शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

मानवतेची हारजीत

By admin | Updated: December 20, 2015 22:26 IST

केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन

केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका करू नये ही अनेक संघटनांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित मानवतेची जीत झाली की हार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित गुन्हेगारास अटक झाली तेव्हा त्याचे वय कायदेशीररीत्या सज्ञान होण्यासाठी केवळ सहा महिन्यांनी कमी होते. स्वाभाविकच त्याला ‘बाल गुन्हेगार’ समजले गेले आणि बाल गुन्हेगार म्हणून कायद्याने त्याला जी ‘शिक्षा’ देता येत होती ती देऊन झाल्यावर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. सुमारे तीन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हापासूनच्या कालावधीत त्याच्या चेहऱ्यावर एकदाही पश्चात्तापाचा भाव उमटला नाही असे सांगितले जाते. दुर्दैवाने दरम्यानच्या काळात कायद्याच्या भाषेतील बाल गुन्हेगारांनी असेच आणखीही काही गुन्हे केले. सबब अत्यंत भीषण स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या बाल गुन्हेगारांना त्यांच्यातील ‘बाल्य’ बाजूला ठेवून अन्य गुन्हेगारांप्रमाणेच वागवावे असा एक मतप्रवाह सुरू झाला. त्यातूनच बाल गुन्हेगाराची किंवा अज्ञानाची कमाल मर्यादा १८ वर्षे वयावरून १६ वर्षांपर्यंत खाली आणावी अशी मागणी पुढे आली आणि संबंधित कायद्यात तशी दुरुस्ती सुचविणारे एक विधेयक संसदेत मांडले गेले. ते अद्यापही प्रलंबित आहे हा भाग वेगळा. परंतु अनेक मानवतावादी तसेच महिला संघटनांचा या विधेयकास विरोध होता. तो आजदेखील कायम आहे. परंतु त्याचबरोबर संबंधित गुन्हेगारांची मानवता मोलाची की त्यांच्या हिंसेला बळी पडलेल्यांची मानवता अधिक मोलाची अशी चर्चा त्यातून सुरू झाली. सबब संबंधित गुन्हेगाराची मुक्तता केली जाऊ नये कारण तो मुक्त झाला तर त्याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो असे मानणाऱ्या संघटना आणि व्यक्तींनी त्याच्या सुटकेस अटकाव करावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यास अनुकूलता दर्शविली नाही. त्यावर ‘निर्भया’च्या आईने ‘अखेर गुन्ह्याचा विजय झाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तथापि, जनमताचा रेटा वाढवावा आणि सरकारने अध्यादेश जारी करून आता सज्ञान झालेल्या त्या गुन्हेगाराला ताब्यात घ्यावे असा मतप्रवाह वाढत असला, तरी याक्षणी मानवतेचा विजय झाला की ती पराभूत झाली याचा निर्णय करणे कठीण आहे, कारण सुटकेस विरोध करणारे आणि तिचे समर्थन करणारे दोन्ही पक्ष मानवतेचीच दुहाई देत होते आणि देत आहेत.