शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विराट गती ठेवायला हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 04:26 IST

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला.

विराट कोहलीने यंदाच्या मोसमात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीचा प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे यासह तो एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजही ठरला. त्याचबरोबर आयसीसीच्या कसोटी व एकदिवसीय एकादश संघाची धुराही त्याच्याकडेच सोपविण्यात आली. एकूणच यंदा क्रिकेटविश्वावर कोहलीने ‘विराट’ वर्चस्व राखले असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे कसोटी क्रमवारीत त्याने ९०० गुणांचा टप्पा पार करून अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय खेळाडू असा मानही मिळवला. याआधी केवळ सुनील गावसकर यांनी असा पराक्रम केला होता, तर सचिन तेंडुलकर (८९८) आणि राहुल द्रविड (८९२) यांचा विक्रम थोडक्यात हुकला होता. कोहली सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे. मात्र, दुसरीकडे इतर खेळाडूंच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव अडचण ठरत आहे. हेच चित्र सध्या दक्षिण आफ्रिका दौºयात पाहायला मिळाले. आजपर्यंत गोलंदाजी ही टीम इंडियाची कमजोरी मानली जायची. दक्षिण आफ्रिकेत गोलंदाजांनी शानदार कामगिरी करताना भारतीय संघाला विजयानजीक आणले होते. पण, भारताची खरी ताकद असलेल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मालिकाही गमवावी लागली. तब्बल २५ वर्षांपासून भारताला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजयांची मालिका गुंफलेला सध्याचा भारतीय संघ जबरदस्त मजबूत असून या वेळी आफ्रिकेतील अपयशाची मालिका नक्कीच खंडित होणार अशी आशा अनेकांनी व्यक्त केली होती. इतकेच काय, तर विराट सेनेचा धडाका पाहून खुद्द आफ्रिका संघालाही घाम फुटला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील वेगवान खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यानंतरही फलंदाजांनी बोध घेतला नाही हे दुर्दैवच. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार कोहलीने पुन्हा एकदा एकाकी झुंज दिली. दोनवेळा संधी मिळूनही रोहित शर्मा अपयशी ठरला. कसोटी विशेषज्ञ असलेल्या चेतेश्वर पुजाराकडून झालेली चूक धक्कादायक होती, तर हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात केलेल्या ९३ धावांच्या खेळीनंतर यशस्वी ठरला नाही. त्यामुळे गोलंदाजांची मेहनत वाया गेली. तरी, आफ्रिकेत पडलेल्या दुष्काळामुळे खेळपट्ट्या काही प्रमाणात फलंदाजीस अनुकूल झाल्या होत्या. मात्र, तरीही भारतीयांना चमक दाखवता आली नाही. त्यामुळे हा पराभव नकारात्मक मानसिकतेमुळे झाल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. येथील वेगवान खेळपट्टीवर फलंदाजी अवघड ठरणार, ही मानसिकता सर्वप्रथम फलंदाजांनी बदलण्याची गरज आहे. तसे झाले तरच यशाची कमान पुन्हा उंचावरती येईल.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIndia Vs South Africa 2018भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८