शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे.

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांवर सातत्याने होणाºया हल्ल्यांची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा कोणताही सण वा उत्सव नजिक आला की तो कधी शांतपणे पार पडतो, असे पोलिसांपासून सर्वसामान्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारी पातळीपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारे प्रयत्नशील असतात. अगदी याच कालावधीत ईदही साजरी होत असल्याने पोलिसांवर अधिकच ताण असतो. यावर्षी एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना पर्जन्यराजाने अगदी दणकून हजेरी लावली. विशेषत: मुंबई - ठाण्याची तर वाताहातच झाली. केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही तर अनेक दुर्घटना घडून त्यात अनेकांचे बळीही गेले. एकीकडे या अपघात, दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या हाकेला धावून जाताना त्या अपघातांची नोंद, जबाब नोंदवणे असे कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची कामगिरीही पोलिसांना करावी लागते. विशेष म्हणजे कामाच्या तासांची चर्चा न करता खाकी वर्दीने गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि अतिवृष्टीचे संकट एकाचवेळी झेलण्याची दुहेरी कामगिरी अगदी चोखपणे बजावल्याचे पाहावयास मिळाले. अतिवृष्टीचे अरिष्ट पार पडते न पडते तोच गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला होणारे गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे ही खाकी वर्दीची खरी कसोटी असते. कारण संपूर्ण राज्य गणेश विसर्जन सोहळ््यात गर्क असते. हजारो मिरवणुका निघतात आणि शहराशहरात भाविकांची लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली असते. या गर्दीत होणारी किरकोळ दुर्घटनाही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यास वेगळे वळण लावणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ््यात तेल घालून पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षागणिक वाढणारी गणेशोत्सव मंडळे, दर्शनासाठी वाढत जाणारी गर्दी, भव्य प्रमाणात पार पडणारा विसर्जन सोहळा पाहता त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ मात्र वाढलेले दिसत नाही. मात्र ४0 हजारांचे मुंबई पोलीस दल तर दीड लाखांवरचे राज्य पोलीस दल यंदाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणेशोत्सव बंदोबस्त विनाविघ्न पार पाडण्यात यशस्वी झाले. एरवी किरकोळ कारणावरून टिकेचे धनी होणाºया, समाजकंटकांच्या हल्ल्यांना तोंड देत सर्वसामान्यांना संरक्षण देणाºया पोलिसांना या कामाचे श्रेय देत त्यांचे कौतुक करावेच लागेल.

टॅग्स :Policeपोलिस