शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

स्वातंत्र्यलढ्याला चालना देणारे हत्याकांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:57 IST

दूरदर्शन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात असत्या तर भारत हे राष्ट्र १९४७ ऐवजी त्याअगोदर २५ वर्षे स्वतंत्र झाले असते.

>> व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

दूरदर्शन आणि सोशल मीडिया या दोन्ही गोष्टी जर विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अस्तित्वात असत्या तर भारत हे राष्ट्र १९४७ ऐवजी त्याअगोदर २५ वर्षे स्वतंत्र झाले असते. १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची भीषणता एवढी जबरदस्त होती की त्यामुळेच भारताच्या स्वातंत्र्याची निश्चिती झाली असती. त्या हत्याकांडाची भीषणता एक महिन्यानंतर रवींद्रनाथ टागोर यांना समजल्यावर त्यांनी त्याच्या निषेधार्थ स्वत:ला मिळालेला सरदार हा सन्मान परत केला होता. शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी वसाहतवाद्यांनी स्वत:ची तथाकथित तेजोमय सत्ता निर्दयी पद्धतीने कलंकित केली. अमृतसर येथील जालियनवाला बागेच्या २०० बाय २०० यार्ड परिसरात जमलेल्या शेकडो निष्पाप भारतीयांवर ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या पलटणीला गोळीबार करण्याचा हुकूम दिला. ही माणसे बैसाखी उत्सवासाठी एकत्रित झाली होती आणि त्यांच्या सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांना बंदी करून तुरुंगवासात टाकल्याचा निषेधही करीत होती.

तेथे जमलेल्या गर्दीला तेथून निघून जाण्याची संधी न देता बागेचे मुख्य दार अडवून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ब्रिटिश सैनिकांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्यावरच गोळीबार बंद झाला. गोळीबार सुरू होताच लोक पळू लागले तर काहींनी आत्मसंरक्षणासाठी परिसरात असलेल्या विहिरीत उड्या टाकल्या! त्या गोळीबारामुळे उडालेल्या गोंधळात एका सहा महिन्यांच्या बालकासह शेकडो लोक मारले गेले. त्या गोळीबाराच्या खुणा आजही त्या परिसरातील इमारतीच्या भिंतींवर जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.

जालियनवाला बाग घटनेला एक संदर्भ होता. वास्तविक भारताने पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सत्तेला सहकार्य करीत लढाईसाठी मनुष्यबळ आणि शस्त्रास्त्रे पुरविली होती. भारतात मर्यादित स्वायत्तता मिळावी हा त्यामागचा हेतू होता. पण वसाहतवादाविरुद्धची लढाई बंगाल आणि पंजाब या प्रांतात सुरूच होती. स्वातंत्र्यलढ्यात ही दोन राज्ये आघाडीवर होती. स्वातंत्र्य चळवळीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकांच्या राजकीय व मुलकी हक्कावर निर्बंध आणण्यासाठी १९१५ साली डिफेन्स आॅफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर करण्यात आला होता. जर्मन व बोल्शेव्हिक क्रांतिकारकांसोबत असलेले भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे संबंध शोधून काढण्यासाठी ‘राजद्रोही विरोधी’ समितीची स्थापना ब्रिटिश न्या. मू. सिडनी रौलट यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. त्यानंतर लोकांवर दडपशाही करणारा रौलट अ‍ॅक्ट १९१९ हा कठोर कायदा लादण्यात आला. त्याचा निषेध करणाºया अमृतसर येथील नागरिकांना गुडघ्यावर रांगण्यास भाग पाडले होते. मौंटग्यु चेम्सफोर्ड यांनी १९१७ मध्ये केलेल्या राजकीय सुधारणा भारतीय नेतृत्वाला पुरेशा वाटल्या नाहीत. त्यामुळे लोकांच्या असंतोषात भरच पडली होती.

भारतावर दडपशाहीने राज्य करता येणार नाही याची जाणीव झाल्याने ब्रिटिश सरकारने काही प्रगतिशील आणि प्रशासकीय सुधारणा अमलात आणल्या. ब्रिटिश सरकार हे न्याय, योग्य वागणूक आणि समतेने राज्य करण्यास बांधील आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले जात होते. जालियनवाला बागची घटना घडण्यापूर्वी समाजातील नेमस्त नेते लोकांना प्रशासनात अधिक वाटा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते.

अमृतसर येथील बंदिस्त बागेत घडलेल्या निर्दयी कृत्याने लोकांचा ब्रिटिशांवरचा विश्वास उडून गेला. तोवर लोकांना इंग्रज माणूस हा उदार, न्याय देणारा वाटत होता. तो त्यांना एकदम रक्तपिपासू हैवान वाटू लागला. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी जनरल डायरने गोळीबाराचा आदेश दिला, पण तो ब्रिटिश सरकारवरच उलटला. सरकारने देशभर राज्य करण्याचा न्याय्य हक्कच त्यामुळे गमावला. ब्रिटनचे युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी त्या कृत्याची गणना ‘राक्षसी’ अशीच केली. तर तेव्हाचे ब्रिटनचे पंतप्रधान हिज हायनेस अ‍ॅस्क्विथ यांनी ‘आपल्या इतिहासातील अत्यंत लज्जास्पद कृत्य’ असे त्या घटनेचे वर्णन केले. हाउस आॅफ कॉमन्समध्ये ८ जुलै १९२० रोजी त्या विषयावरील चर्चेत भाषण करताना चर्चिल यांनी त्या घटनेचे वर्णन करताना म्हटले, ‘‘तेथे जमलेली माणसं नि:शस्त्र होती आणि ती कुणावर हल्लाही करीत नव्हती. त्यांच्यावर गोळीबार सुरू होताच जमाव पळू लागला, पण लंडनच्या ट्रॅफल्गर स्क्वेअरपेक्षा कमी असलेल्या जागेतून जमाव पळत असताना एकाच गोळीने तीन ते चार लोक मारले जात होते. गोळ्यांचा मारा चुकविण्यासाठी लोक जमिनीवर झोपले तर त्यांच्या दिशेने गोळ्या चालविण्यात आल्या. हा प्रकार सतत आठ ते दहा मिनिटे सुरू होता.’’ त्यानंतर सभागृहाने २४७ विरुद्ध ३७ मतांनी डायरला दोषी ठरवून त्याला सेवेतून बडतर्फ केले. पण हाउस आॅफ लॉर्ड्सने मात्र डायरचे कौतुक केले!

जालियनवाला बाग हत्याकांडामुळे ब्रिटिश सत्ता भारतातून जाण्यासाठी केल्या जाणाºया प्रयत्नांना वेग आला. त्यातूनच असहकाराची चळवळ, इंडियन नॅशनल आर्मीची निर्मिती आणि भारत छोडो आंदोलन होऊन देश स्वतंत्र झाला. शंभर वर्षांपूर्वी देशासाठी प्राणार्पण करणाºया जनतेविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करू या. त्यांच्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. नवभारताची निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.