शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

‘इगो’ बाजूला तर ठेवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 1:32 AM

कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे.

इंग्रजीतल्या ‘इगो’ आणि मराठीतल्या ‘अहंकारा’ने भारतीय कुटुंब व्यवस्था सध्या ग्रासली आहे. रावणाच्या अहंकाराचा टिकाव लागला नाही तर आपल्यासारख्या सामान्यांचे काय ? असे पौराणिक दाखले घरातील जेष्ठ मंडळी देत असली तरी ‘इगो’ भारतीय कुटुंबव्यवस्थेतील कलहाचे प्रमुख कारण ठरतेय. कुटुंब न्यायालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या तक्रारींची आकडेवारी पाहता भारतीय कुटुंबव्यवस्थेला ‘इगो’ने ग्रासल्याचे चित्र आहे. एकट्या नागपूर कुटुंब न्यायालयात कौटुंबिक कलहाच्या वर्षाला सरासरी सव्वातीन हजारावर तक्रारी दाखल होत आहेत. नागपूर कुटुंब न्यायालयात २००८ ते २०१७ या १० वर्षांत कौटुंबिक वादाची (कलहाची) ३३ हजार ५६६ प्रकरणे दाखल झाली होती. यंदा मार्चपर्यंत यात १०५२ प्रकरणांची आणखी भर पडली आहे. न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून करण्यात येणारा युक्तिवाद लक्षात घेता स्वत:बद्दलचा अहंकार, एकमेकांना कमी लेखणे, जोडीदाराने आपल्या मनासारखे वागावे असा आग्रह धरणे, एकमेकांच्या कामात लुडबूड करणे, सहनशीलतेचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, एकमेकांना पुरेसा वेळ देण्यास टाळाटाळ, विवाहबाह्य संबंध, शारीरिक व मानसिक छळ, आदी प्रमुख कारणांमुळे कौटुंबिक कलह वाढत असल्याचे स्पष्ट होेते. कौटुंबिक भांडणामुळे एका छताखाली राहणे अशक्य झाल्यानंतर पती-पत्नी, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, राहायला घर मिळणे, स्त्रीधन परत मिळणे यासह अन्य विविध वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत असल्याचे चित्र आहे. या साºया वादामागे एकच शब्द दडलाय तो म्हणजे ‘इगो’. कौटुंबिक न्यायालयात समपुदेशक दोन्ही पक्षात तडजोड व्हावी यासाठी कौन्सिलिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून वादाचा विषय समजून घेतात. मात्र न्यायालयातील समपुदेशकांनाही वेळेचे आणि नोकरीचे बंधन असते. यातच एखादा पक्षकार किंवा त्याचा वकील आक्रमक असल्यास किंवा कोणत्याही तडजोडीला मान्य नसल्यास तेही हतबल ठरतात. शेवटी वकील आणि पक्षकारालाही ‘इगो’ असतोच. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीमधील वाद, संबंध कायमचे तोडण्यापर्यंतच्या विकोपाला जात नव्हते. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करीत वाद शांत करीत होते. आज मात्र कुणीच कुणाला समजून घेण्यास तयार नाहीत. मात्र क्षणभरासाठी का होईना आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा किंवा तुम्ही मानत असलेल्या परमेश्वराचे चित्र डोळ्यापुढे आणून बघा आणि ‘इगो’ला अंत:करणातून बाजूला ठेवा. यासाठी कौणत्याही कौन्सिलरची गरज पडत नाही. निश्चितच कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ कुणावर येणार नाही.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय