शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कोहली-शास्त्री सुपरहिट जोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:23 AM

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली.

आधी तीन सामन्यांची कसोटी मालिका, नंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर अखेरचा व एकमेव टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने श्रीलंका दौ-याची ९-० अशी विजयी सांगता केली. विशेष म्हणजे या दौºयात एकही सामना न गमावता भारताने बलाढ्य आॅस्टेÑलियाची बरोबरी केली. आॅस्टेÑलियाने याआधी अशीच कामगिरी २००९ साली पाकिस्तानविरुध्द केली होती. श्रीलंका दौºयात भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, इतक्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा कोणीच केली नसेल. निदान टी-२० सामन्यात तरी लंका संघ भारताला झुंजवेल अशी अपेक्षा होती. पण येथेही भारताने बाजी मारली.मुळात लंका दौरा भारतीय संघापेक्षा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी मोठी परीक्षा होती. या दौºयाच्या काही दिवसांआधी अनिल कुंबळे यांनी कोहलीसह संबंध बिघडल्याच्या कारणावरून प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कोहलीच्या पसंतीच्या शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली, तसेच शास्त्री यांच्या पसंतीच्या स्टाफचीही निवड झाली. यामध्ये भारताचा माजी गोलंदाज झहिर खान सारख्या दिग्गज गोलंदाजाला संघापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळेच, पसंतीचा प्रशिक्षक मिळाल्याने कोहलीपुढे आणि पसंतीचा स्टाफ मिळाल्याने शास्त्री यांच्यापुढे खरे आव्हान होते. पण या दोघांनी आपआपली जबाबदारी चोखपणे सांभाळताना स्वत:ला सिध्द केले.मालिकेतील एकही सामना न गमावताना कोहलीने आपले नेतृत्वगुण पुन्हा एकदा सिध्द केलेच, पण शास्त्री यांनीही योग्यप्रकारे संघ व्यवस्थापन करताना प्रशिक्षक म्हणून दौºयावर गेलेल्या प्रत्येक खेळाडूला संधी दिली. आगामी विश्वचषक स्पर्धेपूर्वी मजबूत भारतीय संघ तयार करण्याचे लक्ष्य बाळगलेल्या कोहली-शास्त्री यांनी या दौºयात अनेक प्रयोग केले आणि ते सर्व प्रयोग यशस्वीही ठरले. तरी, आगामी आॅस्टेÑलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौºयात याहून चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. पण तूर्तास तरी भारतीय संघाची भक्कम वाटचाल सुरू असल्याचे मान्य करावेच लागेल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीRavi Shastriरवी शास्त्री