शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

दिसते तसे नसते; लोकशाहीचेही असेच असते ?

By सुधीर महाजन | Updated: April 27, 2019 13:31 IST

पंतप्रधान पाच वर्षाच्या कार्यकाळात पत्रकारांना सामोरे गेले नाहीत ही घटना देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्यांची अवस्था दर्शविणारी नाही का ?

-सुधीर महाजन

घटना तशी जुनी नाही, एक प्रामाणिक कैफीयत म्हणा. तर या पत्रकाराने दहावीच्या परीक्षेचा पेपर मोबाईलवर फुटल्याची बातमी दिली. ती देतांना त्या प्रश्नपत्रिकेचा मोबाईलवरील स्क्रीनशॉट प्रसिद्ध केला. पेपर फुटीसाठी तंत्रज्ञानाचा वेगवान वापर कसा होतो हे सुद्धा त्याला दाखवून द्यायचे होते. बातमी एक्सक्ल्यूझीव्ह होती. ती तशी प्रसिद्ध झाली आणि एक समाधान त्या पत्रकाराच्या चेहऱ्यावर पसरले. व्यवसाय बंधुंनी अभिनंदनाचे संदेश पाठवले. त्याच्यासाठी विषय येथेच संपायचा होता आणि उत्सुकता होती ती ही की, प्रशासन कशी कारवाई करते. पेपरफुटीचा गोरखधंदा करणाऱ्यापर्यंत या कानुनचे लंबे हात पोहोचतात का? झाले उलटेच कानुन के लंबे हात या पत्रकारापर्यंत पोहोचले. तुम्ही स्क्रीन शॉट प्रसिद्ध करुन पेपर फोडला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. हे काय लचांड मागे लागले असे म्हणत हा पत्रकार ‘कायदा गाढव’ असतो या उक्तीचा अनुभव गोळा करत पोलीसांच्या जाब जबाबाच्या जंजाळात अडकत गेला.

ही घटना आठवली ती पत्रकारांसाठी देशांमध्ये कसे वातावरण आहे. हे दर्शवणारी एक आकडेवारी जाहीर झाली. १८० देशांची ही क्रमवारी असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांचा उदूघोष करणारा आपला देश यात १४० व्या स्थानावर आहे आणि आपण आपला शेजारी पाकिस्तान याच्या मांडीला मांडी घालून बसलो आहोत. कारण पाकिस्तानचे स्थान १४२ वे आहे. याचाच अर्थ वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत आपण आणि पाकिस्तान यांच्यात फारसे अंतर नाही. क्रमवारीला प्रतिमा आणि वास्तव असे म्हणावे का? असा प्रश्न मनात येतो. म्हणजे ज्या पाकिस्तानात लोकशाही अजून रुजली नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहे आणि निर्भय पत्रकारितेचे वातावरण अजिबात नाही अशीच प्रतिमा पाकीस्तानची जगभर आहे. भारताच्या प्रतिमे विषयी बोलायचे झाले तर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश लोकशाहीचा पुरस्कर्ता. वृत्तपत्रस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारा देश अशी प्रतिमा आपली असतांना आपले स्थान तर उंचावर पाहिजे होते किमान पहिल्या पन्नासात आपण असायला पाहिजे; पण तसे नाही हे वास्तव आहे. 

आता वास्तवाचा विचार करायला हरकत नाही. लोकशाहीच्या हस्तीदंती मनोऱ्यातून खाली उतरून वास्तवाचा अनुभव घेतला पाहिजे. या क्रमवारीत यापूर्वी भारत १०५ व्या क्रमांकाच्या खाली कधीच उतरला नव्हता; परंतु गेल्या तीन वर्षात त्यांची प्रचंड घसरण झाली. प्रसारमाध्यमे आणि पत्रकार यांना त्रास देणे, कोंडी करणे, दहशत निर्माण करणे, आपल्या विरोधातील बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांना धमकावणे, वर्तमानपत्रांची आर्थिक कोंडी करणे, त्यांचे अंक लोकापर्यंत जाणार नाहीत, अशी व्यवस्था करणे एकूणच वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करणारे वातावरण भारतात आहे. वास्तवाचा विचार केला तर देशाच्या प्रमुखावर आरोप करतांना पत्रकारांना भिती वाटत नाही; परंतु गावंच्या सरपंचाविरुद्ध, तालुक्याच्या आमदाराविरुद्ध बातमी प्रसिद्ध करायला खरे धाडस लागते. आज अशी गळचेपी अनेक ठिकाणी चालू आहे. या देशाचे पंतप्रधान पाच वर्षाच्या कार्यकाळात पत्रकारांना सामोरे गेले नाहीत ही घटना देशातील वृत्तपत्र स्वातंत्र्यांची अवस्था दर्शविणारी नाही का?

टॅग्स :democracyलोकशाहीprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारJournalistपत्रकार