शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

त्याचा अर्थ तोच की

By admin | Updated: January 12, 2016 02:59 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले. भारत आणि पाकिस्तानच्या परारष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चा येत्या शुक्रवारी होऊ घातली आहे. जर पठाणकोट हवाई तळावर घातपाती हल्ला झाला नसता आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे भारत सरकारच्या हाती लागले नसते तर काही प्रश्न नव्हता. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा झालीच असती. पण हा हल्ला झाला आणि सारी समीकरणे बदलून गेली. पण एक झाले, याआधी चर्चेपूर्वी असा काही हल्ला झाला की तत्काळ चर्चेचा कार्यक्रम भारताकरवी एकतर्फी रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले जात असे, यावेळी तसे झाले नाही. पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करण्याचे मान्य केले आणि अमेरिकेनेही पाकवर तसे दडपण आणले. भारताने केवळ इतकेच म्हटले की जे काही करायचे ते पंधरा तारखेपूर्वी करा. अजित डोवाल याना एका प्रसार माध्यमाने याच विषयावर छेडले असता ते म्हणाले की, ‘पाकिस्तानने कारवाई केली तरच आम्ही चर्चा करु’. त्यावर संबंधित माध्यमाने या विधानाचा श्लेष काढताना डोवाल यांनी चर्चा रद्द झाल्याचे जाहीर केले असे म्हटले. त्यावरतीच आचा डोवाल यांनी खुलासा करताना आधी तर आपण असे काही म्हटलेलेच नाही असे विधान केले आणि नंतर तर मुलाखतच दिल्याचे नाकारले. मुळात जे विधान केल्याचे डोवाल आजही नाकारीत नाहीत त्या विधानातच ‘जर तर’ची भाषा आहे. कारवाई केली तरच चर्चा करु असे म्हटले जाते तेव्हां कारवाई केली नाही तर चर्चा नाही असाच त्याचा सरळ अर्थ होतो. मुंबईवरील हल्ल्यासंबंधी सारे पुरावे दिले त्याला आठ वर्षे होत आली असताना अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नसताना केवळ आठवडाभरात पाकिस्तान काय कारवाई करणार आणि त्यातून भारताचे कसे समाधान होणार या वास्तवदर्शी तर्काच्या आधारे व खुद्द डोवाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रद्द केली जाणे हेच वास्तव उरते. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा एक सनदी किंवा गणवेशधारी नोकरशहा असतो. तो निर्णयकर्त्यांना सल्ला देतो किंवा देऊ शकतो पण स्वत: निर्णयकर्ता असत नाही. परिणामी माध्यमांपासून ‘समान दूरी’ हेच तत्त्व त्यांच्यासाठी योग्य ठरते. त्याला मुरड बसली व खुलासे करीत बसण्याची वेळ आली.