शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विराट गती ठेवायला हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:26 IST

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला.

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे यासह तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजही ठरला. त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय एकादश संघाची धुराही त्याच्याकडेच सोपविण्यात आली. एकूणच यंदा क्रिकेटविश्वावर कोहलीने ‘विराट’ वर्चस्व राखले असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे कसोटी क्रमवारीत त्याने ९०० गुणांचा टप्पा पार करून अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू असा मानही मिळवला. याआधी केवळ सुनील गावसकर यांनी असा पराक्रम केला होता, तर सचिन तेंडुलकर (८९८) आणि राहुल द्रविड (८९२) यांचा विक्रम थोडक्यात हुकला होता. कोहली सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे. मात्र, दुसरीकडे इतर खेळाडूंच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव अडचण ठरत आहे. हेच चित्र सध्या दक्षिण आफ्रिका दौºयात पाहायला मिळाले. आजपर्यंत गोलंदाजी ही टीम इंडियाची कमजोरी मानली जायची. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना भारतीय संघाला विजयानजीक आणले होते. पण, भारताची खरी ताकद असलेल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मालिकाही गमवावी लागली. तब्बल २५ वर्षांपासून भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजयांची मालिका गुंफलेला सध्याचा भारतीय संघ जबरदस्त मजबूत असून या वेळी आफ्रिकेतील अपयशाची मालिका नक्कीच खंडित होणार अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. इतकेच काय, तर विराट सेनेचा धडाका पाहून खुद्द आफ्रिका संघालाही घाम फुटला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यानंतरही फलंदाजांनी बोध घेतला नाही हे दुर्दैवच. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार कोहलीने पुन्हा एकदा एकाकी झुंज दिली. दोनवेळा संधी मिळूनही रोहित शर्मा अपयशी ठरला. कसोटी विशेषज्ञ असलेल्या चेतेश्वर पुजाराकडून झालेली चूक धक्कादायक होती, तर हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात केलेल्या ९३ धावांच्या खेळीनंतर यशस्वी ठरला नाही. त्यामुळे गोलंदाजांची मेहनत वाया गेली. तरी, आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळामुळे खेळपट्ट्या काही प्रमाणात फलंदाजीस अनुकूल झाल्या होत्या. मात्र, तरीही भारतीयांना चमक दाखवता आली नाही. त्यामुळे हा पराभव नकारात्मक मानसिकतेमुळे झाल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. येथील वेगवान खेळपट्टीवर फलंदाजी अवघड ठरणार, ही मानसिकता सर्वप्रथम फलंदाजांनी बदलण्याची गरज आहे. तसे झाले तरच यशाची कमान पुन्हा उंचावरती येईल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८