शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

दिल्लीत प्रमोशनची किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:15 IST

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे.

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याला अस्थिर करण्यासाठी दुसऱ्या गटाला हाताशी धरून बळ देण्याचे काम ‘दिल्ली’ मोठ्या शिताफीने करीत आली आहे. देशभरात काँग्रेसची झालेली पडझड पाहता आता दिल्लीकरांनीही काहीसे समजदारीने घेतल्याचे नागपुरातील राजकीय ‘प्रमोशन’ वरून दिसून येते. नाराजी व्यक्त करणाºयांना काहीतरी देऊन ताकद देण्याची भूमिका आता दिल्लीने घेतली आहे. यातून स्थानिक नेत्यांना बळ मिळत असून पर्यायाने काँग्रेस बळकट होण्याच्या दिशेने सकारात्मक संदेश जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गटबाजीने नागपुरात काँग्रेस भुईसपाट झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत प्रकरण गेले. शेवटी चतुर्वेदींना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. महाराष्ट्रातून झालेली ही कारवाई मोडीत काढण्यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्ली गाठली. तर त्यांच्यासोबतच कारवाईचे स्वागत करण्यासाठी मुत्तेमवार गटही दिल्लीत दाखल झाला. दोन्ही गटांनी दिल्ली दरबारी हजेरी लावून आपापल्या नेत्यांची बाजू मांडली. दिल्लीकरांनी बाजू ऐकून घेतली व सर्वांच्याच पदरी काहीतरी पाडण्याचा निवाडा केला.

समर्थकांच्या दिल्लीवारीनंतर मुत्तेमवार यांची अ.भा. काँग्रेस कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी लागली. त्यामुळे चतुर्वेदी गट आणखीनच दुखावल्याचे पाहून काल-परवा माजी मंत्री नितीन राऊत यांची अ.भा. काँग्रेस समितीच्या ‘एससी’ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे करीत दिल्लीने गटबाजीला अधिक हवा न देता नेत्यांमध्ये ‘बॅलेन्स’ साधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवारीचा फायदा दोन्ही गटांना झाला. तत्पूर्वी पक्षाने युवक काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नागपुरातील कामाची दखल घेत त्यांना अ.भा. युवक काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविली.

शेळकेंचे हे प्रमोशनही बरेच काही सांगून गेले. दिल्लीला आता गल्लीतील गटबाजीत ‘इंटरेस्ट’ नाही, तर गल्लीत काम करणाºयासाठी दिल्लीची दारे उघडी आहेत, असा संदेशवजा इशारा दिल्लीने नागपूरकर नेत्यांना दिला आहे. लोकसभा अन् पाठोपाठ विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. स्थानिक गटबाजीमुळे पक्षाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे. याचे अहवाल दिल्ली दरबारी पोहचले आहेत. त्यामुळे आता फाटलेले शिवण्याऐवजी अधिक फाडण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यांना प्रसंगी याची किंमतही मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांनी वेळीच सावध होऊन पक्षनिष्ठा जोपासली नाही तर ‘हात’ दाखविल्याशिवाय सोडणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस