शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे.

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांवर सातत्याने होणाºया हल्ल्यांची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा कोणताही सण वा उत्सव नजिक आला की तो कधी शांतपणे पार पडतो, असे पोलिसांपासून सर्वसामान्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारी पातळीपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारे प्रयत्नशील असतात. अगदी याच कालावधीत ईदही साजरी होत असल्याने पोलिसांवर अधिकच ताण असतो. यावर्षी एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना पर्जन्यराजाने अगदी दणकून हजेरी लावली. विशेषत: मुंबई - ठाण्याची तर वाताहातच झाली. केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही तर अनेक दुर्घटना घडून त्यात अनेकांचे बळीही गेले. एकीकडे या अपघात, दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या हाकेला धावून जाताना त्या अपघातांची नोंद, जबाब नोंदवणे असे कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची कामगिरीही पोलिसांना करावी लागते. विशेष म्हणजे कामाच्या तासांची चर्चा न करता खाकी वर्दीने गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि अतिवृष्टीचे संकट एकाचवेळी झेलण्याची दुहेरी कामगिरी अगदी चोखपणे बजावल्याचे पाहावयास मिळाले. अतिवृष्टीचे अरिष्ट पार पडते न पडते तोच गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला होणारे गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे ही खाकी वर्दीची खरी कसोटी असते. कारण संपूर्ण राज्य गणेश विसर्जन सोहळ््यात गर्क असते. हजारो मिरवणुका निघतात आणि शहराशहरात भाविकांची लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली असते. या गर्दीत होणारी किरकोळ दुर्घटनाही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यास वेगळे वळण लावणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ््यात तेल घालून पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षागणिक वाढणारी गणेशोत्सव मंडळे, दर्शनासाठी वाढत जाणारी गर्दी, भव्य प्रमाणात पार पडणारा विसर्जन सोहळा पाहता त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ मात्र वाढलेले दिसत नाही. मात्र ४0 हजारांचे मुंबई पोलीस दल तर दीड लाखांवरचे राज्य पोलीस दल यंदाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणेशोत्सव बंदोबस्त विनाविघ्न पार पाडण्यात यशस्वी झाले. एरवी किरकोळ कारणावरून टिकेचे धनी होणाºया, समाजकंटकांच्या हल्ल्यांना तोंड देत सर्वसामान्यांना संरक्षण देणाºया पोलिसांना या कामाचे श्रेय देत त्यांचे कौतुक करावेच लागेल.

टॅग्स :Policeपोलिस