शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या आयुष्यातून सिनेमा 'हरवला' आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 08:57 IST

गेल्या काही वर्षांत सिनेमाचा प्रभाव झपाट्यानं कमी होत आहे. सिनेमा हा पूर्वी लोकांच्या जगण्याचाच एक भाग होता. तो प्रभाव कुठे, का, कसा गायब झाला?

- अमोल उदगीरकर

'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा महात्मा गांधी जागतिकीकरणानंतरच्या भारतात आणि नवीन राजकीय रेट्यांमध्ये बहुतांश भारतीयांच्या विस्मृतीमध्ये गेले होते. राजू हिराणी या दिग्दर्शकाने गांधीजींचं जे तत्त्वज्ञान खुमासदार विनोदाच्या चॉकलेट रॅपरमध्ये गुंडाळून प्रेक्षकांसमोर पेश केलं ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. गांधीजी अनेकांच्या मनात पुन्हा प्रस्थापित झाले. याच सिनेमात वापरलेली 'गांधीगिरी' ही टर्मिनॉलॉजी आजही वापरली जाते. समोरच्याला विद्वेषाने किंवा शक्तीच्या बळावर जिंकून घेण्यापेक्षा त्याला प्रेमाने जिंका असा याचा अर्थ.

'दिल चाहता है' सिनेमा आल्यानंतर मुलांच्या आणि मुलींच्या ग्रुप्सच्या गोवा ट्रिप्स वाढीला लागल्या होत्या. आजपण कुठंही ऑनर किलिंग झालं की 'अजून एक सैराट' अशा अर्थाचे मथळे माध्यमांत बघायला मिळतात. सिनेमाचा भारतीय जनमानसावर त्यांच्या वर्तणुकीवर मोठा प्रभाव होता. यालाच सिनेमाचा पॉप कल्चरवरचा प्रभाव असं म्हणता येईल. पण सिनेमाचा जनमानसावरचा आणि पॉप कल्चरवरचा हा प्रभाव गेल्या काही वर्षात कमी कमी होत चाललाय का? प्रेक्षक सिनेमे बघायला थियेटरमध्ये येत नाहीत किंवा प्रेक्षकांना नवीन सिनेमांबद्दल आणि स्टार्सबद्दल फारसं आकर्षण वाटत नाही, या तत्कालीन धोक्यांपेक्षा बॉलिवूड आणि मराठी सिनेमांचे पॉप कल्चर रेफरन्स रोजच्या आयुष्यात येणं बंद झालंय हा लाँग टर्म धोका सध्या तरी खूप जास्त मोठा वाटतोय. कदाचित याच्या परिणामांची जाणीव पुढच्या काही वर्षात होईल.

अगदी २०१२ पर्यंत सिनेमांचे संदर्भ आपल्या रोजच्या बोलण्यात असायचे. सिनेमा आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर, रितीरिवाजांवर फॅशनवर, आपल्या विनोदांवर भरपूर प्रभाव टाकून होता. 'हम आपके है कौन' सिनेमा आल्यानंतर आपल्याकडची लग्नं नेहमीसाठी बदलली. आपल्या लग्नात 'संगीत'सारख्या प्रथा आल्या. लग्नातल्या मराठमोळ्या पदार्थांची जागा पंजाबी आणि लग्नात वाजणारी गाणीपण बदलली. चायनीज पदार्थांनी घेतली, इतकंच काय आपल्या राजकीय नेत्यांच्या भाषणात सिनेमातले संवाद असायचे. मनसेची स्थापना झाल्यावर राज ठाकरेंची जी सभा सगळ्यात गाजली होती त्यात अजित पवार यांना उद्देशून त्यांनी 'सत्या' मधला 'मौका सभी को मिलता है' या डॉयलॉगचा समर्पक वापर करून टाळ्या- शिट्ट्या वसूल केल्या होत्या. देशासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पण रुक्ष आणि रटाळ अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या ओळी किंवा शेरोशायरी वापरून कोरडेपणा भरलेल्या वातावरणात प्रसन्नतेचा शिडकाव करायचे.

पॉप कल्चरमध्ये ध्रुवासारखं अढळ स्थान पटकावून बसलेली काही उदाहरणं म्हणजे म्हणजे 'दिवार' सिनेमातला 'मेरे पास माँ है' सारखा डॉयलॉग, 'शोले'मधले एक से बढ़के एक डॉयलॉग, 'हम', 'दबंग' आणि 'सिंघम'सारख्या सिनेमांनी पोलिसांच्या प्रतिमेत घडवलेला बदल, 'जब वुई मेट'मधल्या करीनाच्या पात्राने मुलींच्या फॅशन सेन्सवर टाकलेला प्रभाव. ही यादी अजून खूप वाढवता येईल, पण गेल्या काही वर्षात सिनेमाचा प्रभाव तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये. 'रांझना', 'तमाशा', 'सैराट', 'कबीर सिंग'सारखे मोजके अपवाद वगळता सिनेमाचे संदर्भ लोकांच्या वागण्या-बोलण्यात येत नाहीयेत. सिनेमाचा पडद्यापलीकडे जाऊन जो एक प्रभाव असतो तो जवळपास अनुपस्थित होत चाललाय. पहिला पाऊस पडला की लोकांना अजूनही नव्वदच्या दशकातली गाणी आठवतात. सध्याच्या गाण्यांना आणि सिनेमाला हे जमत नाही. आजही 'फादर्स डे' आला की नवीन पिढीला पण 'घातक'मधला सनी देओल, अमरीश पुरीचा ट्रॅक आठवतो. मराठीत दादा कोंडकेंचे सिनेमे, अशी ही बनवाबनवी' आणि 'सैराट'चा असा प्रभाव लोकांवर होता. सध्याच्या सिनेमाचा बहुतांश जनतेशी असणारा संपर्क तुटत चालला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अभिनेत्यांमधून स्टार्स आणि सुपरस्टार्स बनण्याची प्रक्रिया जवळपास बंद पडली आहे.

व्यक्तिकेंद्रित देशात नेहमी स्टार्स हेच पॉप कल्चरचे वाहक असतात; पण सोशल मीडियाने स्टार्सच्या भोवती जे एक गूढ आणि आकर्षक वलय होतं, ते संपवलंय. सिनेमा चित्रपटगृहात बघणं हे प्रचंड महागही झालं आहे. सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे सिनेमा चालला आहे. सध्याच्या राजकीय ध्रुवीकरणाचा आणि राजकारण्यांमुळे घराघरात झालेल्या दुफळीचा परिणाम सिनेमावर होत आहे. सिनेमा लोकांना बिघडवतो अशी समजूत असणारा एक संस्कारी वर्ग होताच, त्यात सिनेमात काम करणारे लोक देशद्रोही आहेत या नवीन नरेटिव्हची भर पडली आहे. चित्रपट क्षेत्राला सतत काही अंतराने वेगवेगळी आव्हाने मिळत गेली. महायुद्ध असो, नैसर्गिक आपत्ती असो, आर्थिक मंदी असो, टेलिव्हिजनचं आगमन असो, इंटरनेटवरून होणारी पायरसी असो, कोरोनाची लाट असो वा आताच ओटीटीने दिलेलं जोरदार आव्हान असो, सिनेमा प्रत्येक वेळी तावून सुलाखून बाहेर पडला आहे. सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात सिनेमाबद्दल असलेलं प्रचंड आकर्षण. हे आकर्षणच कमी होतं चाललं आहे का? याचं उत्तर नकारात्मक असावं आणि सिनेमाचं पॉप कल्चरमध्ये पुनरागमन व्हावं, अशीच चित्रपटरसिकांची इच्छा असावी.

टॅग्स :cinemaसिनेमा