शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

खाकी वर्दीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे.

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांवर सातत्याने होणाºया हल्ल्यांची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा कोणताही सण वा उत्सव नजिक आला की तो कधी शांतपणे पार पडतो, असे पोलिसांपासून सर्वसामान्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारी पातळीपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारे प्रयत्नशील असतात. अगदी याच कालावधीत ईदही साजरी होत असल्याने पोलिसांवर अधिकच ताण असतो. यावर्षी एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना पर्जन्यराजाने अगदी दणकून हजेरी लावली. विशेषत: मुंबई - ठाण्याची तर वाताहातच झाली. केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही तर अनेक दुर्घटना घडून त्यात अनेकांचे बळीही गेले. एकीकडे या अपघात, दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या हाकेला धावून जाताना त्या अपघातांची नोंद, जबाब नोंदवणे असे कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची कामगिरीही पोलिसांना करावी लागते. विशेष म्हणजे कामाच्या तासांची चर्चा न करता खाकी वर्दीने गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि अतिवृष्टीचे संकट एकाचवेळी झेलण्याची दुहेरी कामगिरी अगदी चोखपणे बजावल्याचे पाहावयास मिळाले. अतिवृष्टीचे अरिष्ट पार पडते न पडते तोच गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला होणारे गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे ही खाकी वर्दीची खरी कसोटी असते. कारण संपूर्ण राज्य गणेश विसर्जन सोहळ््यात गर्क असते. हजारो मिरवणुका निघतात आणि शहराशहरात भाविकांची लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली असते. या गर्दीत होणारी किरकोळ दुर्घटनाही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यास वेगळे वळण लावणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ््यात तेल घालून पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षागणिक वाढणारी गणेशोत्सव मंडळे, दर्शनासाठी वाढत जाणारी गर्दी, भव्य प्रमाणात पार पडणारा विसर्जन सोहळा पाहता त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ मात्र वाढलेले दिसत नाही. मात्र ४0 हजारांचे मुंबई पोलीस दल तर दीड लाखांवरचे राज्य पोलीस दल यंदाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणेशोत्सव बंदोबस्त विनाविघ्न पार पाडण्यात यशस्वी झाले. एरवी किरकोळ कारणावरून टिकेचे धनी होणाºया, समाजकंटकांच्या हल्ल्यांना तोंड देत सर्वसामान्यांना संरक्षण देणाºया पोलिसांना या कामाचे श्रेय देत त्यांचे कौतुक करावेच लागेल.

टॅग्स :Policeपोलिस