शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

श्रद्धेला मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:30 AM

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून

केवळ कोकणात नव्हे, तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या दिवे आगार सुवर्ण गणेशाच्या चोरीच्या घटनेने फार मोठी खळबळ उडाली होती. तिथे सुरक्षेसाठी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांचे खून करून, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इथल्या सुवर्ण गणेशाची चोरी झाली होती. यापूर्वी दानपेटी चोरीच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, थेट देवच पळवून नेल्याची घटना घडल्याने भाविकांच्या श्रद्धेलाच धक्का बसला होता. श्रद्धा आणि देवत्व या गोष्टी थेट कायद्यात बसत नसल्याने, कोर्ट-कचेरीत याचा निकाल कसा लागणार, याची चिंताही होती. मात्र, न्यायालयाने आरोपींना कायमची अद्दल घडवली. रायगड जिल्ह्यातील दिवे आगारमधील सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर पाच वर्षांपूर्वी दरोडा टाकून, दोघा निष्पाप सुरक्षा रक्षकांचा अत्यंत निर्घृणपणे लोखंडी पहारींनी खून करून, सुवर्ण गणेशाची १ किलो ३२५ ग्रॅम सोन्याची प्राचीन मूर्ती व २२५ ग्रॅम वजनाचे अन्य सोन्याचे दागिने, असा ११ लाख २० हजार रु पये किमतीचा ऐवज लुटून नेणाºया १० दरोडेखोरांपैकी पाच जणांना आजन्म जन्मठेप आणि उर्वरित पाचपैकी तीन महिलांसह दोघांना सक्तमजुरीचा झालेली शिक्षा, ही त्या सुवर्ण गणेशानेच दिली असल्याची भावना दिवे आगारसह राज्यातील सर्व गणेशभक्तांची आहे. देव आणि भक्ती या संकल्पनेला जरी कायद्यात स्थान नसले, तरी सोन्याच्या गणपतीची चोरी करून, तो वितळवून त्यांची विक्री करणे, हा गुन्ह्याचा प्रकार केवळ नास्तिकता दर्शविणारा नाही, तर देव ही संकल्पना मानणाºया लाखो-करोडो लोकांच्या मनावर भावनिक वार करणारा असाच आहे. ‘रेअरेस्ट आॅफ द रेअरेस्ट’ अशा प्रकारच्या गुन्ह्यातच फाशीची शिक्षा देता येते आणि हा गुन्हा तसाच असल्याने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. पोलीस तपास यंत्रणेने धार्मिक भावना कुठेही दुखावणार नाही, याची सतत काळजीही घेतली. प्रारंभी हे दरोडेखोर देव आणि भक्ती यावर मोठी श्रद्धा असणाºया महाराष्ट्रातील नसावेत, अशी भावना पोलीस तपास यंत्रणेची होती. परिणामी, दिवे आगारपासून तपासास प्रारंभ केल्यावर सापडलेल्या एका तपासाच्या दुव्यानुसार पोलीस तपास पथके शेजारील राज्यातदेखील पोहोचली होती, पण अखेर दरोडेखोर आपल्याच राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यावर, पोलीस तपास यंत्रणादेखील थक्क झाली.श्रद्धेला तडा देणाºया या घटनेबरोबरच, खुनासारख्या कृत्याला अखेर योग्य ती शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. शेवटी श्रद्धा एखाद्या मूर्तीमध्ये नसते, तर ती आपल्या मनातही असते. दिवे आगारच्या घटनेनंतर जो निकाल लागला, त्यामुळे श्रद्धेला बळकटी प्राप्त झाली. ही जनमानसात उमटलेली भावना आजच्या समाजमनाचे प्रतिबिंब व्यक्त करते.

टॅग्स :Courtन्यायालय