शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जनमन : प्रिय देवेंद्रजी, आता तुमचीच आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 06:22 IST

Janman: या लढ्यातील सैन्य ही जनता आहे आणि ती तुमच्यासोबत आहे, हे आश्वस्त करण्यासाठीच हा पत्रप्रपंच! 

प्रिय हा शब्द मुद्दाम वापरतोय. कारण, अजून तरी दुसर्‍या कुणासाठी हा शब्द वापरावा, अशी स्थिती आज राज्यात नाही. ज्या पद्धतीचे कोरोनाचे व्यवस्थापन राज्यात चालले आहे, ही स्थिती नक्कीच भूषणावह नाही. आज आपण मुख्यमंत्री असता, तर  हे दिवस नक्कीच ओढवले नसते. (माझ्यावर भाजपधार्जिणा हा आरोप होईल, याची जाण आहे; पण स्पष्ट लिहू शकत नसलो तरी एवढेच सांगतो की, आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी आमची स्थिती झाली आहे.)

देवेंद्रजी पंधरा वर्षं तुमची आक्रमकता, तुमचा अभ्यासू बाणा आम्ही पाहिला आहे. कधी काळी आमच्या मित्रपक्षात तुम्ही होतात. आज राज्य होरपळत असताना तुम्ही गप्प का, तुमचा आक्रमक बाणा कुठे गेला, असा प्रश्न आमच्यासारख्या अनेकांना पडतो. काहींनी याचा अर्थ कदाचित पुन्हा नवीन समीकरणं जुळविण्यासाठी तुम्ही गप्प असाल, असाही लावला. अर्थात तरीही तुमच्या धैर्याचे कौतुकच करावे लागेल. असे अनेक आरोप होऊनही तुम्ही अभ्यासपूर्णच भूमिका घेता.

कोरोनाकाळात तुम्ही सरकारला पाठविलेली सर्व पत्रे  वाचली. तुम्ही सातत्याने विधायक सूचना करीत होतात. चाचण्या वाढवा असे सातत्याने सांगत होतात; पण सरकार ऐकायला तयार नव्हते. वर्ष उलटले पण, सरकारने चाचण्या एक लाखावर कधी नेल्या नाहीत. अख्ख्या सरकारने जेव्हा स्वत:ला घरात कोंडून घेतले, तेव्हा तुम्ही राज्यभर फिरत होतात. प्रत्येक दौर्‍यानंतर आढळलेल्या नोंदी तुम्ही सरकारला कळविल्या. कुणीही न सांगता तुम्ही हे करीत होतात. सरकारला आयते इनपुट्स मिळत होते; पण त्यांनी केवळ तुमच्यात विरोधी पक्षनेता पाहिला. खरे तर त्या काळातील सच्चे सहकारी तुम्हीच होतात.

आता लसीकरणावर राजकारण होत आहे. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, साधे बेड या स्वत:च्या जबाबदारीवर सत्ताधारी बोलणार नाहीत, कारण ते अवघड जागेचे दुखणे आहे. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी पाहतोय. कोण मैदानात आहे आणि कोण वाहिन्यांच्या बूमसमोर, हे लोकांना कळते. 

आज तीन पक्ष तुमच्यावर तुटून पडतील, कदाचित माध्यमेही सोबत नसतील; पण आम्ही तुमच्या क्षमता ओळखतो. तुम्ही एकटे ही लढाई नक्की जिंकाल, हा विश्वास आहे. इतिहास याची नोंद सुवर्णाक्षराने करेल. या लढ्यातील सैन्य ही जनता आहे आणि ती तुमच्यासोबत आहे, हे आश्वस्त करण्यासाठीच हा पत्रप्रपंच! 

- राहुल खोब्रागडे, तेल्हारा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस