शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आकाशाशी नाते’ जोडलेला जयंतदादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 10:11 IST

गेल्याच महिन्यात भेटलो, तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल...

५ एप्रिलला पुण्याहून मुंबईला परतत होतो. वासुदेव (माझे पती) सहज बोलून गेले ‘जयंतदादांसारखी माणसं यापुढे दुर्मीळ असतील’... मलाही ते शब्दश: पटलं. त्यादिवशी सकाळी आम्ही उभयता केवळ जयंतदादाला भेटायला म्हणून पुण्याला गेलो होतो. खूप गप्पागोष्टी झाल्या.  मंगला वहिनीची अनुपस्थिती जाणवत होती; पण तसं न दाखवता आम्ही अगदी क्रिकेटसकट कितीतरी विषयांवर बोलत होतो.जयंतदादानं तो तपासत असलेले नवीन लेखनाचे प्रिंटआउट वाचायला दिले. त्यात ‘मोरू परतून आला’ या शीर्षकाखाली माझ्या बाबांबद्दल प्रेमपूर्वक आदरानं भरभरून लिहिलं होतं. दिग्विजयी भाच्यानं लाडक्या मोरू मामाला दिलेली ती प्रेमाची पावती वाचून मन भरून आलं. माझे वडील जयंतहून फक्त ८ वर्षांनी मोठे होते. त्यामुळे त्यांच्यात भावाभावांचं सख्य होतं. 

पोटभर गप्पा करून आरामात निघालो. पण मन त्याच्या आठवणींनीच गुंतलं होतं. जयंतदादा माझा सख्खा आतेभाऊ... भारताचं भूषण असला तरी माझ्या बाबांना ‘माझे मोरूमामा’ असं प्रेमानं संबोधणारा,  माझ्या आईच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या दिवशी हक्कानं बोलणारा, कोविडमुळं अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाही माझ्या पहिल्या पुस्तकासाठी  कौतुकानं प्रस्तावना लिहिणारा... कुटुंबाशी जिव्हाळा जपून असलेला मनमिळाऊ भाऊ !

लहानपणापासून जयंत जात्याच अतिशय हुशार.  त्यात आई-वडील-मामा असं तिहेरी मार्गदर्शन मिळाल्यामुळं संस्कृत, गणित, विज्ञानच नव्हे तर काव्य-शास्त्र-विनोद-साहित्य असे नानाविध संस्कार नकळत घडत गेले होते. माझ्या वडिलांनी (सुप्रसिद्ध गणिती प्रा. मो. शं. हुजूरबाजार) रोज रात्री घरच्या फळ्यावर एक आव्हानात्मक गणित लिहून सकाळपर्यंत जयंतनं ते सोडवून दाखवायचं असा उपक्रम सुरू केला होता. परिणामी जयंतला गणिताची अतिशय गोडी लागली ती कायमची! जयंतदादा आणि मंगलावहिनी एक परिपूर्ण जोडी होती. सहजीवनाचा मनमुराद आस्वाद घेत, एकमेकांचा आदर करत पुढं केम्ब्रिजहून भारतात परत येऊन दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले. गीता, गिरिजा आणि लीलावती या त्यांच्या कन्या आज आपापल्या क्षेत्रात स्वकर्तृत्वानं नावाजल्या जात आहेत.वाराणसीत  शिक्षण घेऊन आपल्या वडिलांचा वारसा चालवत केम्ब्रिजला उच्च शिक्षणासाठी गेलेला हा माझा भाऊ रँग्लर जयंत नारळीकर म्हणून प्रसिद्ध झाला. पुढे खगोलशास्त्रज्ञ म्हणून जगप्रसिद्ध झाला. सन्मानाच्या ‘पद्मविभूषण’ सन्मानासह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळत गेले. त्यानं साध्यासोप्या मराठी भाषेत लिहिलेल्या रंजक मराठी विज्ञान कथा वाचत एक पिढी मोठी झाली. गणित आणि विज्ञान सुलभ करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नारळीकर दाम्पत्यानं घेतलेले विशेष परिश्रम आजही चर्चेचा विषय आहेत.

दोन वर्षांपूर्वी मंगलावहिनी गेली. तिच्या विरहाचं दु:ख मनात कायम होतं; पण त्यावर मात करून जयंतनं कालपरत्वे ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. इतकं उत्तुंग यश मिळालं तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून ‘आकाशाशी नाते’ जडवून बसलेला माझा जयंतदादा. गेल्याच महिन्यात भेटलो, तेव्हा असं वाटलंही नाही की ही शेवटची भेट असेल...    - सुधा हुजूरबाजार-तुंबे, मुंबई

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकर