शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

किलोभर बटाटे १,९६५ रुपये! गाझा बेहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:33 IST

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.

बिस्किट म्हटलं की आजही लहान-मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळी चहा-कॉफीबरोबर अनेकांना बिस्किटंच हवी असतात. त्याशिवाय त्यांची सकाळ पूर्ण होत नाही. त्यातही भारतात तर ‘पार्ले-जी’ बिस्किटांचा फारच बोलबाला आहे. इतक्या वर्षांत ना त्यांचा स्वाद बदलला, ना किमतीत फारसा बदल झाला! लहान मुलांपासून ते कष्टकऱ्यांपर्यंत आजही चवीसाठी आणि भुकेसाठी अनेकांची या बिस्किटांना पसंती असते. या बिस्किटांच्या एका पुड्याची किंमतही आहे फक्त पाच रुपये! 

पाच रुपयांचा बिस्किटाचा हा पुडा गाझा पट्टीत किती रुपयांना मिळावा? इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझा पट्टीतील हजारो, लाखो लोक भुकेनं अक्षरश: तडफडताहेत. जीवनावश्यक गोष्टी एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पोहोचल्या तर गरजूंना त्या मिळत नाहीत. मधल्या मध्ये हडप होतात आणि त्याच वस्तू नंतर प्रचंड महाग किमतीत विकल्या जातात.

गाझातील एका पालकानं सोशल मीडियावर नुकतीच टाकलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होते आहे. त्यात म्हटलं आहे, महत्प्रयासांनी का होईना, माझ्या लाडक्या मुलीला; रऊफला अखेर पार्ले-जी बिस्किटांचा पुडा मिळाला! ती आणि मी, आम्ही दोघंही त्यामुळे प्रचंड खूश आहोत! फक्त या पुड्यांचा बॉक्स आम्हाला दीड युरोऐवजी २४ युरोला विकत घ्यावा लागला! म्हणजे त्यासाठी या पालकाला किती रुपये मोजावे लागले? जो बिस्किटचा पुडा आपल्याकडे पाच रुपयांना मिळतो, त्यासाठी त्याला चक्क जवळपास २४०० रुपये मोजावे लागले!

एका बिस्किटाच्या पुड्यासाठी गाझामध्ये तब्बल पाचशे पट जास्त रक्कम मोजावी लागल्याच्या या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच गाझातील लोकांच्या हलाखीची परिस्थितीही त्यामुळे अधिकच अधोरेखित झाली आहे. युद्धामुळे गाझा पट्टीतील लोक अक्षरश: दाण्या-दाण्याला मौताद झाले आहेत. रोजच्या रोज तिथे भूकबळी जाताहेत. विविध देशांतून तिथे मानवीय मदतही पाठवली जातेय; पण ती लोकांपर्यंत पोहोचते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. २०२३पासूनच गाझा पट्टीत महागाई आकाशाला पाेहोचली आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे ज्याच्याकडे जी वस्तू असेल, ती तो मनमानी किमतीला विकतो आहे. आत्ताही २ मार्च ते १९ मे पर्यंत पॅलेस्टिनी लोकांना संपूर्ण नाकाबंदीचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय मदत तर येत होती; पण, ती गाझा पट्टीतील लोकांपर्यंत पोहोचतच नव्हती. आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्यातले काही ट्रक गाझात सोडण्यात आले. त्यांचीही मोठ्या प्रमाणात लुटालूट झाली.

गाझामध्ये राहणारे सर्जन डॉ. खालिद अलशवा यांचं म्हणणं आहे, हा प्रश्न जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीचा किंवा त्यांच्यावरील टॅक्सचा नाही. कारण या वस्तू तर मुख्यत: येथे फुकटच येतात; पण, लगेच त्यांची लूटमार होते. गरजवंतांची संख्या लाखोंच्या घरात आणि वस्तू येतात हजारांच्या घरात, अशावेळी ‘बळी तोच कानपिळी’! ज्याच्या हातात या वस्तू पडतात, तो काळ्या बाजारात त्या विकतो!

काय असाव्यात या किमती?.. एक किलो साखर ४,९१४ रुपये, एक किलो गोडेतेल ४,१७७ रुपये, एक किलो बटाटे १,९६५ रुपये, एक किलो कांदे ४,४२३ रुपये आणि एक कप कॉफी १,८०० रुपये! 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय