शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आयटी पार्क : महानगरांत नव्हे, छोट्या शहरांत हलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:27 IST

आयटी पार्क सध्या महानगरांमध्येच विकसित झाले आहेत. हे उद्योग मध्यम व छोट्या शहरांत आल्यास तरुणाईसाठी एक नवे दालन खुले होईल.

प्रा. डॉ. संदीप ताटेवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती -

भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग सध्याच्या काळात भरघोस पगारासह नोकऱ्या उपलब्ध करून देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर ॲण्ड सर्व्हिस कंपनीच्या (नॅस्कॉम) अहवालानुसार भारतीय आयटी कंपन्यांचा व्यवसाय आर्थिक वर्ष २०२४ अखेरीस २५४ अब्ज डॉलरवर पोहोचणार आहे. आयटी उद्योगाने अक्षरशः कोट्यवधी भारतीयांना रोजगाराची थेट संधी उपलब्ध करून दिली आहे. 

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील पदवी प्राप्त करून तसेच संगणक क्षेत्रातील बीसीए, एमसीए, बीएस्सी (आयटी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) यासारखे अभ्यासक्रम पूर्ण करून माहिती व तंत्रज्ञान उद्योगात अनेक तरुण नोकरी करीत आहेत. या क्षेत्रात पदोन्नतीची संधी व पगारातील वृद्धीसुद्धा जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण पदवीधर या क्षेत्रात कार्यरत आहेत. टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, पटणी कॉम्प्युटर, इन्फोसिस, पर्सिस्टंट यासारख्या बऱ्याच कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग (आयटी पार्क) बंगळुरू, म्हैसूर, हैदराबाद, पुणे, मुंबई, गुरगाव यांसारख्या महानगरांत स्थापन झाले आहेत. 

या क्षेत्रातील पदवी प्राप्त झालेले तंत्रज्ञ नोकरीनिमित्त महानगरांत स्थायिक होतात. त्यामुळे गावाकडील व लहान शहरातील पालकवर्ग; ज्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या राहत्या शहरात गेले, त्यांना निवृत्तीनंतर मुलाकडे महानगरांत स्थानांतर करावे लागत आहे. हे नागरिक आपले राहते घर, मित्रमंडळी, शेजारी व वर्षानुवर्षांची आपली जीवनशैली सोडून महानगरांतील छोट्याशा फ्लॅटमध्ये काँक्रीटच्या जंगलात, गर्दीच्या ठिकाणी सध्या राहात आहेत. 

आयटी पार्कचा विस्तार केवळ महानगरांतच न करता मध्यम, लहान शहरांतही एमआयडीसीसारख्या ठिकाणी ते स्थापन झाले व तेथेच विस्तारित केले गेले तर तरुणांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या पालकांचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघू शकतो. 

आयटी उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या मुख्य पायाभूत सुविधा म्हणजे हाय स्पीड इंटरनेट, संगणक, इमारती, दळणवळण व्यवस्था, अखंड विद्युतपुरवठा आणि करामध्ये सवलती. यातल्या बऱ्याच गोष्टी सध्या मध्यम, छोट्या शहरांतसुद्धा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर विमानतळाची सोयसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे आयटी पार्क मध्यम, छोट्या शहरांतही उभारले गेले आणि त्यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न झाले तर जे तरुण आज मोठा खर्च करून नाइलाजास्तव महानगरांत राहात आहेत,  त्यांना आपल्या गावातच किंवा गावाजवळच्या शहरांत आई-वडिलांसोबत राहाता येईल. त्यांची काळजी घेता येईल आणि कमी खर्चात आपला उदरनिर्वाह करता येईल. 

म्हातारपणी मुले सोबत किंवा जवळपास राहिल्यास नातवंडांचे सुख आजी-आजोबांना व आजी-आजोबांचे प्रेम, संस्कार नातवंडांना लाभू शकेल. कुटुंबात दृढ नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकेल. 

महानगरांतील वाढत्या गर्दीवर व प्रदूषणावर यामुळे बऱ्यापैकी नियंत्रण प्राप्त करता येईल. मध्यम शहरांतील इतर उद्योगधंदे वाढीस लागतील. त्यामुळे तिथे रोजगारनिर्मिती होऊन महसूल व आर्थिक सुबत्ता वाढेल. त्याचा पाठपुरवठा राजकीय स्तरावर व सर्वसामान्य जनतेने करणे गरजेचे आहे. ही काळाची गरज आहे. यामुळे महानगरांत होणारे स्थानांतर मोठ्या प्रमाणात टाळता येईल. कोरोनाच्या काळात वर्क फ्राॅम होममुळे घरूनच कामे करणे शक्य झाले आहे. त्याचाही फायदा घेता येऊ शकेल. याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञान