शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:22 IST

विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही.

राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते आहेत. विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेत एका मंत्र्यावर गुंडांना पाठीशी घालत असल्याच्या केलेल्या गंभीर आरोपाची सरकारने तेवढ्याच तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. ज्या टोळीचा विखे पाटील यांनी विधानसभेत उल्लेख केला, ती गुंडांची ‘मंडी टोळी’ निश्चितच यवतमाळची आहे. या टोळीकडे चार हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग करणाऱ्या या कुख्यात टोळीला एका मंत्र्याचे पाठबळ आहे, असा गंभीर आरोप विखे पाटील यांनी प्रत्यक्ष सभागृहातच केला. ठोस पुरावे असल्याशिवाय विखेंसारखा ज्येष्ठ नेता असा खळबळजनक आरोप करणार नाही हे सरकारनेही लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या मंत्र्याचा उल्लेख केला त्याचे नाव उघड करण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यातले सत्य बाहेर काढण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी आपसूकच सरकारवर येऊन पडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि शालीन राजकारणी म्हणून ओळखले जातात. तेव्हा त्यांनी विखेंच्या आरोपांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणाºया गुंडांच्या या टोळीचा बंदोबस्त करायला हवा. शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या त्या मंत्र्याचे गुंडांना असलेले पाठबळ खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मोडून काढायला हवे. यवतमाळकरांनीही या गुंडांच्या दहशतीला बळी न पडता निर्भीडपणे समोर आले पाहिजे. प्रसंगी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या पाहिजे. विशेष म्हणजे ज्या श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वालच्या नावांचा विखे पाटलांनी उल्लेख केला. त्यापैकी श्याम जयस्वाल हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून त्यांच्यावर कोणतेच गंभीर गुन्हे नसल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी जयस्वालांचे जणू वकीलपत्रच घेतले की काय, असे वाटायला लागले आहे. बंटी जयस्वाल यांचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विखे पाटलांनी आपल्या भाषणात ‘या’ मंत्र्याचे नाव उघड केले नसतानाही डांगे यांनी तातडीने पत्रपरिषद बोलावून यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचा मंडी टोळीशी संबंध नसल्याचे सांगत संशयाला वाट मोकळी करून दिली आहे. विखे पाटलांनी याबाबतचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. तेव्हा त्यांनी ते पुरावे खरोखरच जाहीर करायला हवे. लोकांपुढे या दहशतीची लख्तरे टांगायला हवी. तसे झाले नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेदेखील त्या गुंडांना घाबरतात की काय, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. लोकशाहीत विरोधी पक्ष नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आता विखे पाटलांची जबाबदारी स्वाभाविकच वाढली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील