शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांचा आधार, वाळूमाफियांचा कर्दनकाळ; भेटा सोलापूरच्या 'सिंघम'ला

By राजा माने | Updated: June 20, 2018 12:32 IST

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे पंढरी दर्शन सुकर करणारा, वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच १५५ गुन्हेगारांना हद्दपार करणारा तसेच ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव’सारखे उपक्रम राबविणारा खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’...पोलीस आणि खाकी वर्दी या विषयीची मते व्यक्तिपरत्वे बदलतात. खाकी वर्दीतल्या माणसाशी मैत्रीही नको अन् पंगाही नको असे म्हणणारे आपल्याला पदोपदी भेटतात. पोलिसांविषयीच्या अशाच मतप्रवाहांना छेद देण्याचे काम सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. विरेश प्रभू या अधिका-याने आपल्या कर्तबगारीने केले आहे.महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणा-या लाखो वारक-यांच्या आगळ्यावेगळ्या सेवेनेच प्रभू यांनी आपल्या वेगळेपणाची सोलापूर जिल्ह्याला झलक दाखविली. केवळ बडगा आणि अरेरावीची भाषा असेल तरच गर्दीला शिस्त लावता येते हा समज त्यांनी मोडून काढला.पोलीस कर्मचा-यांमधील समन्वय राखत असताना त्यांचा उत्साह जतन करणारी कार्यपद्धती त्यांनी आषाढी वारी बंदोबस्त नियोजनात अवलंबिली. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पंढरीत दाखल होणा-या प्रत्येक वारक-याला शहरातील प्रवेशापासून दर्शन रांगेत आनंदाने थांबून शिस्तबद्ध दर्शनाची नैसर्गिक सवय लावली.आषाढीसारख्या उत्सवात पोलीस केवळ बंदोबस्तातच न राहता त्याचा येणा-या वारक-यांशी संवादही झाला पाहिजे असा प्रयत्न त्यांनी केला. त्या प्रयत्नाला व्यसनमुक्ती, महिला सबलीकरण आणि जलसंवर्धनाच्या उपक्रमांचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यासाठी वारक-यांना विरंगुळा व करमणुकीबरोबरच ग्रामविकासाचा नवा विचार देणारे समूह विकसित केले. हे समूहच आषाढी वारी कालावधीत वारक-यांशी नाते जोडण्याचे काम करीत असतात.सोलापूर जिल्ह्याला धार्मिक-अध्यात्मिक तसेच स्वातंत्र्य समृद्ध चळवळीची जशी परंपरा आहे तशीच दुर्दैवाने गुंडगिरी टोळ्या आणि त्यांच्या कारवायांची देखील अनिष्ठ परंपरा आहे. ही परंपरा खंडित करण्याचे ऐतिहासिक काम प्रभू यांनी केले, याबद्दल सोलापूरकरांना त्यांचे विशेष कौतुक वाटते. तीन वर्षांच्या कारकिर्दीसाठी जिल्ह्यात येणा-या अधिका-यांना गुंड आणि त्यांच्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याची इच्छा नसते.प्रभू यांनी मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांना शिस्तबद्ध पद्धतीने कायद्याच्या चौकटीत जेरबंद केले. ७४ लोकांवर मोक्कासारखी कारवाई करतानाच १५५ गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची हिंमत दाखविली. त्याचाच परिणाम म्हणून सामान्य माणसापासून ते पोलीस दलातील प्रत्येक सदस्याचे मनोबल उंचावले.एकीकडे अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावत असताना दुसरीकडे ग्रामीण विकासाचा नवा कृतिशील विचार खाकी वर्दीत त्यांनी रुजविला. ‘समाधानी व स्वयंपूर्ण गाव दत्तक योजना’ यासारखा पोलिसी संस्कृतीच्या बाहेरचा उपक्रम हाती घेतला. पोलीस अधिकारी भुजंग तथा नाना कदम यांच्या माध्यमातून उपरोक्त दत्तक योजना गतिमान केली. ग्रामसभा घेणे, शिक्षण आणि आरोग्यविषयी प्रबोधन करणे, जलयुक्त शिवार योजनेसह ग्रामविकासाला पायाभूत ठरणाºया उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम कदम यांनी केले.गाव समाधानी राखण्याचा प्रयत्न करीत असतानाच प्रभू यांनी वाळू माफियांच्याही मुसक्या आवळल्या. तब्बल ३४ कोटी रुपयांची अवैध वाळू हस्तगत केली. अशी कामे करणारा हा माणूस खाकी वर्दीतील आगळा ‘प्रभू’च नाही काय?