शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मुद्दा ‘लास्ट नेम’चा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:10 IST

तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे

प्रिय नीरव मोदी,स.न.वि.वि.तू मायदेश सोडून अचानक असा निघून गेलास म्हणून आम्हास थोडे वाईट वाटले. तू बँकांचे पैसे बुडवून गेला आणि आता ते पैसे आम्हाला भरावे लागणार हे त्यामागचे कारण आहे, असे तू मुळीच समजू नको. अशी परतफेड करण्याची तर आम्हा लोकांना हर्षद मेहतापासूनच सवयच लागली आहे. मला वाटते हर्षदचे लोन क्लियर झाले असावे. मल्ल्याचेही बरेच फेडून झाले. आता तुझ्या कर्जाचा ईएमआय सुरू होईल. घाबरु नको तेही आम्ही हळूहळू फेडूनच टाकू. आम्हा भारतीयांचे (सॉरी, तुला आता आम्ही भारतीय म्हणू शकत नाही, कारण तुला ठाऊकच आहे.) एक बरे आहे. आमची लोकसंख्या मोठी असल्यामुळे तुझ्या कर्जाचा ईएमआय फारसा येणार नाही. आणखी एक सांगतो, तुझ्या या बेकायदेशीर कर्जाची फेड आम्ही अगदी कायदेशीर मार्गाने करणार आहोत. त्यासाठी जीएसटी, आयकर, स्वच्छता कर सारख्या योजना आमच्याकडे आहेतच. त्यातूनही भागत नसेल तर तुझी करबुडवेगिरी राष्टÑीय आपत्ती मानून ‘आपत्ती कर’ही सरकार लावू शकते.तेव्हा आमच्या वाईट वाटण्याचे खरं कारण काय, हे तू जाणून घे! ते कारण आहे तुझे ‘लास्ट नेम’. हे लास्ट नेम आज आमच्या देशाचे नाक आहे. त्या नाकावर टिच्चून तू हा घोटाळा केला आहेस. तू म्हणशील यापूर्वी ललित मोदीने तर दिवे लावले आहेत. तेव्हा नाही आठवले लास्ट नेम...! तर माझ्या मित्रा एक लक्षात घे. हा ललित नावाचा प्राणी जेव्हा घोटाळा करून विदेशात पळून गेला तेव्हा नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान नव्हते.आपल्या अडनावाच्या माणसाने असा घोळ करून पलायन करावे याचा घोर पीएम साहेबांना लागला आहे. ते इतके व्यथित आहेत की, ‘मन की बात’मध्येही ते मनातलं सांगू शकत नाहीत.तेव्हा तू त्यांची व्यथा लक्षात घेऊन काय ते ठरव. तसंही त्यांनी ‘बॅकचॅनेल’ की काय म्हणतात, त्या माध्यमातून तुला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत म्हणे. शेवटी २०१९ च्या निवडणुकीचा सवाल आहे.बरं ते जाऊ दे. काही काळासाठी का होईना तू इकडे निघून ये. आम्हालाही तुझ्याकडून काही टीप्स घ्यायच्या आहेत. विशेषकरून बँकवाल्यांना कसे हॅण्डल करायचे हे समजून घ्यायचे आहे. त्या लेटर आॅफ अंडरस्टँडिगमध्ये कसे ‘अंडरस्टँडिग’ करायचे हेही जाणून घ्यायचे आहे. आम्ही साधं पाचपन्नास हजाराच्या कर्जासाठी बँकेत गेलो तरी एखादा भिकारी दारात आल्यासारखी त्यांची वागणूक असते. आज साहेब नाही, उद्या या. लंचटाईम आहे, दिसत नाही का? अशी उत्तरं आम्हा पामरांना मिळतात. त्याचजागी तुमच्यासारखी मंडळी येते तेव्हा लाल पायघड्या अंथरल्या जातात. लंच टाईम तर सोडाच डिनरलाही ते तुमच्यासोबत असतात. कोट्यवधीचे लेटर आॅफ अंडरस्टँडिग देण्यासाठी त्यांना साहेबाचीही गरज भासत नाही. हे पाहून कधीकधी वाटते ह्या बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या नसून तुमची खासगी मालमत्ता आहे. म्हणजे बँका तुमच्याच, कर्ज घेणारे तुम्हीच आणि ते बुडविणारेही तुम्हीच. शेवटचा कर्ज फेडण्याचा रोल आहे तो मात्र सार्वजनिक क्षेत्राला अर्थात आम्हाला दिला.वाह! बहुत खूब !!-दिलीप तिखिले

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा