शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हे तर विनाशाचे नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:43 IST

नरेंद्र मोदी चेकाळले आहेत. औरंगजेबाच्या फौजांना पाण्यातही संताजी आणि धनाजी दिसावे तसे त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी राहुल, मनमोहनसिंग, सोनिया आणि काँग्रेस दिसू लागली आहे. ‘गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे आणि तो करण्याविषयी त्याच्या लष्करी अधिका-यांची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या ...

नरेंद्र मोदी चेकाळले आहेत. औरंगजेबाच्या फौजांना पाण्यातही संताजी आणि धनाजी दिसावे तसे त्यांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी राहुल, मनमोहनसिंग, सोनिया आणि काँग्रेस दिसू लागली आहे. ‘गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे आणि तो करण्याविषयी त्याच्या लष्करी अधिका-यांची काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हजर होते’ असा बिनबुडाचा आरोप मोदींनी केला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर अहमद पटेल यांना आणावे असे त्यावेळी पाकिस्तानने सुचविल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. मनमोहनसिंग या स्वच्छ व धवल प्रतिमेच्या नेत्यावर असा आरोप करणे हीच देशाचा संताप वाढविणारी बाब आहे. मनमोहनसिंग हे केवळ जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञच नाहीत, देशातील सर्व जातीधर्मांच्या व वर्गांच्या लोकांना कमालीचे आदरणीय वाटणारे नेते आहेत. हा नेता गुजरात या राज्यातील निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी पाकिस्तानची मदत घेईल व त्यासाठी तो मणिशंकर यांच्या घरी जाईल हा आरोप नुसता हास्यास्पदच नाही तर मोदींच्या अकलेची कीव करावी असा आहे. तशीही त्यांची जीभ सैल असून संयम सुटला आहे. ज्या बैठकीत हे झाल्याचे मोदी म्हणतात तिला देशाचे सेनाप्रमुख दीपक कपूर, माजी उच्चायुक्त राघवन, परराष्टÑ मंत्री नटवरसिंग यांच्यासह परराष्टÑ विभागाचे अनेक अधिकारीही उपस्थितीत होते. देशाचे नेतृत्व करणाºया व्यक्तीला शत्रूशी बोलणी करावी लागतच असतात. (मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नात वºहाडी म्हणून सामील होतेच) देशाचे संरक्षण व परराष्टÑ व्यवहार या संदर्भात उभय देशांच्या नेत्यांना परस्परांशी बोलावेच लागते. मात्र मनमोहनसिंगांच्या उंचीचा नेता अशावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची गोष्ट काढून त्यात पाकिस्तानची साथ मागेल असे म्हणणे हा शुद्ध वेडाचाराचा पुरावा आहे. मनमोहनसिंग हे कधीही न संतापणारे पुढारी आहेत. मात्र या आरोपाने त्यांच्याही अंगाचा तीळपापड झाला आहे. त्यांनी मोदींना फार धुवून टाकून त्यांचे पुरते वस्त्रहरण केले आहे. मोदींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर येतात हाच मुळी देशाचा अपमान आहे असे ते म्हणाले आहेत. वास्तव हे की मोदींजवळ सांगण्यासारखे काही उरले नाही. गेली २२ वर्षे गुजरातच्या जनतेला तेच ते ऐकविल्याने तेथील जनताही त्यांच्या भाषणांना कंटाळली आहे. त्यांनी सांगितलेला विकास लोकांना दिसत नाही आणि धर्म व प्रभू रामचंद्र यांच्या कथा मोदींनी व त्यांच्या संघ परिवाराने नुसत्या पांचटच नव्हे तर कंटाळवाण्या बनविल्या आहेत. या स्थितीत कोणतीही खोटीनाटी वक्तव्ये करणे व काँग्रेसला बदनाम करणे एवढेच त्यांच्या हाती उरले आहे. त्यांना हार्दिकला नावे ठेवता येत नाही. जिग्नेशविषयी ते बोलत नाहीत आणि इतरांचीही नावे ते घेत नाही. राहुल त्यांना पुरून उरले आहेत आणि सोनियाजींवर आरोप केला तर तो आपल्यावरच उलटेल याची मोदींना भीती आहे. मनमोहनसिंगांची प्रतिमा एका सभ्य, सोज्वळ मितभाषी व संयमी नेत्याची आहे. त्यामुळेच मोदींना मनमोहनसिंगांना आपले लक्ष्य बनवावेसे वाटले असणार. पण मनमोहनसिंग हे एकटेच नव्हे तर देशातील सामान्य माणसेही त्यांच्या या अक्षम्य आरोपामुळे जशी संतापलेली दिसली ते पाहता लोकांनीच मोदींच्या वेडाचारावर शिक्कामोर्तब केल्याचे वाटू लागले आहे. लोकशाही हे सभ्यपणाचे व विवेकाचे राजकारण आहे. मात्र मोदींसारखी माणसे ते कलंकित करण्याचा चंग बांधायला निघाली असतील तर त्याची संभावना देशाचे नेते म्हणून न करता विनाशाचे नेते म्हणूनच केली पाहिजे. सोनिया गांधी, राहुल गांधी व डॉ. मनमोहनसिंग यासारख्या नेत्यांवर कोणताही आरोप लावता येत नाही आणि लावला तरी तो त्यांना चिकटत नाही. असे आरोप करणारी माणसेच मग लोकांना वाचाळ वाटू लागतात.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग