शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:22 IST

विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही.

राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते आहेत. विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेत एका मंत्र्यावर गुंडांना पाठीशी घालत असल्याच्या केलेल्या गंभीर आरोपाची सरकारने तेवढ्याच तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. ज्या टोळीचा विखे पाटील यांनी विधानसभेत उल्लेख केला, ती गुंडांची ‘मंडी टोळी’ निश्चितच यवतमाळची आहे. या टोळीकडे चार हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग करणाऱ्या या कुख्यात टोळीला एका मंत्र्याचे पाठबळ आहे, असा गंभीर आरोप विखे पाटील यांनी प्रत्यक्ष सभागृहातच केला. ठोस पुरावे असल्याशिवाय विखेंसारखा ज्येष्ठ नेता असा खळबळजनक आरोप करणार नाही हे सरकारनेही लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या मंत्र्याचा उल्लेख केला त्याचे नाव उघड करण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यातले सत्य बाहेर काढण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी आपसूकच सरकारवर येऊन पडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि शालीन राजकारणी म्हणून ओळखले जातात. तेव्हा त्यांनी विखेंच्या आरोपांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणाºया गुंडांच्या या टोळीचा बंदोबस्त करायला हवा. शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या त्या मंत्र्याचे गुंडांना असलेले पाठबळ खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मोडून काढायला हवे. यवतमाळकरांनीही या गुंडांच्या दहशतीला बळी न पडता निर्भीडपणे समोर आले पाहिजे. प्रसंगी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या पाहिजे. विशेष म्हणजे ज्या श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वालच्या नावांचा विखे पाटलांनी उल्लेख केला. त्यापैकी श्याम जयस्वाल हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून त्यांच्यावर कोणतेच गंभीर गुन्हे नसल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी जयस्वालांचे जणू वकीलपत्रच घेतले की काय, असे वाटायला लागले आहे. बंटी जयस्वाल यांचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विखे पाटलांनी आपल्या भाषणात ‘या’ मंत्र्याचे नाव उघड केले नसतानाही डांगे यांनी तातडीने पत्रपरिषद बोलावून यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचा मंडी टोळीशी संबंध नसल्याचे सांगत संशयाला वाट मोकळी करून दिली आहे. विखे पाटलांनी याबाबतचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. तेव्हा त्यांनी ते पुरावे खरोखरच जाहीर करायला हवे. लोकांपुढे या दहशतीची लख्तरे टांगायला हवी. तसे झाले नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेदेखील त्या गुंडांना घाबरतात की काय, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. लोकशाहीत विरोधी पक्ष नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आता विखे पाटलांची जबाबदारी स्वाभाविकच वाढली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील