शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

मुद्दा ‘लास्ट नेम’चा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:10 IST

तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे

प्रिय नीरव मोदी,स.न.वि.वि.तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे, असे तू मुळीच समजू नको. अशी परतफेड करण्याची तर आम्हा लोकांना हर्षद मेहतापासूनच सवयच लागली आहे. मला वाटते हर्षदचे लोन क्लियर झाले असावे. मल्ल्याचेही बरेच फेडून झाले. आता तुझ्या कर्जाचा ईएमआय सुरू होईल. घाबरु नको तेही आम्ही हळूहळू फेडूनच टाकू. आम्हा भारतीयांचे (सॉरी, तुला आता आम्ही भारतीय म्हणू शकत नाही, कारण तुला ठाऊकच आहे.) एक बरे आहे. आमची लोकसंख्या मोठी असल्यामुळे तुझ्या कर्जाचा ईएमआय फारसा येणार नाही. आणखी एक सांगतो, तुझ्या या बेकायदेशीर कर्जाची फेड आम्ही अगदी कायदेशीर मार्गाने करणार आहोत. त्यासाठी जीएसटी, आयकर, स्वच्छता कर सारख्या योजना आमच्याकडे आहेतच. त्यातूनही भागत नसेल तर तुझी करबुडवेगिरी राष्टÑीय आपत्ती मानून ‘आपत्ती कर’ही सरकार लावू शकते.तेव्हा आमच्या वाईट वाटण्याचे खरं कारण काय, हे तू जाणून घे! ते कारण आहे तुझे ‘लास्ट नेम’. हे लास्ट नेम आज आमच्या देशाचे नाक आहे. त्या नाकावर टिच्चून तू हा घोटाळा केला आहेस. तू म्हणशील यापूर्वी ललित मोदीने तर दिवे लावले आहेत. तेव्हा नाही आठवले लास्ट नेम...! तर माझ्या मित्रा एक लक्षात घे. हा ललित नावाचा प्राणी जेव्हा घोटाळा करून विदेशात पळून गेला तेव्हा नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान नव्हते.आपल्या अडनावाच्या माणसाने असा घोळ करून पलायन करावे याचा घोर पीएम साहेबांना लागला आहे. ते इतके व्यथित आहेत की, ‘मन की बात’मध्येही ते मनातलं सांगू शकत नाहीत.तेव्हा तू त्यांची व्यथा लक्षात घेऊन काय ते ठरव. तसंही त्यांनी ‘बॅकचॅनेल’ की काय म्हणतात, त्या माध्यमातून तुला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत म्हणे. शेवटी २०१९ च्या निवडणुकीचा सवाल आहे.बरं ते जाऊ दे. काही काळासाठी का होईना तू इकडे निघून ये. आम्हालाही तुझ्याकडून काही टीप्स घ्यायच्या आहेत. विशेषकरून बँकवाल्यांना कसे हॅण्डल करायचे हे समजून घ्यायचे आहे. त्या लेटर आॅफ अंडरस्टँडिगमध्ये कसे ‘अंडरस्टँडिग’ करायचे हेही जाणून घ्यायचे आहे. आम्ही साधं पाचपन्नास हजाराच्या कर्जासाठी बँकेत गेलो तरी एखादा भिकारी दारात आल्यासारखी त्यांची वागणूक असते. आज साहेब नाही, उद्या या. लंचटाईम आहे, दिसत नाही का? अशी उत्तरं आम्हा पामरांना मिळतात. त्याचजागी तुमच्यासारखी मंडळी येते तेव्हा लाल पायघड्या अंथरल्या जातात. लंच टाईम तर सोडाच डिनरलाही ते तुमच्यासोबत असतात. कोट्यवधीचे लेटर आॅफ अंडरस्टँडिग देण्यासाठी त्यांना साहेबाचीही गरज भासत नाही. हे पाहून कधीकधी वाटते ह्या बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या नसून तुमची खासगी मालमत्ता आहे. म्हणजे बँका तुमच्याच, कर्ज घेणारे तुम्हीच आणि ते बुडविणारेही तुम्हीच. शेवटचा कर्ज फेडण्याचा रोल आहे तो मात्र सार्वजनिक क्षेत्राला अर्थात आम्हाला दिला.वाह! बहुत खूब !!-दिलीप तिखिले

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा