शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

त्याचा अर्थ तोच की

By admin | Updated: January 12, 2016 02:59 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले. भारत आणि पाकिस्तानच्या परारष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चा येत्या शुक्रवारी होऊ घातली आहे. जर पठाणकोट हवाई तळावर घातपाती हल्ला झाला नसता आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे भारत सरकारच्या हाती लागले नसते तर काही प्रश्न नव्हता. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा झालीच असती. पण हा हल्ला झाला आणि सारी समीकरणे बदलून गेली. पण एक झाले, याआधी चर्चेपूर्वी असा काही हल्ला झाला की तत्काळ चर्चेचा कार्यक्रम भारताकरवी एकतर्फी रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले जात असे, यावेळी तसे झाले नाही. पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करण्याचे मान्य केले आणि अमेरिकेनेही पाकवर तसे दडपण आणले. भारताने केवळ इतकेच म्हटले की जे काही करायचे ते पंधरा तारखेपूर्वी करा. अजित डोवाल याना एका प्रसार माध्यमाने याच विषयावर छेडले असता ते म्हणाले की, ‘पाकिस्तानने कारवाई केली तरच आम्ही चर्चा करु’. त्यावर संबंधित माध्यमाने या विधानाचा श्लेष काढताना डोवाल यांनी चर्चा रद्द झाल्याचे जाहीर केले असे म्हटले. त्यावरतीच आचा डोवाल यांनी खुलासा करताना आधी तर आपण असे काही म्हटलेलेच नाही असे विधान केले आणि नंतर तर मुलाखतच दिल्याचे नाकारले. मुळात जे विधान केल्याचे डोवाल आजही नाकारीत नाहीत त्या विधानातच ‘जर तर’ची भाषा आहे. कारवाई केली तरच चर्चा करु असे म्हटले जाते तेव्हां कारवाई केली नाही तर चर्चा नाही असाच त्याचा सरळ अर्थ होतो. मुंबईवरील हल्ल्यासंबंधी सारे पुरावे दिले त्याला आठ वर्षे होत आली असताना अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नसताना केवळ आठवडाभरात पाकिस्तान काय कारवाई करणार आणि त्यातून भारताचे कसे समाधान होणार या वास्तवदर्शी तर्काच्या आधारे व खुद्द डोवाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रद्द केली जाणे हेच वास्तव उरते. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा एक सनदी किंवा गणवेशधारी नोकरशहा असतो. तो निर्णयकर्त्यांना सल्ला देतो किंवा देऊ शकतो पण स्वत: निर्णयकर्ता असत नाही. परिणामी माध्यमांपासून ‘समान दूरी’ हेच तत्त्व त्यांच्यासाठी योग्य ठरते. त्याला मुरड बसली व खुलासे करीत बसण्याची वेळ आली.