शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:25 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे. लोकशाही सुरक्षित राखायची तर पंतप्रधानांच्या पदाला पर्यायी ठरू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांजवळ असणे गरजेचे आहे. राहुल गांधी (व डॉ. मनमोहन सिंग) यांचा अपवाद वगळता मोदींना तोंड देऊन त्यांना बचावाच्या पवित्र्यात आणू शकेल असा दुसरा नेता आज देशात नाही. नितीशकुमारांपासून शरद पवारांपर्यंतचे आणि अमरिंदरसिंगापासून ममता - मुलायमांपर्यंतचे नेते जुने, अनुभवी व मोठे असले तरी त्यांना राष्टÑीय प्रतिमा कधी लाभली नाही व यापुढेही ती लाभण्याची शक्यता नाही. राहुल गांधींनी स्वत:ला प्रादेशिक प्रश्नांशी जुळवून ठेवले असले तरी आपली प्रतिमा त्यांनी नेहमीच राष्टÑीय राखली. त्यांच्या टीकेचा व हल्ल्यांचा रोख ‘अमित शहा’ हाही कधी नव्हता. तो सरळ नरेंद्र मोदींवर होता. त्यांच्या सरकारवर ‘सुटाबुटाचे सरकार’ म्हणून त्यांनी संसदेत जो हल्ला चढविला त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि दुसºया कोणा प्रादेशिक पुढाºयावर निशाणाही साधला नाही. वास्तविक त्यांनी मनात आणले असते तर राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतरच पक्षाचे सर्वोच्च पद त्यांच्याकडे आले असते. पण ज्येष्ठांचा मान राखत व आपल्याजवळ अनुभवांची मोठी जंत्री जमवीत त्यांनी ते पद त्यांच्या मातेकडे, सोनिया गांधींकडे दिले. सोनियाजींनी ते तब्बल १९ वर्षे सांभाळल्यानंतर राहुल गांधींची त्यावर आता सन्मानाने निवड होत आहे. दरम्यानचा काळ राहुल गांधींसाठी सोपा राहिला नव्हता. दरदिवशी व दरक्षणी त्यांची अतिशय कठोर व काटेरी परीक्षा होत राहिली. त्यांची अवहेलना, टवाळी आणि टिंगल करण्याची कोणतीही संधी भाजपाच्या अतिशय चिल्लर पुढाºयांनीही कधी सोडली नाही. घराणेशाहीचा आरोप पुन्हा होताच. त्या घराण्याचा त्याग त्यांच्या टीकाकारांनी कधी मनावर घेतला नाही. त्यांना ‘पप्पू’ म्हटले गेले. त्यांच्यावर अननुभवाचा आरोप केला गेला आणि मोदींच्या तुलनेत ते काहीच नसल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांच्या वाट्याला पंजाब आणि कर्नाटकचे विजय सोडले तर पराभवही फार आले. मात्र या सबंध काळात राहुल गांधी कधी खचल्याचे वा थांबल्याचे दिसले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास व लढाऊबाणा दिवसेंदिवस वाढत गेल्याचाच जनतेला दिसला आणि आता तर त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत मोदी आणि शहा यांना त्यांच्या पक्षासह जेरीलाच आणले आहे. २२ वर्षे गुजरातमध्ये राज्य केलेल्या भाजपाला राहुल गांधींच्या धडाक्यामुळे पूर्ण विजय मिळेल की नाही याविषयीचीच शंका राजकीय वर्तुळात आता व्यक्त होत आहे. हार्दिक पटेलसह त्या राज्यातील अनेक तरुण नेत्यांना सोबत घेण्यात त्यांनी जी राजकीय चतुराई व प्रगतीपण दाखविले त्यामुळे तर त्यांच्या टीकाकारांची तोंडेच बंद झाली आहेत. अन्य नेते संघ व भाजपावर टीका करताना हातचे राखताना दिसतात. ते मोदींवर टीका करीत नाहीत. राहुल गांधींचा निशाणा मात्र त्या साºयांवर असतो. तो त्यांच्या धर्मांध राजकारणावर, मोदींच्या अर्थकारणावर आणि संघ परिवाराने देशात माजविलेल्या धार्मिक दुहीवर असतो. हा परिवार देशात एकात्मता आणणार नाही. त्यात तो दुहीची बीजे पेरील ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगतात. त्या आक्रमक वृत्तीत त्यांनी आपल्या पक्षातील इतर नेत्यांनाही आता मागे टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व त्यांच्या हाती आता येणे आवश्यकही झाले आहे. त्यांचे नेतृत्व तरुणाईलाही आवडणारे आहे आणि ते देशाला विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या दिशेने नेणारेही राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी