शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

सहृदयता आणि स्वीकारार्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 08:45 IST

- मिलिंद कुलकर्णीभूक लागलेले बाळ रडून आईचे लक्ष आपल्याकडे वेधते. त्याचा आक्रोश ऐकून आई हातातली कामे सोडून बाळाकडे धाव घेते. त्याची भूक भागवते. मूल थोडे मोठे झाल्यावर इच्छित वस्तू मिळविण्यासाठी आधी आर्जवे करतं, तरीही पालकांचे दुर्लक्ष कायम राहिल्यास आदळआपट करुन लक्ष वेधून घेते. हीच स्थिती मायबाप सरकार आणि समाजाविषयी म्हणता ...

- मिलिंद कुलकर्णी

भूक लागलेले बाळ रडून आईचे लक्ष आपल्याकडे वेधते. त्याचा आक्रोश ऐकून आई हातातली कामे सोडून बाळाकडे धाव घेते. त्याची भूक भागवते. मूल थोडे मोठे झाल्यावर इच्छित वस्तू मिळविण्यासाठी आधी आर्जवे करतं, तरीही पालकांचे दुर्लक्ष कायम राहिल्यास आदळआपट करुन लक्ष वेधून घेते. हीच स्थिती मायबाप सरकार आणि समाजाविषयी म्हणता येईल. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजातील विविध घटक निवेदने देतात. सरकारदरबारी निवेदनांचे काय होते, हा संशोधनाचा विषय झाला आहे. पण त्या निवेदनांचा काही फारसा उपयोग होत नाही. मग आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या मार्गानुसार धरणे आंदोलन, निदर्शने, रस्ता रोको, जेलभरो, घेराव आंदोलन, बंद अशी सामूहिक आंदोलने केली जातात. लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषणासारखे वैयक्तिक वा सामूहिक रीत्या क्लेश करून घेणारी आंदोलने केली जातात. अधिकाऱ्यांच्या आश्वासनांतर या आंदोलनांची सांगता होते. विधिमंडळ वा संसदीय अधिवेशन काळात आंदोलनांची संख्या अधिक असते. या काळातील आंदोलनाने सरकार हलते, दखल घेते असा समज रुढ झाला आहे. त्यासोबतच विकेंद्रीकरणाचे दावे होत असले तरी मुंबई व दिल्लीत अधिकार केंद्रित झाले असल्यामुळे आंदोलनकर्ते तेथे जमतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे अधिवेशन काळात मुंबई, नागपूर व नवी दिल्ली येथे मोठ्या संख्येने आंदोलने होताना दिसतात. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना अलिकडे मोर्चा वा बंद सारखे आंदोलन करीत असताना सामान्य माणसाला त्रास होणार नाही, याची काटेकोर काळजी घेताना दिसू लागले आहेत. आंदोलनाची वेळ येणे म्हणजे, सर्व मार्ग खुंटल्याने समाज यासाठी सज्ज होतो, असेच म्हणावे लागेल. आंदोलनातील सहभागी घटकांमध्ये आक्रोश असतो. परंतु हा आक्रोश नियंत्रित करून त्याचा समाजाला त्रास होऊ दिला जात नाही. मोर्चा सुरू असताना वाहतूक सुरळीत राहील, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाडीला वाट करून दिली जाईल, हे आवर्जून पाहिले जाते. आंदोलनकर्त्यांच्या या सहृदयतेचे जनसामान्यांकडून स्वागत होते. आंदोलनादरम्यान, एस.टी.च्या गाड्या, दुकाने यांच्यावर दगडफेक, जाळपोळ असे समीकरण रुढ झालेले असताना या नवीन बदलाची समाजाकडून नोंद घेतली जात आहे. आंदोलनकर्त्यांना पाणी, जेवण देण्याची व्यवस्था आता समाजातील विविध घटकांकडून केली जात आहे. मोर्चा मार्गस्थ झाल्यावर तेथील रस्ता वा परिसराची स्वच्छता आयोजक स्वत: करू लागले आहेत. वाद समाजाशी नव्हे तर सरकारशी आहे, हे लक्षात घेऊन आंदोलनकर्ते स्वयंशिस्तीचे पालन करीत आहे. त्यामुळे समाजातदेखील आंदोलनाविषयी विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढत चालली आहे. आंदोलनामधील हा नवीन आयाम सज्जनशक्ती व सकारात्मकतेला बळ देणारा ठरत आहे.