शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

खाकी वर्दीची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे.

सध्या घडणा-या एकूणच घटना पाहता सामाजिक जीवन सर्वसामान्यांमध्ये अस्वस्थता आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता निर्माण करणारे आहे. गेल्या काही वर्षांपासून पोलिसांवर सातत्याने होणाºया हल्ल्यांची पार्श्वभूमी त्याला कारणीभूत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा कोणताही सण वा उत्सव नजिक आला की तो कधी शांतपणे पार पडतो, असे पोलिसांपासून सर्वसामान्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने त्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सरकारी पातळीपासून पोलीस यंत्रणेपर्यंत सारे प्रयत्नशील असतात. अगदी याच कालावधीत ईदही साजरी होत असल्याने पोलिसांवर अधिकच ताण असतो. यावर्षी एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना पर्जन्यराजाने अगदी दणकून हजेरी लावली. विशेषत: मुंबई - ठाण्याची तर वाताहातच झाली. केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नाही तर अनेक दुर्घटना घडून त्यात अनेकांचे बळीही गेले. एकीकडे या अपघात, दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या हाकेला धावून जाताना त्या अपघातांची नोंद, जबाब नोंदवणे असे कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याची कामगिरीही पोलिसांना करावी लागते. विशेष म्हणजे कामाच्या तासांची चर्चा न करता खाकी वर्दीने गणेशोत्सवाचा बंदोबस्त आणि अतिवृष्टीचे संकट एकाचवेळी झेलण्याची दुहेरी कामगिरी अगदी चोखपणे बजावल्याचे पाहावयास मिळाले. अतिवृष्टीचे अरिष्ट पार पडते न पडते तोच गणेश विसर्जनाच्या बंदोबस्ताचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली. गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला होणारे गणेश विसर्जन शांततेत पार पाडणे ही खाकी वर्दीची खरी कसोटी असते. कारण संपूर्ण राज्य गणेश विसर्जन सोहळ््यात गर्क असते. हजारो मिरवणुका निघतात आणि शहराशहरात भाविकांची लाखोंची गर्दी रस्त्यावर उतरलेली असते. या गर्दीत होणारी किरकोळ दुर्घटनाही पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यास वेगळे वळण लावणारी ठरू शकते. त्यामुळे डोळ््यात तेल घालून पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. वर्षागणिक वाढणारी गणेशोत्सव मंडळे, दर्शनासाठी वाढत जाणारी गर्दी, भव्य प्रमाणात पार पडणारा विसर्जन सोहळा पाहता त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ मात्र वाढलेले दिसत नाही. मात्र ४0 हजारांचे मुंबई पोलीस दल तर दीड लाखांवरचे राज्य पोलीस दल यंदाही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गणेशोत्सव बंदोबस्त विनाविघ्न पार पाडण्यात यशस्वी झाले. एरवी किरकोळ कारणावरून टिकेचे धनी होणाºया, समाजकंटकांच्या हल्ल्यांना तोंड देत सर्वसामान्यांना संरक्षण देणाºया पोलिसांना या कामाचे श्रेय देत त्यांचे कौतुक करावेच लागेल.

टॅग्स :Policeपोलिस