शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:25 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे. लोकशाही सुरक्षित राखायची तर पंतप्रधानांच्या पदाला पर्यायी ठरू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांजवळ असणे गरजेचे आहे. राहुल गांधी (व डॉ. मनमोहन सिंग) यांचा अपवाद वगळता मोदींना तोंड देऊन त्यांना बचावाच्या पवित्र्यात आणू शकेल असा दुसरा नेता आज देशात नाही. नितीशकुमारांपासून शरद पवारांपर्यंतचे आणि अमरिंदरसिंगापासून ममता - मुलायमांपर्यंतचे नेते जुने, अनुभवी व मोठे असले तरी त्यांना राष्टÑीय प्रतिमा कधी लाभली नाही व यापुढेही ती लाभण्याची शक्यता नाही. राहुल गांधींनी स्वत:ला प्रादेशिक प्रश्नांशी जुळवून ठेवले असले तरी आपली प्रतिमा त्यांनी नेहमीच राष्टÑीय राखली. त्यांच्या टीकेचा व हल्ल्यांचा रोख ‘अमित शहा’ हाही कधी नव्हता. तो सरळ नरेंद्र मोदींवर होता. त्यांच्या सरकारवर ‘सुटाबुटाचे सरकार’ म्हणून त्यांनी संसदेत जो हल्ला चढविला त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि दुसºया कोणा प्रादेशिक पुढाºयावर निशाणाही साधला नाही. वास्तविक त्यांनी मनात आणले असते तर राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतरच पक्षाचे सर्वोच्च पद त्यांच्याकडे आले असते. पण ज्येष्ठांचा मान राखत व आपल्याजवळ अनुभवांची मोठी जंत्री जमवीत त्यांनी ते पद त्यांच्या मातेकडे, सोनिया गांधींकडे दिले. सोनियाजींनी ते तब्बल १९ वर्षे सांभाळल्यानंतर राहुल गांधींची त्यावर आता सन्मानाने निवड होत आहे. दरम्यानचा काळ राहुल गांधींसाठी सोपा राहिला नव्हता. दरदिवशी व दरक्षणी त्यांची अतिशय कठोर व काटेरी परीक्षा होत राहिली. त्यांची अवहेलना, टवाळी आणि टिंगल करण्याची कोणतीही संधी भाजपाच्या अतिशय चिल्लर पुढाºयांनीही कधी सोडली नाही. घराणेशाहीचा आरोप पुन्हा होताच. त्या घराण्याचा त्याग त्यांच्या टीकाकारांनी कधी मनावर घेतला नाही. त्यांना ‘पप्पू’ म्हटले गेले. त्यांच्यावर अननुभवाचा आरोप केला गेला आणि मोदींच्या तुलनेत ते काहीच नसल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांच्या वाट्याला पंजाब आणि कर्नाटकचे विजय सोडले तर पराभवही फार आले. मात्र या सबंध काळात राहुल गांधी कधी खचल्याचे वा थांबल्याचे दिसले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास व लढाऊबाणा दिवसेंदिवस वाढत गेल्याचाच जनतेला दिसला आणि आता तर त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत मोदी आणि शहा यांना त्यांच्या पक्षासह जेरीलाच आणले आहे. २२ वर्षे गुजरातमध्ये राज्य केलेल्या भाजपाला राहुल गांधींच्या धडाक्यामुळे पूर्ण विजय मिळेल की नाही याविषयीचीच शंका राजकीय वर्तुळात आता व्यक्त होत आहे. हार्दिक पटेलसह त्या राज्यातील अनेक तरुण नेत्यांना सोबत घेण्यात त्यांनी जी राजकीय चतुराई व प्रगतीपण दाखविले त्यामुळे तर त्यांच्या टीकाकारांची तोंडेच बंद झाली आहेत. अन्य नेते संघ व भाजपावर टीका करताना हातचे राखताना दिसतात. ते मोदींवर टीका करीत नाहीत. राहुल गांधींचा निशाणा मात्र त्या साºयांवर असतो. तो त्यांच्या धर्मांध राजकारणावर, मोदींच्या अर्थकारणावर आणि संघ परिवाराने देशात माजविलेल्या धार्मिक दुहीवर असतो. हा परिवार देशात एकात्मता आणणार नाही. त्यात तो दुहीची बीजे पेरील ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगतात. त्या आक्रमक वृत्तीत त्यांनी आपल्या पक्षातील इतर नेत्यांनाही आता मागे टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व त्यांच्या हाती आता येणे आवश्यकही झाले आहे. त्यांचे नेतृत्व तरुणाईलाही आवडणारे आहे आणि ते देशाला विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या दिशेने नेणारेही राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी