शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

काश्मीरची भळभळती जखम आता पूर्णत्वाने भरून निघेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:33 IST

नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक या अतिमहत्त्वाच्या टप्प्यानंतर काश्मीरमध्ये एवढ्यात एक क्रांतिकारी ऐतिहासिक बदल घडून आला आहे.

- डॉ. वामनराव जगतापनोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक या अतिमहत्त्वाच्या टप्प्यानंतर काश्मीरमध्ये एवढ्यात एक क्रांतिकारी ऐतिहासिक बदल घडून आला आहे. काश्मीरला कलम ३७० च्या अंतर्गत प्राप्त झालेला विशेष दर्जा भारत सरकारने हटवून काश्मीरला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणले आहे, यातून बरेच काही चांगले निष्पन्न होईल हे खरे असले तरी बरेच प्रश्न गंभीर स्वरूपात उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.यात चांगले असे होईल की, पाकिस्तानी अतिरेक्यांच्या घुसखोरीला आळा बसून अतिरेकी कारवायांना वाव राहणार नाही. तस्करीचे अमाप अड्डे असलेल्या या राज्याला यातून मुक्त करावे लागेल. आता सरकारला बंदुका खाली ठेवून तेथील जनतेच्या सहभागातूनच सर्वांगीण विकासाचे महाभियान प्राधान्याने चालवावे लागेल. तिथल्या तरुण-तरुणींकडे संशयाच्या नजरेने न पाहता बिहार, युपी व समस्त दक्षिण भारताच्या धर्तीवर (हिंदी भाषेवरून संबंध सध्याही बिघडलेले असूनही) काश्मिरी तरुण-तरुणींना देशातील संरक्षण व मुलकी सेवेत संधी दिली जावी. काश्मीरमध्ये अनेकानेक उद्योगधंदे सुरू करून तिथल्या बेकार तरुण-तरुणींचे आयुष्य कसे सुखकर होईल याकडे लक्ष पुरवावे लागणार आहे, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील उद्योजकांना तसे आवाहनही केले आहे. यातून त्यांच्या बेकार हातांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तिथला लक्षावधींचा फौजफाटा कमी करून इतर राज्याप्रमाणे आवश्यक तेवढाच फौजफाटा ठेवावा लागेल. त्यातूनही मुस्लीम जनतेला अवास्तव त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.शिक्षण, नोकरी, धंदा-व्यवसाय यासाठी तरुणांना प्रेरित करीत त्यासाठी शिष्यवृत्त्या-कर्जाची पूर्तता करून त्यांचे समायोजन- समुपदेशन करावे लागेल. यासाठी शिबिरे, महामंडळे, सामाजिक संस्थांकडून जनजागृती करावी लागणार आहे. हे राज्य व देश माझे असून हीच माझी निष्ठाभूमी असल्याचे (राष्ट्रीयत्व) लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या मनावर बिंबवून त्यांना त्यासाठी तयार करावे लागेल.पर्यटनाच्या दृष्टीने काश्मीर प्रथम क्रमांकावर असल्यामुळे यात मुस्लीम तरुणांचा सहभाग वाढवून पर्यटकांसाठी विश्वासाचे-संरक्षणाचे- स्वस्थ वातावरण नक्कीच निर्माण करता येईल शिवाय काश्मिरी जनतेसाठी भारतभ्रमण (देशाटन) यासारखी प्रदीर्घ व व्यापक मोहीम आखली तर देशातील हिंदू-मुस्लिमांशी त्यांचा वार्तालाप-संवाद होईल व इथल्या धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभाव तत्त्वाचा, व्यवहार व कायद्याचा परिचय होऊन भारतीय संस्कृतीशी ते एकरूप होण्यास मदत होईल. हे सर्व भारत सरकार करेलच करेल. त्यांनी जन्म दिलेल्या गोंडस बाळासाठी सरकार कुवत व म्हणेल तेवढा निधी अंत:प्रेरणेने व अग्रक्रमाने वापरेल याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी केलेली ही उज्ज्वल ऐतिहासिक कामगिरी आहे. यातून काश्मिरी मुस्लीम जनता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय प्रवाहात येईल व खºया अर्थाने काश्मिरात शांती प्रस्थापित होईल.३७० च्या ऐतिहासिक घटनेवरून पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. जखमी, चिडलेल्या वाघासारखी त्याची स्थिती झाली आहे, काश्मीरप्रश्न भारताचा निव्वळ अंतर्गत प्रश्न असला तरी धार्मिक अनुबंध व कट्टरपणा यामुळे गेल्या ७०-७१ वर्षांचा त्याचा धार्मिक अभिमान व उन्माद लयाला गेला आहे. भारतासाठीच्या रोजच्या कुरापतींनी त्यांची रणभूमी नष्ट झाली आहे. याबद्दलच्या त्याच्या कांगाव्याची स्वत: मुस्लीम राष्ट्रे, युनो व अमेरिकेसह अन्य अनेक देशांनी थोडीही दखल घेतली नाही. ३७० च्या कारवाईपूर्वी भारताने जागतिक समूहांशी संवाद साधला नसेल असे नाही. म्हणूनही पाकिस्तानची स्थिती जखमी सिंहासारखी झाली आहे. ३७० ची घटना म्हणजे इस्लाम धर्मावरील आक्रमण असून त्याला त्याच पद्धतीने किंबहुना जोरकसपणे उत्तर देण्याची त्याची दर्पोक्ती आहे; पण भारत त्यासाठी सिद्ध व समर्थ असल्याचे तो जाणून आहे.या सोबतच देशभरातील जनतेकडून एक अतिमहत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, देशहित लक्षात घेऊन सरकारने केलेली ही कामगिरी देशाने स्वाभिमानाने स्वीकारली आहे; पण पुढे प्रश्न असा पडतो की, याच बळावर येत्या काळात काही अनुचित-अवांच्छित निर्णय होऊन त्यातून वेगवेगळ्या समाजात तेढ निर्माण होऊन समाज दुभंगून जाईल. काही दुर्बल-वंचित घटक विकासापासून व त्यांच्यासाठीच्या कायद्यांपासून वंचित होऊन देशाच्या मुख्य प्रवाहातून दूर फेकले जातील, असे होऊ नये ही अपेक्षा, कारण या प्रश्नावरून हे घटक अस्थिर, अस्वस्थ व साशंक आहेत, म्हणूनच या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर