शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:25 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे. लोकशाही सुरक्षित राखायची तर पंतप्रधानांच्या पदाला पर्यायी ठरू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांजवळ असणे गरजेचे आहे. राहुल गांधी (व डॉ. मनमोहन सिंग) यांचा अपवाद वगळता मोदींना तोंड देऊन त्यांना बचावाच्या पवित्र्यात आणू शकेल असा दुसरा नेता आज देशात नाही. नितीशकुमारांपासून शरद पवारांपर्यंतचे आणि अमरिंदरसिंगापासून ममता - मुलायमांपर्यंतचे नेते जुने, अनुभवी व मोठे असले तरी त्यांना राष्टÑीय प्रतिमा कधी लाभली नाही व यापुढेही ती लाभण्याची शक्यता नाही. राहुल गांधींनी स्वत:ला प्रादेशिक प्रश्नांशी जुळवून ठेवले असले तरी आपली प्रतिमा त्यांनी नेहमीच राष्टÑीय राखली. त्यांच्या टीकेचा व हल्ल्यांचा रोख ‘अमित शहा’ हाही कधी नव्हता. तो सरळ नरेंद्र मोदींवर होता. त्यांच्या सरकारवर ‘सुटाबुटाचे सरकार’ म्हणून त्यांनी संसदेत जो हल्ला चढविला त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि दुसºया कोणा प्रादेशिक पुढाºयावर निशाणाही साधला नाही. वास्तविक त्यांनी मनात आणले असते तर राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतरच पक्षाचे सर्वोच्च पद त्यांच्याकडे आले असते. पण ज्येष्ठांचा मान राखत व आपल्याजवळ अनुभवांची मोठी जंत्री जमवीत त्यांनी ते पद त्यांच्या मातेकडे, सोनिया गांधींकडे दिले. सोनियाजींनी ते तब्बल १९ वर्षे सांभाळल्यानंतर राहुल गांधींची त्यावर आता सन्मानाने निवड होत आहे. दरम्यानचा काळ राहुल गांधींसाठी सोपा राहिला नव्हता. दरदिवशी व दरक्षणी त्यांची अतिशय कठोर व काटेरी परीक्षा होत राहिली. त्यांची अवहेलना, टवाळी आणि टिंगल करण्याची कोणतीही संधी भाजपाच्या अतिशय चिल्लर पुढाºयांनीही कधी सोडली नाही. घराणेशाहीचा आरोप पुन्हा होताच. त्या घराण्याचा त्याग त्यांच्या टीकाकारांनी कधी मनावर घेतला नाही. त्यांना ‘पप्पू’ म्हटले गेले. त्यांच्यावर अननुभवाचा आरोप केला गेला आणि मोदींच्या तुलनेत ते काहीच नसल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांच्या वाट्याला पंजाब आणि कर्नाटकचे विजय सोडले तर पराभवही फार आले. मात्र या सबंध काळात राहुल गांधी कधी खचल्याचे वा थांबल्याचे दिसले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास व लढाऊबाणा दिवसेंदिवस वाढत गेल्याचाच जनतेला दिसला आणि आता तर त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत मोदी आणि शहा यांना त्यांच्या पक्षासह जेरीलाच आणले आहे. २२ वर्षे गुजरातमध्ये राज्य केलेल्या भाजपाला राहुल गांधींच्या धडाक्यामुळे पूर्ण विजय मिळेल की नाही याविषयीचीच शंका राजकीय वर्तुळात आता व्यक्त होत आहे. हार्दिक पटेलसह त्या राज्यातील अनेक तरुण नेत्यांना सोबत घेण्यात त्यांनी जी राजकीय चतुराई व प्रगतीपण दाखविले त्यामुळे तर त्यांच्या टीकाकारांची तोंडेच बंद झाली आहेत. अन्य नेते संघ व भाजपावर टीका करताना हातचे राखताना दिसतात. ते मोदींवर टीका करीत नाहीत. राहुल गांधींचा निशाणा मात्र त्या साºयांवर असतो. तो त्यांच्या धर्मांध राजकारणावर, मोदींच्या अर्थकारणावर आणि संघ परिवाराने देशात माजविलेल्या धार्मिक दुहीवर असतो. हा परिवार देशात एकात्मता आणणार नाही. त्यात तो दुहीची बीजे पेरील ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगतात. त्या आक्रमक वृत्तीत त्यांनी आपल्या पक्षातील इतर नेत्यांनाही आता मागे टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व त्यांच्या हाती आता येणे आवश्यकही झाले आहे. त्यांचे नेतृत्व तरुणाईलाही आवडणारे आहे आणि ते देशाला विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या दिशेने नेणारेही राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी