शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

...फक्त कमळाकडे बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 13:13 IST

मिलिंद कुलकर्णी अमळनेरला भाजपच्या सभेत झालेल्या मारहाणीच्या अध्यायाचे पडसाद अनेक दिवस उमटतील. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहिलेले आहे, पण ...

मिलिंद कुलकर्णीअमळनेरला भाजपच्या सभेत झालेल्या मारहाणीच्या अध्यायाचे पडसाद अनेक दिवस उमटतील. भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहिलेले आहे, पण काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेते-कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन ‘काँग्रेसयुक्त भाजप’कडे वाटचाल सुरु आहे. परंतु, इतक्या लवकर अवगुण आत्मसात होतील, असे वाटत नव्हते. ही वाटचाल का आणि कशामुळे होत आहे, हा प्रश्न पडला. आमचा एक सन्मित्र आहे, ज्याचा प्रवास बालस्वयंसेवक, विद्यार्थी कार्यकर्ता आणि नंतर भाजप पदाधिकारी असा झालेला आहे, त्याच्याशी गुजगोष्टी करायचे ठरवले. ‘शतप्रतिशत भाजप’च्या संकल्पनेत इतर पक्षीयांची एवढी गर्दी झाली आहे की, हा निष्ठावंत कार्यकर्ता सध्या वर्तुळाबाहेर फेकला गेला आहे. पण त्याला हे मान्य नाही. नानाजी देशमुख यांचे उदाहरण देत तो, सध्या वय झाले नसले तरी थोडी विश्रांती घ्यायचे ठरवलेय, असे समर्थन करतो. मला उत्सुकता होती, अमळनेरसंबंधी तो आणि त्याच्यासारखे निष्ठावंत काय म्हणतात. म्हणून त्याच्याशी संवाद साधला.मी : अमळनेरच्या घटनेतील मंडळी तर पक्षाची निष्ठावंत मंडळी आहे. तरी त्यांच्याकडून हा प्रकार कसा घडला? असा प्रकार बाहेरुन पक्षात आलेल्याने केला तर तुम्ही काँग्रेसी संस्कृतीच्या माथी खापर फोडतात?सन्मित्र : पक्षाने सगळ्यांनाच सारखे घडवले आहे. कुंभार जसा असंख्य माठ घडवतो, त्यापध्दतीचे काम पक्ष करीत असतो. माठ गळका, फुटका निघाला तर कुंभाराला दोष का म्हणून द्यायचा? माठाची हाताळणी व्यवस्थित झाली नसेल, क्षमतेपेक्षा अधिक पाणी भरले असेल, माती गुणवत्तापूर्ण नसेल म्हणूनदेखील तो फुटू, गळू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. मला वाटते, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.मी : आज फक्त तुमचे ऐकायला आलो आहे. युक्तीवाद करायला नाही. त्यामुळे तुम्ही सांगाल ते ऐकून घेईल. मला एक प्रश्न पडतो, जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, एक अपवाद वगळता २५ वर्षांपासून तुमचा खासदार या मतदारसंघातून निवडून येत आहे. तरीही ही उमेदवारीची काटाकाटी, व्यासपीठावर जबाबदार पदाधिकाऱ्यांची मारामारी का?सन्मित्र : तुमचं म्हणणं बरोबर आहे. भाजप हा आता विशाल कुटुंबासारखा झाला आहे. सर्वसामान्य मोठ्या कुटुंबात जशा गोष्टी होतात, तेच भाजपमध्ये होत आहे. वेगळे काही नाही. फक्त तुमच्यासारखे मीडियावाले त्याला अवास्तव रुप देत आहेत. मोठ्या कुटुंबात बाहेरुन सुना येतात, त्यांची संस्कृती, सभ्यता घेऊन येतात. घरातील मुलींना सुनांचे अतिक्रमण वाटते. सुनांना घरातील नियम, रितीरिवाज यांचा जाच वाटतो. त्यामुळे भांड्याला भांडे लागते. तसेच घडते आहे. पक्षाचा पाया विस्तारत असताना या गोष्टी घडणारच आहेत. जे चुकीचे करतील, त्यांना पक्षशिस्त समजावून सांगितली जाईल. तशी पक्षात व्यवस्था असते.मी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार घडल्याने मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात नाही का? पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही का?सन्मित्र : भाजप हा व्यापक पाया असलेला, सखोल, समृध्द विचारसरणी, संस्कृती असलेला पक्ष आहे. छोट्या गोष्टींना फार महत्व न देता देशाच्या भल्यासाठी जनता भाजपला समर्थन देईल. कमळ कुठे उगवते, तर ते चिखलात उगवते. आपण कमळाकडे पहायचे, चिखलाकडे नाही. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे, खासदार कोण आहे, याला महत्त्व नाही. काल ए.टी.पाटील होते, उद्या दुसरे कोणी असेल. आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात काही संभ्रम, गोंधळ नाही. मतदारांपर्यंत ते हा संदेश व्यवस्थित पोहोचवत आहे. अर्धपन्नाप्रमुख, पन्नाप्रमुख, बुथप्रमुख, विस्तारक अशी आमची रचना आहे, त्यामुळे...मी त्यांचे वाक्य तोडत संघटनात्मक रचनेच्या चक्रव्युहात न अडकता निरोप घेतला. बाहेर पडल्यावर विचार केला, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली काय? का माझाच काही गोंधळ होत आहे? मोदी हे जरी प्रश्नांची उत्तरे देत नसले तरी या सन्मित्राने किमान उत्तरे तर दिली. आज ती ध्यानात आली नसली तरी २३ मे नंतर उलगडा होऊ शकेल, असे समाधान करुन घेत निवांत झालो.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव