळकपणे दिसून येतात. सद्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती. आपल्या ताटातील अर्ध्या भाकरीचा निम्मा तुकडा मुक्या प्राण्याला देणारा निर्धन व्यक्ती जसा असतो, तसा गरिबांसाठी असलेले धान्य हिसकावून त्याचा काळाबाजार करणारे श्रीमंत देखील असतात. सभोवताली असेच चित्र दिसून येत आहे.चित्रपटाची आवड असलेल्या मंडळींना जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपटातील काही प्रसंगाची पुनरावृत्ती ‘कोरोना’च्या संकटकाळात होत असल्याची अनुभूती आली असेल. चित्रपटातील व्यापारी गरिबांसाठी असलेले अन्नधान्य गोदामात साठवून ठेवतो आणि चित्रपटातील नायक गोदाम फोडून त्याचे वाटप करतो, अनाथ, निर्धनांना दिलदार मनाचा गरीब नायक आधार देतो असे प्रसंग हृदयाला जाऊन भिडतात. डोळ्यांच्या कडा पाणावतात. अगदी तसे घडताना दिसत आहे. एकीकडे जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलीस या विभागाचे कर्मचारी त्यांची सेवा इमाने इतबारे करीत आहे तर काही विभाग मात्र सेवा बजावण्याऐवजी मेवा कसा मिळेल, याची चिंता करीत आहे.लॉकडाऊनच्या काळात गुटख्याचा साठा, अवैध दारुचे कारखाने उध्वस्त केल्याच्या कारवाई होत आहे. दारु दुकानांच्या गोदामाचे सील उघडून सर्रास दारुविक्री केली जात आहे. तब्बल १२ हजार बाटल्यांची विक्री केवळ एका गोदामातून झाल्याचे जळगावात उघड झाले. नंदुरबारातील दसरा चौकातील गोदामात अवैध दारुचा कारखाना चालविला जात असल्याचे आढळून आले. नंदुरबारात उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडून सव्वा पाच लाखांची विदेशी दारु चोरट्यांनी लांबवली. एकीकडे जिवाला धोका असताना काही मात्र संकटकाळातही स्वार्थी प्रवृत्तीला लगाम घालू शकत नाही.हीच स्थिती स्वस्त धान्य दुकानांबाबतीत आहे. देशातील ८० कोटी लोकांना सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य देण्याची घोषणा केली आहे. मात्र हक्काचे धान्य जनतेला मिळत नाही. भ्रष्टाचाराची साखळी आपत्तीकाळातही सक्रीय आहे. त्याचा उद्रेक मग समाजमाध्यमाच्या रुपाने किंवा तहसील कार्यालयात आंदोलनाच्या कृतीने होत आहे. महिना झाला हाताला काम नाही, जमापुंजी संपत आलेली असताना दोन वेळेच्या जेवणासाठी किमान अन्नधान्य सहजपणे मिळायला काय हरकत आहे? रावेर तालुक्यातील वाघोडच्या एका तरुणाने व्हीडिओ तयार करुन रेशन दुकानदाराची मनमानी उघड केली. तेव्हा कुठे त्या दुकानदाराचा परवाना रद्द झाला. जळगावात तहसील कार्यालयात रेशनकार्ड परत करण्याच्या मागणीसाठी २०० लोक जमा झाले. त्यांना समाधानकारक उत्तराऐवजी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. सामान्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी एवढा खटाटोप का करावा लागत आहे. जनधन खात्यातील पाचशे रुपये काढण्यासाठी आठवडाभर बँकांच्या बाहेर ४० अंश तपमानात पाच -पाच तास उभे राहिले की गरिबांची गरज आणि निकट कळेल. अन्यथा सामान्यांसाठी प्रशासन हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर शोभेल.देशभरातील असंख्य मजूर पायी, मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे परतत आहे. हजारो कि.मी.ची पायपीट करीत आहे. निवारागृहात त्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. किमान त्यांची निवास आणि भोजन व्यवस्था सुखकर राहील, याची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. घरदार सोडून जिवाच्या भितीने फिरणाऱ्या या मंडळींचा क्वारंटाईनचा हा काळ चांगला जावा, म्हणून स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. काही ते करीत आहे, पण प्रमाण खूप कमी आहे. यवतमाळच्या एका मातेने पिंपळनेरला कन्येला जन्म दिला, काय स्वप्न पाहिली असतील बाळंतपणाची आणि काय घडले, हे आपण पहात आहोत. माणुसकी, संवेदना हे काही फक्त शब्द नाही, जगण्याचा मंत्र आहे, तो जितक्या लवकर आम्हाला उमगेल तो आमच्या माणूसपणाचा विजय असेल.

टॅग्स :Jalgaonजळगाव