शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

जळगावात ‘बदल’ घडतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:27 IST

बदल अनपेक्षित

ठळक मुद्देकालमर्यादेत प्रश्न सुटणार का?
मिलिंद कुलकर्णी्र्र्रजळगाव: केंद्र, राज्य आणि आता जळगावातही भाजपाकडे सत्ता देऊन जळगावकरांनी ‘बदल’ घडविला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ‘बदला’च्या बाजूने कौल दिला. बदल, परिवर्तन घडले असले तरी ते त्याचे परिणाम, दृष्यफळ दिसायला काही कालावधी द्यावा लागेल, हेदेखील जळगावकरांना माहित आहे. त्यामुळे वर्षभरात बंद पडलेली विमानसेवा, ठप्प झालेले फागणे ते तरसोद, जळगाव ते औरंगाबाद, बोदवड ते औरंगाबाद चौपदरीकरण, रखडलेला शिवाजीनगर, भोईटेनगर, दूध संघाचा रेल्वे उड्डाणपूल, महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्न, हुडको आणि जिल्हा बँकेचा कर्जाचा प्रश्न या विषयाला वेळ लागणार याची कल्पना आहे. पुन्हा गिरीश महाजन यांनी दिलेल्या कालमर्यादेत हे प्रश्न सुटणार असा संपूर्ण विश्वास जळगावकरांना आहे. (कालमर्यादा : जळगावचे प्रश्न न सुटल्यास विधानसभेत मत मागायला येणार नाही) पण अलीकडे वेगळाच बदल जळगावात दिसून येत आहे. हा ‘बदल’ मात्र जळगावकरांना अनपेक्षित आहे, पण हळूहळू त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. 1) भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर रंगलेली नववर्ष स्वागताची दारुपार्टी आणि त्यात बºहाणपूरच्या नर्तकींच्या नृत्यावर बेभाव होऊन नाचणारे प्रतिष्ठीत, श्रीमंत राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक...आता आनंद साजरा करण्याची ही पध्दत जळगावात रुढ होतेय, त्यात काय वावगे. पण त्याचीही चर्चा रंगली. उगाच लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलावर आरोप झाले. ते जाऊद्या. एक नवा बदल बघा. पूर्वी आंबटशौकीन बºहाणपूर आणि मुंबईला जात असत. अलिकडे बºहाणपूरकर जळगावात येऊन करिष्मा दाखवू लागले आहेत. 2) २०१८ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भाजपा नगरसेविकेचे पती संतोष पाटील यांच्यावर गोळीबार झाला. पाटील यांच्याकडे रिव्हॉल्वर होते आणि त्यांनी स्वरंरक्षणासाठी ते बाहेर काढल्याने बचावले. मुंबई, पुणे, नागपुरात राजकीय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ऐकले होते; आता हे जळगावातही असे हल्ले होऊ लागले. हा ‘बदल’ नाही काय? रिव्हॉल्वर असल्याने पाटील बचावले, सुदैव त्यांचे. सामान्य माणसानेदेखील आता स्वसंरक्षणासाठी ‘रिव्हॉल्वर’साठी अर्ज करावा. प्रत्येकाला ‘रिव्हॉल्वर‘ मिळेल, त्याचे संरक्षण होईल. पुन्हा रिव्हॉल्वर विक्रीचा व्यवसाय करुन एका बेरोजगाराला काम मिळेल आणि ‘मेक इन इंडिया’त आणखी एक उद्योग उभारला जाईल. 3) जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अनेक शासकीय कार्यालये आहेत. जिल्हाभरातून लोक रोज जळगावात येत असतात. बाजारपेठ मध्यवर्ती भागात केंद्रित आहे. त्यामुळे नागरीकरणाचा दुष्परिणाम अतिक्रमणांच्या निमित्ताने दिसून येतो. महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाने संयुक्त मोहीम राबवित अतिक्रमण निर्मूलन सुरु करताच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेला विरोध केला. विरोधाचे कारण म्हणजे त्यांच्या नातेवाईकाच्या शोरुमचे काढलेले अतिक्रमण हे उघड असताना त्यांनी मात्र साळसूदपणे व्यापारी मंडळींची बाजू घेत आयुक्तांवर निशाणा साधला. बदली करुन घेण्यासाठी आयुक्तांनी ही मोहीम राबवली आहे. हिंमत असेल तर सतरा मजलीचे अतिक्रमित मजले पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. आता राज्यात भाजपाचे सरकार आहे, नगरविकास विभाग भाजपाच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, आमदार भाजपाचे आहेत, त्यांनी आयुक्तांना आव्हान देण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांकडून मजले पाडण्याचे आदेश का आणू नये. पण...तसे होणार नाही. कारण जळगावात ‘बदल’ घडतोय. 4) जळगावात ‘बदल’ सर्वच क्षेत्रात होतोय. गतिमान आणि पारदर्शक कारभाराचे बिरुद मिरवणाºया प्रशासनामध्ये तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे बदल्यांचे विषय जाहीरपणे मांडत आहे. विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे झालेला ‘बदलीहट्ट’ आणि शिवाजी दिवेकर यांची झालेली बदली हा त्याचाच परिपाक आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांना जळगावच्या जिल्हाधिकारीपदात रस असल्याच्या बातम्या झळकल्या. तर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांचे नव्या जिल्हाधिकारी नियुक्तीच्या मागणीचे पत्र स्वत: व्हायरल केले. बघा जळगावकरांनो, किती बदल घडतोय. प्रशासन किती पारदर्शकपणे काम करते आहे. यालाच म्हणतात ‘सब का साथ, सबका विकास’.
टॅग्स :Jalgaonजळगाव