शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नेतृत्वाची सूत्रे राहुलकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 03:25 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची व पर्यायाने देशाच्या नेतृत्वाची सूत्रे आज हाती घ्यावी ही बाब जेवढी अपेक्षित आणि आवश्यक तेवढीच स्वागतार्ह आहे. लोकशाही सुरक्षित राखायची तर पंतप्रधानांच्या पदाला पर्यायी ठरू शकेल असा उमेदवार विरोधी पक्षांजवळ असणे गरजेचे आहे. राहुल गांधी (व डॉ. मनमोहन सिंग) यांचा अपवाद वगळता मोदींना तोंड देऊन त्यांना बचावाच्या पवित्र्यात आणू शकेल असा दुसरा नेता आज देशात नाही. नितीशकुमारांपासून शरद पवारांपर्यंतचे आणि अमरिंदरसिंगापासून ममता - मुलायमांपर्यंतचे नेते जुने, अनुभवी व मोठे असले तरी त्यांना राष्टÑीय प्रतिमा कधी लाभली नाही व यापुढेही ती लाभण्याची शक्यता नाही. राहुल गांधींनी स्वत:ला प्रादेशिक प्रश्नांशी जुळवून ठेवले असले तरी आपली प्रतिमा त्यांनी नेहमीच राष्टÑीय राखली. त्यांच्या टीकेचा व हल्ल्यांचा रोख ‘अमित शहा’ हाही कधी नव्हता. तो सरळ नरेंद्र मोदींवर होता. त्यांच्या सरकारवर ‘सुटाबुटाचे सरकार’ म्हणून त्यांनी संसदेत जो हल्ला चढविला त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही आणि दुसºया कोणा प्रादेशिक पुढाºयावर निशाणाही साधला नाही. वास्तविक त्यांनी मनात आणले असते तर राजीव गांधींच्या स्फोटक मृत्यूनंतरच पक्षाचे सर्वोच्च पद त्यांच्याकडे आले असते. पण ज्येष्ठांचा मान राखत व आपल्याजवळ अनुभवांची मोठी जंत्री जमवीत त्यांनी ते पद त्यांच्या मातेकडे, सोनिया गांधींकडे दिले. सोनियाजींनी ते तब्बल १९ वर्षे सांभाळल्यानंतर राहुल गांधींची त्यावर आता सन्मानाने निवड होत आहे. दरम्यानचा काळ राहुल गांधींसाठी सोपा राहिला नव्हता. दरदिवशी व दरक्षणी त्यांची अतिशय कठोर व काटेरी परीक्षा होत राहिली. त्यांची अवहेलना, टवाळी आणि टिंगल करण्याची कोणतीही संधी भाजपाच्या अतिशय चिल्लर पुढाºयांनीही कधी सोडली नाही. घराणेशाहीचा आरोप पुन्हा होताच. त्या घराण्याचा त्याग त्यांच्या टीकाकारांनी कधी मनावर घेतला नाही. त्यांना ‘पप्पू’ म्हटले गेले. त्यांच्यावर अननुभवाचा आरोप केला गेला आणि मोदींच्या तुलनेत ते काहीच नसल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांच्या वाट्याला पंजाब आणि कर्नाटकचे विजय सोडले तर पराभवही फार आले. मात्र या सबंध काळात राहुल गांधी कधी खचल्याचे वा थांबल्याचे दिसले नाहीत. त्यांचा आत्मविश्वास व लढाऊबाणा दिवसेंदिवस वाढत गेल्याचाच जनतेला दिसला आणि आता तर त्यांनी गुजरातच्या निवडणुकीत मोदी आणि शहा यांना त्यांच्या पक्षासह जेरीलाच आणले आहे. २२ वर्षे गुजरातमध्ये राज्य केलेल्या भाजपाला राहुल गांधींच्या धडाक्यामुळे पूर्ण विजय मिळेल की नाही याविषयीचीच शंका राजकीय वर्तुळात आता व्यक्त होत आहे. हार्दिक पटेलसह त्या राज्यातील अनेक तरुण नेत्यांना सोबत घेण्यात त्यांनी जी राजकीय चतुराई व प्रगतीपण दाखविले त्यामुळे तर त्यांच्या टीकाकारांची तोंडेच बंद झाली आहेत. अन्य नेते संघ व भाजपावर टीका करताना हातचे राखताना दिसतात. ते मोदींवर टीका करीत नाहीत. राहुल गांधींचा निशाणा मात्र त्या साºयांवर असतो. तो त्यांच्या धर्मांध राजकारणावर, मोदींच्या अर्थकारणावर आणि संघ परिवाराने देशात माजविलेल्या धार्मिक दुहीवर असतो. हा परिवार देशात एकात्मता आणणार नाही. त्यात तो दुहीची बीजे पेरील ही गोष्ट ते पुराव्यानिशी सांगतात. त्या आक्रमक वृत्तीत त्यांनी आपल्या पक्षातील इतर नेत्यांनाही आता मागे टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे व त्या पक्षाच्या पुनरुज्जीवनाचे नेतृत्व त्यांच्या हाती आता येणे आवश्यकही झाले आहे. त्यांचे नेतृत्व तरुणाईलाही आवडणारे आहे आणि ते देशाला विज्ञान, तंत्रज्ञान व आधुनिकतेच्या दिशेने नेणारेही राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी