शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

अध्यादेश काढून खाणी सुरू करणे इतके सोपे आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 22:27 IST

केंद्र सरकारवर गोव्यातील लोह खनिज खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी दबाव वाढत असला तरी तसा राजकीय निर्णय घेणे मोदी सरकारला परवडेल काय, हा खरा प्रश्न आहे.

- राजू नायक

केंद्र सरकारवर गोव्यातील लोह खनिज खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी दबाव वाढत असला तरी तसा राजकीय निर्णय घेणे मोदी सरकारला परवडेल काय, हा खरा प्रश्न आहे. खाणी सुरू करण्यासाठी केंद्राला अध्यादेश जारी करावा लागेल, जे या सरकारच्या राजकीय भूमिकेच्या विपरीत आहे.

गेल्या 15 मार्चपासून गोव्यातील लोह खनिजाच्या 88 खाणी बंद आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न भीषण झाला असा दावा करून राज्य सरकार केंद्रावर सतत दबाव टाकत आहे. गेले दोन दिवस गोव्यातील भाजपा नेत्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा, खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांचे दिल्लीत उंबरठे झिजविले. परंतु त्यांना तेथे स्पष्ट जबाब कसलाच मिळालेला नाही.

वास्तविक गोव्यात खाणी सुरू करण्यासाठी नवीन कायद्यानुसार फारशी अडचण नाहीच. कर्नाटक, ओडिशा व इतर राज्यांनी नव्या व्यवस्थेनुसार खाणकाम सुरू केले आहे. गोव्यात अडचण विचित्र आहे. गोव्यातील राजकीय नेत्यांना त्याच चुकार व भ्रष्ट खाण कंपन्यांना खाणींच्या लिजेस बहाल करायच्या आहेत. परंतु नवीन कायद्यानुसार खाणींच्या लिजेसचा लिलाव करावा लागतो. लिलाव केल्यास राज्याबाहेरचे मोठे उद्योजक येतील व त्यांच्याशी स्पर्धा करणो येथील खाण कंपन्यांना शक्य नाही.

वाचकांना माहीत असेल, गोवा सरकारने त्याच खाणचालकांना उपकृत करण्यासाठी एमएमडीआर सुधारणांना बगल देत 88 खाण लिजेस त्याच खाणचालकांना बहाल केल्या होत्या; ज्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने बडगा हाणत त्या रद्दबातल ठरविल्या. हा खाण कायदा नोव्हेंबर 2015मध्ये अस्तित्वात येण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाच खाण लिजेसचे नूतनीकरण केले होते तर उर्वरित 83 लिजेसचे संपूर्णत: बेकायदेशीर नूतनीकरण त्यानंतर मुख्यमंत्रिपदी राहिलेले लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले होते. सर्वोच्च न्यायालयाने पार्सेकर सरकारचा निर्णय बेकायदेशीर ठरविलाच, शिवाय पर्रीकरांचाही पाच खाण लिजेस नूतनीकरणाचा निर्णय रद्द करताना ही कायदा दुरुस्ती अमलात येणार आहे हे माहीत असतानाही त्यांनी हा घाईघाईत आततायी निर्णय घेतला, त्यामुळे त्या पाच लिजेसची मुदतवाढ ग्राह्य मानता येणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय दिला. मोदी सरकारने फेब्रुवारी २०१५मध्ये आपल्या अर्थसंकल्पात हा नवीन कायदा येणार असल्याचे जाहीर करतानाच राज्यसभेत तसे विधेयक दाखल केले होते; परंतु पर्रीकरांनी ते खिजगणतीत न घेता राज्यातील खाण कंपन्यांचे उखळ पांढरे करणारा निर्णय घेतला, ज्यावर राज्यात त्यांच्यावर कठोर टीकाही करण्यात आली होती. पर्रीकर सुरुवातीला शहा आयोगाने ताशेरे ओढलेल्या खाण कंपन्यांच्या विरोधात भूमिका घेत; परंतु त्यानंतर त्यांनी खाण कंपन्यांच्या दबावाखाली कोलांटउडी मारत याच कंपन्यांना लिजेस मिळाव्यात यासाठी लॉबिंग सुरू केले व आता तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तडकाफडकी अध्यादेश जारी करावा यासाठी स्थानिक भाजपा सतत केंद्राच्या चकरा मारीत आहे.

नवीन कायद्यानुसार सार्वजनिक मालमत्ता- ज्याच्यात कोणत्याही प्रकारच्या खनिजाचा समावेश होतो- फुकटात दिली जाऊ शकत नाही. भूगर्भात दडलेल्या नैसर्गिक मालमत्तेची संपूर्ण किंमत वसूल करण्याचे बंधन आहे. हा कायदा अस्तित्वात येऊन स्थानिक खाण कंपन्या व्यवसायातून बाहेर फेकल्या जाण्याची भीती लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांच्याकडून १०२३ कोटी रुपये स्टॅम्प डय़ुटीपोटी वसूल केले होते- जेणेकरून या खाणी त्यांनाच देता येतील, हा समज त्यांनी बाळगला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरकारचा दावा साफ फेटाळून खाणींची संपूर्ण किंमत वसूल करण्याचा आदेश दिला, त्यामुळे खाण कंपन्यांच्या तुंबडय़ा भरण्याचा एक डाव फसला. राज्यातील 88 खाणींची एकूण किंमत एक लाख 22 हजार कोटी रुपये असून आता ती वसूल करणे सरकारला भाग आहे. परंतु ज्या खाण कंपन्या पारंपरिकदृष्टय़ा राजकीय पक्षांना देणग्या देत आहेत, त्यांना रुष्ट करणे नेत्यांना शक्य नाही. या खाण कंपन्यांनी सरकार पाडण्याचेही धारिष्टय़ यापूर्वी दाखवले आहे. शिवाय खाण पट्टय़ातील अनेक आमदार खाण कंपन्यांच्या आश्रयाखालीच जगत असल्याने त्यांच्याशी वितुष्ट घेणो राजकीय पक्षांना शक्य होत नाही. त्यामुळे गेले दोन महिने विविध पक्षांचे नेते दिल्लीत सतत फेरे टाकू लागले असून केंद्र सरकार अध्यादेश काढेल असा आभास ते निर्माण करू पाहातात.

परंतु मोदी सरकार अध्यादेश काढण्याच्या मन:स्थितीत नाही. कारण असा घटनाबाह्य अध्यादेश जारी केल्यास पर्यावरणवादी संघटना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे पुन्हा ठोठावतील. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्याचे कान पिळलेले आहेत. त्यामुळे दिल्लीचे दौरे हे केवळ खाण कंपन्या व त्यांनी पोसलेले कामगार यांच्या डोळ्यांना पाणी लावण्याचेच काम करीत आहेत.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :goaगोवा