शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

विराट गती ठेवायला हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:26 IST

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला.

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे यासह तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजही ठरला. त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय एकादश संघाची धुराही त्याच्याकडेच सोपविण्यात आली. एकूणच यंदा क्रिकेटविश्वावर कोहलीने ‘विराट’ वर्चस्व राखले असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे कसोटी क्रमवारीत त्याने ९०० गुणांचा टप्पा पार करून अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू असा मानही मिळवला. याआधी केवळ सुनील गावसकर यांनी असा पराक्रम केला होता, तर सचिन तेंडुलकर (८९८) आणि राहुल द्रविड (८९२) यांचा विक्रम थोडक्यात हुकला होता. कोहली सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे. मात्र, दुसरीकडे इतर खेळाडूंच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव अडचण ठरत आहे. हेच चित्र सध्या दक्षिण आफ्रिका दौºयात पाहायला मिळाले. आजपर्यंत गोलंदाजी ही टीम इंडियाची कमजोरी मानली जायची. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना भारतीय संघाला विजयानजीक आणले होते. पण, भारताची खरी ताकद असलेल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मालिकाही गमवावी लागली. तब्बल २५ वर्षांपासून भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजयांची मालिका गुंफलेला सध्याचा भारतीय संघ जबरदस्त मजबूत असून या वेळी आफ्रिकेतील अपयशाची मालिका नक्कीच खंडित होणार अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. इतकेच काय, तर विराट सेनेचा धडाका पाहून खुद्द आफ्रिका संघालाही घाम फुटला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यानंतरही फलंदाजांनी बोध घेतला नाही हे दुर्दैवच. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार कोहलीने पुन्हा एकदा एकाकी झुंज दिली. दोनवेळा संधी मिळूनही रोहित शर्मा अपयशी ठरला. कसोटी विशेषज्ञ असलेल्या चेतेश्वर पुजाराकडून झालेली चूक धक्कादायक होती, तर हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात केलेल्या ९३ धावांच्या खेळीनंतर यशस्वी ठरला नाही. त्यामुळे गोलंदाजांची मेहनत वाया गेली. तरी, आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळामुळे खेळपट्ट्या काही प्रमाणात फलंदाजीस अनुकूल झाल्या होत्या. मात्र, तरीही भारतीयांना चमक दाखवता आली नाही. त्यामुळे हा पराभव नकारात्मक मानसिकतेमुळे झाल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. येथील वेगवान खेळपट्टीवर फलंदाजी अवघड ठरणार, ही मानसिकता सर्वप्रथम फलंदाजांनी बदलण्याची गरज आहे. तसे झाले तरच यशाची कमान पुन्हा उंचावरती येईल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८