शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

जळगावात ‘बदल’ घडतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:27 IST

बदल अनपेक्षित

ठळक मुद्देकालमर्यादेत प्रश्न सुटणार का?
मिलिंद कुलकर्णी्र्र्रजळगाव: केंद्र, राज्य आणि आता जळगावातही भाजपाकडे सत्ता देऊन जळगावकरांनी ‘बदल’ घडविला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवत ‘बदला’च्या बाजूने कौल दिला. बदल, परिवर्तन घडले असले तरी ते त्याचे परिणाम, दृष्यफळ दिसायला काही कालावधी द्यावा लागेल, हेदेखील जळगावकरांना माहित आहे. त्यामुळे वर्षभरात बंद पडलेली विमानसेवा, ठप्प झालेले फागणे ते तरसोद, जळगाव ते औरंगाबाद, बोदवड ते औरंगाबाद चौपदरीकरण, रखडलेला शिवाजीनगर, भोईटेनगर, दूध संघाचा रेल्वे उड्डाणपूल, महापालिका व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्न, हुडको आणि जिल्हा बँकेचा कर्जाचा प्रश्न या विषयाला वेळ लागणार याची कल्पना आहे. पुन्हा गिरीश महाजन यांनी दिलेल्या कालमर्यादेत हे प्रश्न सुटणार असा संपूर्ण विश्वास जळगावकरांना आहे. (कालमर्यादा : जळगावचे प्रश्न न सुटल्यास विधानसभेत मत मागायला येणार नाही) पण अलीकडे वेगळाच बदल जळगावात दिसून येत आहे. हा ‘बदल’ मात्र जळगावकरांना अनपेक्षित आहे, पण हळूहळू त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. 1) भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर रंगलेली नववर्ष स्वागताची दारुपार्टी आणि त्यात बºहाणपूरच्या नर्तकींच्या नृत्यावर बेभाव होऊन नाचणारे प्रतिष्ठीत, श्रीमंत राजकारणी, उद्योजक, व्यावसायिक...आता आनंद साजरा करण्याची ही पध्दत जळगावात रुढ होतेय, त्यात काय वावगे. पण त्याचीही चर्चा रंगली. उगाच लोकप्रतिनिधी आणि पोलीस दलावर आरोप झाले. ते जाऊद्या. एक नवा बदल बघा. पूर्वी आंबटशौकीन बºहाणपूर आणि मुंबईला जात असत. अलिकडे बºहाणपूरकर जळगावात येऊन करिष्मा दाखवू लागले आहेत. 2) २०१८ या वर्षाच्या शेवटच्या दिवशी भाजपा नगरसेविकेचे पती संतोष पाटील यांच्यावर गोळीबार झाला. पाटील यांच्याकडे रिव्हॉल्वर होते आणि त्यांनी स्वरंरक्षणासाठी ते बाहेर काढल्याने बचावले. मुंबई, पुणे, नागपुरात राजकीय कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले ऐकले होते; आता हे जळगावातही असे हल्ले होऊ लागले. हा ‘बदल’ नाही काय? रिव्हॉल्वर असल्याने पाटील बचावले, सुदैव त्यांचे. सामान्य माणसानेदेखील आता स्वसंरक्षणासाठी ‘रिव्हॉल्वर’साठी अर्ज करावा. प्रत्येकाला ‘रिव्हॉल्वर‘ मिळेल, त्याचे संरक्षण होईल. पुन्हा रिव्हॉल्वर विक्रीचा व्यवसाय करुन एका बेरोजगाराला काम मिळेल आणि ‘मेक इन इंडिया’त आणखी एक उद्योग उभारला जाईल. 3) जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अनेक शासकीय कार्यालये आहेत. जिल्हाभरातून लोक रोज जळगावात येत असतात. बाजारपेठ मध्यवर्ती भागात केंद्रित आहे. त्यामुळे नागरीकरणाचा दुष्परिणाम अतिक्रमणांच्या निमित्ताने दिसून येतो. महापालिका प्रशासन आणि पोलीस दलाने संयुक्त मोहीम राबवित अतिक्रमण निर्मूलन सुरु करताच जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेला विरोध केला. विरोधाचे कारण म्हणजे त्यांच्या नातेवाईकाच्या शोरुमचे काढलेले अतिक्रमण हे उघड असताना त्यांनी मात्र साळसूदपणे व्यापारी मंडळींची बाजू घेत आयुक्तांवर निशाणा साधला. बदली करुन घेण्यासाठी आयुक्तांनी ही मोहीम राबवली आहे. हिंमत असेल तर सतरा मजलीचे अतिक्रमित मजले पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. आता राज्यात भाजपाचे सरकार आहे, नगरविकास विभाग भाजपाच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, आमदार भाजपाचे आहेत, त्यांनी आयुक्तांना आव्हान देण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांकडून मजले पाडण्याचे आदेश का आणू नये. पण...तसे होणार नाही. कारण जळगावात ‘बदल’ घडतोय. 4) जळगावात ‘बदल’ सर्वच क्षेत्रात होतोय. गतिमान आणि पारदर्शक कारभाराचे बिरुद मिरवणाºया प्रशासनामध्ये तर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे बदल्यांचे विषय जाहीरपणे मांडत आहे. विमानतळावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे झालेला ‘बदलीहट्ट’ आणि शिवाजी दिवेकर यांची झालेली बदली हा त्याचाच परिपाक आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांना जळगावच्या जिल्हाधिकारीपदात रस असल्याच्या बातम्या झळकल्या. तर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांचे नव्या जिल्हाधिकारी नियुक्तीच्या मागणीचे पत्र स्वत: व्हायरल केले. बघा जळगावकरांनो, किती बदल घडतोय. प्रशासन किती पारदर्शकपणे काम करते आहे. यालाच म्हणतात ‘सब का साथ, सबका विकास’.
टॅग्स :Jalgaonजळगाव