शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मानवतेची हारजीत

By admin | Updated: December 20, 2015 22:26 IST

केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन

केवळ देशभरातच नव्हे तर अन्य देशांमध्येही ज्या घटनेमुळे संवेदनशील मनांचा थरकाप उडाला होता त्या राजधानी दिल्लीतील ‘निर्भया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका करू नये ही अनेक संघटनांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित मानवतेची जीत झाली की हार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित गुन्हेगारास अटक झाली तेव्हा त्याचे वय कायदेशीररीत्या सज्ञान होण्यासाठी केवळ सहा महिन्यांनी कमी होते. स्वाभाविकच त्याला ‘बाल गुन्हेगार’ समजले गेले आणि बाल गुन्हेगार म्हणून कायद्याने त्याला जी ‘शिक्षा’ देता येत होती ती देऊन झाल्यावर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. सुमारे तीन वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हापासूनच्या कालावधीत त्याच्या चेहऱ्यावर एकदाही पश्चात्तापाचा भाव उमटला नाही असे सांगितले जाते. दुर्दैवाने दरम्यानच्या काळात कायद्याच्या भाषेतील बाल गुन्हेगारांनी असेच आणखीही काही गुन्हे केले. सबब अत्यंत भीषण स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सापडलेल्या बाल गुन्हेगारांना त्यांच्यातील ‘बाल्य’ बाजूला ठेवून अन्य गुन्हेगारांप्रमाणेच वागवावे असा एक मतप्रवाह सुरू झाला. त्यातूनच बाल गुन्हेगाराची किंवा अज्ञानाची कमाल मर्यादा १८ वर्षे वयावरून १६ वर्षांपर्यंत खाली आणावी अशी मागणी पुढे आली आणि संबंधित कायद्यात तशी दुरुस्ती सुचविणारे एक विधेयक संसदेत मांडले गेले. ते अद्यापही प्रलंबित आहे हा भाग वेगळा. परंतु अनेक मानवतावादी तसेच महिला संघटनांचा या विधेयकास विरोध होता. तो आजदेखील कायम आहे. परंतु त्याचबरोबर संबंधित गुन्हेगारांची मानवता मोलाची की त्यांच्या हिंसेला बळी पडलेल्यांची मानवता अधिक मोलाची अशी चर्चा त्यातून सुरू झाली. सबब संबंधित गुन्हेगाराची मुक्तता केली जाऊ नये कारण तो मुक्त झाला तर त्याच्यापासून समाजाला धोका निर्माण होऊ शकतो असे मानणाऱ्या संघटना आणि व्यक्तींनी त्याच्या सुटकेस अटकाव करावा म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यास अनुकूलता दर्शविली नाही. त्यावर ‘निर्भया’च्या आईने ‘अखेर गुन्ह्याचा विजय झाला’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तथापि, जनमताचा रेटा वाढवावा आणि सरकारने अध्यादेश जारी करून आता सज्ञान झालेल्या त्या गुन्हेगाराला ताब्यात घ्यावे असा मतप्रवाह वाढत असला, तरी याक्षणी मानवतेचा विजय झाला की ती पराभूत झाली याचा निर्णय करणे कठीण आहे, कारण सुटकेस विरोध करणारे आणि तिचे समर्थन करणारे दोन्ही पक्ष मानवतेचीच दुहाई देत होते आणि देत आहेत.