शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

दिल्लीत प्रमोशनची किल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:15 IST

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे.

नागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीचा इतिहास तसा फार जुना. नेते कितीही दिग्गज असोत येथील काँग्रेस नेहमीच गटातटात विखुरलेली राहिली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याला अस्थिर करण्यासाठी दुसऱ्या गटाला हाताशी धरून बळ देण्याचे काम ‘दिल्ली’ मोठ्या शिताफीने करीत आली आहे. देशभरात काँग्रेसची झालेली पडझड पाहता आता दिल्लीकरांनीही काहीसे समजदारीने घेतल्याचे नागपुरातील राजकीय ‘प्रमोशन’ वरून दिसून येते. नाराजी व्यक्त करणाºयांना काहीतरी देऊन ताकद देण्याची भूमिका आता दिल्लीने घेतली आहे. यातून स्थानिक नेत्यांना बळ मिळत असून पर्यायाने काँग्रेस बळकट होण्याच्या दिशेने सकारात्मक संदेश जात आहे.

माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गटबाजीने नागपुरात काँग्रेस भुईसपाट झाली. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत प्रकरण गेले. शेवटी चतुर्वेदींना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. महाराष्ट्रातून झालेली ही कारवाई मोडीत काढण्यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी दिल्ली गाठली. तर त्यांच्यासोबतच कारवाईचे स्वागत करण्यासाठी मुत्तेमवार गटही दिल्लीत दाखल झाला. दोन्ही गटांनी दिल्ली दरबारी हजेरी लावून आपापल्या नेत्यांची बाजू मांडली. दिल्लीकरांनी बाजू ऐकून घेतली व सर्वांच्याच पदरी काहीतरी पाडण्याचा निवाडा केला.

समर्थकांच्या दिल्लीवारीनंतर मुत्तेमवार यांची अ.भा. काँग्रेस कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी लागली. त्यामुळे चतुर्वेदी गट आणखीनच दुखावल्याचे पाहून काल-परवा माजी मंत्री नितीन राऊत यांची अ.भा. काँग्रेस समितीच्या ‘एससी’ विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. असे करीत दिल्लीने गटबाजीला अधिक हवा न देता नेत्यांमध्ये ‘बॅलेन्स’ साधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीवारीचा फायदा दोन्ही गटांना झाला. तत्पूर्वी पक्षाने युवक काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नागपुरातील कामाची दखल घेत त्यांना अ.भा. युवक काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविली.

शेळकेंचे हे प्रमोशनही बरेच काही सांगून गेले. दिल्लीला आता गल्लीतील गटबाजीत ‘इंटरेस्ट’ नाही, तर गल्लीत काम करणाºयासाठी दिल्लीची दारे उघडी आहेत, असा संदेशवजा इशारा दिल्लीने नागपूरकर नेत्यांना दिला आहे. लोकसभा अन् पाठोपाठ विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. स्थानिक गटबाजीमुळे पक्षाचे आधीच बरेच नुकसान झाले आहे. याचे अहवाल दिल्ली दरबारी पोहचले आहेत. त्यामुळे आता फाटलेले शिवण्याऐवजी अधिक फाडण्याचा प्रयत्न करणाºया नेत्यांना प्रसंगी याची किंमतही मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेत्यांनी वेळीच सावध होऊन पक्षनिष्ठा जोपासली नाही तर ‘हात’ दाखविल्याशिवाय सोडणार नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस