शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वाहनांच्या संख्येवर निर्बंध घालण्याची वेळ आली!

By रवी टाले | Updated: December 8, 2018 20:11 IST

वायू प्रदुषणासाठी इतरही घटक कारणीभूत असले तरी, वाहनांमुळे होणारे प्रदुषण त्यामध्ये मोठी भूमिका अदा करीत आहे आणि दिवसागणिक वाहनांच्या संख्येत भरच पडत असल्याने वायू प्रदुषणामधील वाहनांद्वारा होणाऱ्या प्रदुषणाचा टक्का वाढताच आहे.

ठळक मुद्देसरकारी आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१५ रोजी देशात २१ कोटी २३ हजार २८९ वाहने होती.सिंगापूरसारख्या शहराने गतवर्षी यापुढे कारच्या संख्येत भर न पडू देण्याचा निर्णय घेतला. वस्तुस्थिती लक्षात घेऊन दुचाकी वाहनांच्या संख्येवर निर्बंध लावण्याचाही विचार करणे गरजेचे आहे.

शुक्रवारी वर्तमानपत्रांमध्ये दोन बातम्या झळकल्या. त्यापैकी पहिली बातमी ही होती, की भारतातील दर आठपैकी एका मानवी मृत्यूसाठी वायू प्रदुषण कारणीभूत असते. दुसरी बातमी ही होती, की नागपूर शहरात एका वाहतूक पोलिसामागे ३,१०६ एवढी वाहनांची संख्या आहे आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. म्हटले तर दोन्ही बातम्या वेगवेगळ्या आहेत; पण खोलात जाऊन विचार केल्यास, वाहनांची वाढती संख्या हा दोन्ही बातम्यांमधील समान दुवा आहे!भारतीय वैद्यकीय परिषदेने गुरुवारी प्रसृत केलेल्या अहवालानुसार, भारतातील वायू प्रदुषणाची पातळी विद्यमान किमान पातळीपेक्षा कमी असती तर, सरासरी आयुर्मानात किमान १.७ वर्षांनी वाढ झाली असती. वायू प्रदुषणामुळे मानवी जीवनास निर्माण झालेला धोका धुम्रपानामुळे संभवणाऱ्या धोक्यापेक्षाही मोठा असल्याचा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. वायू प्रदुषणासाठी इतरही घटक कारणीभूत असले तरी, वाहनांमुळे होणारे प्रदुषण त्यामध्ये मोठी भूमिका अदा करीत आहे आणि दिवसागणिक वाहनांच्या संख्येत भरच पडत असल्याने वायू प्रदुषणामधील वाहनांद्वारा होणाºया प्रदुषणाचा टक्का वाढताच आहे.भारतात १९५१ मध्ये अवघी तीन लाख वाहने होती. त्यानंतरच्या पन्नास वर्षात त्यामध्ये तब्बल ५८० लाख वाहनांची भर पडली. पुढच्या १५ वर्षात वाहनांची संख्या जवळपास चौपटीने वाढली. सरकारी आकडेवारीनुसार ३१ मार्च २०१५ रोजी देशात २१ कोटी २३ हजार २८९ वाहने होती. वाहनांच्या संख्येत रोजच भर पडत आहे आणि त्यासोबतच वायू प्रदुषणही वाढत आहे. वाहनांची संख्या ज्या गतीने वाढत आहे, त्या गतीने रस्त्यांची लांबी आणि रुंदी न वाढल्याने रस्त्यांवर वाहनांची अतोनात गर्दी झाली आहे. कुर्मगतीने सुरू असलेली वाहतूक हे मोठ्याच नव्हे तर छोट्या शहरांमधीलही चित्र आहे. वाहने जेव्हा कमी वेगाने धावतात तेव्हा अधिक प्रदुषण निर्माण करतात. ही बाबही वायू प्रदुषणामध्ये भर घालत आहे.वायू प्रदुषणास आळा घालायचा झाल्यास वाहनांच्या संख्येस प्रतिबंध घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे; मात्र कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी ते शक्य दिसत नाही. वाहनांची अतोनात वाढलेली संख्या आणि त्यामुळे वाढत असलेले वायू प्रदुषण ही समस्या विकसित देशांमधील कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक प्रणाली असलेल्या शहरांनाही भेडसावत आहे, तिथे भारतीय शहरांचा काय पाड? सिंगापूरसारख्या शहराने गतवर्षी यापुढे कारच्या संख्येत भर न पडू देण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरमध्ये आधीपासून एक नियम आहे. त्यानुसार कुणालाही कार विकत घेताना सरकारकडून एक विशेष प्रमाणपत्र विकत घ्यावे लागते. त्याची किंमत ५० हजार सिंगापूर डॉलर्स एवढी प्रचंड आहे. त्याशिवाय सिंगापुरात कारवरील कर आणि आयात शुल्कही प्रचंड आहे. त्यामुळे आपसुकच कार बाळगण्याचे प्रमाण कमी झाले होते. गतवर्षीपासून तर जुनी कार भंगारात निघाल्याशिवाय नवी कार रस्त्यावर उतरूच द्यायची नाही, असा निर्णय तेथील सरकारने घेतला. ज्या देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत कार्यक्षम आहे, त्या देशात असे निर्णय घेतले जात असताना भारतात मात्र वाहनांची संख्या मर्यादित करण्याचा विचारही केला जात नाही.नाही म्हणायला गत काही वर्षांपासून भारतातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेच्या उभारणीने वेग घेतला आहे; मात्र केवळ मेट्रो रेल्वे आल्याने लोक खासगी गाड्यांचा वापर करणे बंद करतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. लोकांना ज्या ठिकाणी जायचे असते, त्या प्रत्येक ठिकाणी मेट्रो रेल्वे पोहचू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत मेट्रो स्थानकापासून अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्याची व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत ज्यांना स्वत:चे वाहन बाळगणे परवडते, ते स्वत:च्या वाहनाने फिरण्यालाच प्राधान्य देतील, हे स्पष्ट आहे. त्यामुळे मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासोबतच, मेट्रो स्थानकांपासून जवळच्या गंतव्य स्थळी पोहचण्यासाठी सायकली किंवा विजेरीवर चालणारी स्वयंचलित दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्याची प्रणालीही विकसित करावी लागेल. तसे झाले तरच लोक सार्वजनिक वाहतूक प्रणालीकडे वळतील.याशिवाय विजेरीवर चालणाºया ई-वाहनांच्या वापरास चालना देणेही अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर मार्ग निघणार नसला तरी, किमान वायू प्रदुषणास आळा बसण्यास निश्चितच मदत होईल. दुर्दैवाने आपल्या देशात त्यासंदर्भात केवळ तोंडाची वाफ दवडणेच सुरू आहे. प्रत्यक्षात काहीही होताना दिसत नाही. ई-वाहनांच्या वापरास चालना देण्याशिवाय किमान महानगरांमध्ये तरी जास्त इंजीन क्षमतेच्या डिझेल गाड्या वापरण्यावर बंदी आणणे गरजेचे झाले आहे. शिवाय वायू प्रदुषणासाठी केवळ मोठ्या वाहनांवरच दोषारोपण करून चालणार नाही, तर दुचाकी वाहने मोठ्या वाहनांपेक्षाही जास्त वायू प्रदुषण करतात ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन दुचाकी वाहनांच्या संख्येवर निर्बंध लावण्याचाही विचार करणे गरजेचे आहे.नागरिकांनाही वायू प्रदुषणास आळा घालण्यासंदर्भात आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. प्रत्येक समस्येसाठी सरकारकडे बोट दाखविणे नागरिकांनी बंद करायला हवे आणि त्यापैकी अनेक समस्या आपल्या चुकीच्या वागण्यामुळेच निर्माण होतात ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. वायू प्रदुषण ही त्याच श्रेणीत मोडणारी समस्या आहे. कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक प्रणाली उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले, ही वस्तुस्थिती आहेच; पण आपणही गरज नसताना किती वेळ वाहनांचा वापर करतो आणि वायू प्रदुषणात भर घालतो, याचे नागरिकांनीही आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.सरकार आणि नागरिक दोघांनीही वायू प्रदुषणाचे गंभीर परिणाम लक्षत घेण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे; अन्यथा आपल्यासोबतच आपल्या भावी पिढ्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.

 - रवी टाले                                                                                                  

   ravi.tale@lokmat.com 

टॅग्स :Akolaअकोला