शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिवाला जीव देणारी माणसं मिळवणारा माणूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:49 IST

ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला  अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले.

शिवराज पाटील-चाकूरकर, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहमंत्री 

जवाहरलाल दर्डा यांच्यामध्ये व्यवहारज्ञान, राजकीय ज्ञान, तंत्रज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान अशा चारही ज्ञानांचा सुरेख संगम मला सतत पाहायला मिळालेला आहे. जग बदलतंय, झपाट्यानं  पुढे जातंय. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलं नाही, तर आपण काळाच्या बाहेर फेकले जाऊ, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. पण, त्याचवेळी अध्यात्माने ज्या गोष्टी शिकवल्या आहेत, त्या गोष्टी त्यांनी मनस्वी आत्मसात केलेल्या होत्या. बाबूजी राजकीय नेते होते, मंत्री होते, ‘लोकमत’चे संस्थापक संपादक होते; पण त्यांनी कधीही मोठेपणाचा आव आणला नाही, मिरवला नाही आणि आपल्यासमोरचा दुसरा कोणी लहान आहे, असं त्यांनी कधीही मानलं नाही. ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला  अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग्रेसच्या विचारांचा आधार बनले. यासाठी त्यांनी अत्यंत जवळचे मित्र, महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची राजकीय साथही सोडली; पण, काँग्रेसचा विचार सोडला नाही. यात त्यांची फार मोठी दूरदृष्टी होती. मी त्यांच्याच यवतमाळ गावी, त्यांच्याच घरी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यावेळी हेमवतीनंदन बहुगुणाजी आले होते, त्यावेळपासून मी पाहातो आहे, या नेत्यानं कोणालाही नावं ठेवली नाहीत. त्यांची ही जीवननिष्ठा होती. बाबूजींनी सुरू केलेल्या ‘लोकमत’मधून कोणाचीही बदनामी अकारण त्यांनी केली नाही. त्याचमुळे ‘लोकमत’ सामान्यांचं वृत्तपत्र झालं.  त्यांच्यासोबत काम करणारे सहकारी जिवाला जीव देऊन काम करीत होते. अशा प्रकारचे सहकारी तयार करणं आणि त्यांना सांभाळण ही सोपी गोष्ट नव्हे, पण दर्डाजींना ते सहज जमलं होतं. ही कंपनी आपलीच आहे असं वातावरण  तयार करण्याची क्षमता दर्डाजींमध्ये होती आणि हा संस्कारही अध्यात्माचा संस्कार आहे, असं मी मानतो. या संस्कारांमध्ये मानवता प्राधान्याने असते. त्या बळावरच उभे राहाते ते नेतृत्व अक्षय असते.विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. ते आणि त्यांचे बंधू राजेंद्र यांच्यावरील बाबूजींच्या संस्कारांचा ठसा मी सातत्याने पाहात आलो आहे. दर्डाजींच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना मन:पूर्वक अभिवादन! 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरLokmatलोकमत