शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

आपल्या आयुष्यातून सिनेमा 'हरवला' आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2023 08:57 IST

गेल्या काही वर्षांत सिनेमाचा प्रभाव झपाट्यानं कमी होत आहे. सिनेमा हा पूर्वी लोकांच्या जगण्याचाच एक भाग होता. तो प्रभाव कुठे, का, कसा गायब झाला?

- अमोल उदगीरकर

'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा महात्मा गांधी जागतिकीकरणानंतरच्या भारतात आणि नवीन राजकीय रेट्यांमध्ये बहुतांश भारतीयांच्या विस्मृतीमध्ये गेले होते. राजू हिराणी या दिग्दर्शकाने गांधीजींचं जे तत्त्वज्ञान खुमासदार विनोदाच्या चॉकलेट रॅपरमध्ये गुंडाळून प्रेक्षकांसमोर पेश केलं ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. गांधीजी अनेकांच्या मनात पुन्हा प्रस्थापित झाले. याच सिनेमात वापरलेली 'गांधीगिरी' ही टर्मिनॉलॉजी आजही वापरली जाते. समोरच्याला विद्वेषाने किंवा शक्तीच्या बळावर जिंकून घेण्यापेक्षा त्याला प्रेमाने जिंका असा याचा अर्थ.

'दिल चाहता है' सिनेमा आल्यानंतर मुलांच्या आणि मुलींच्या ग्रुप्सच्या गोवा ट्रिप्स वाढीला लागल्या होत्या. आजपण कुठंही ऑनर किलिंग झालं की 'अजून एक सैराट' अशा अर्थाचे मथळे माध्यमांत बघायला मिळतात. सिनेमाचा भारतीय जनमानसावर त्यांच्या वर्तणुकीवर मोठा प्रभाव होता. यालाच सिनेमाचा पॉप कल्चरवरचा प्रभाव असं म्हणता येईल. पण सिनेमाचा जनमानसावरचा आणि पॉप कल्चरवरचा हा प्रभाव गेल्या काही वर्षात कमी कमी होत चाललाय का? प्रेक्षक सिनेमे बघायला थियेटरमध्ये येत नाहीत किंवा प्रेक्षकांना नवीन सिनेमांबद्दल आणि स्टार्सबद्दल फारसं आकर्षण वाटत नाही, या तत्कालीन धोक्यांपेक्षा बॉलिवूड आणि मराठी सिनेमांचे पॉप कल्चर रेफरन्स रोजच्या आयुष्यात येणं बंद झालंय हा लाँग टर्म धोका सध्या तरी खूप जास्त मोठा वाटतोय. कदाचित याच्या परिणामांची जाणीव पुढच्या काही वर्षात होईल.

अगदी २०१२ पर्यंत सिनेमांचे संदर्भ आपल्या रोजच्या बोलण्यात असायचे. सिनेमा आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीवर, रितीरिवाजांवर फॅशनवर, आपल्या विनोदांवर भरपूर प्रभाव टाकून होता. 'हम आपके है कौन' सिनेमा आल्यानंतर आपल्याकडची लग्नं नेहमीसाठी बदलली. आपल्या लग्नात 'संगीत'सारख्या प्रथा आल्या. लग्नातल्या मराठमोळ्या पदार्थांची जागा पंजाबी आणि लग्नात वाजणारी गाणीपण बदलली. चायनीज पदार्थांनी घेतली, इतकंच काय आपल्या राजकीय नेत्यांच्या भाषणात सिनेमातले संवाद असायचे. मनसेची स्थापना झाल्यावर राज ठाकरेंची जी सभा सगळ्यात गाजली होती त्यात अजित पवार यांना उद्देशून त्यांनी 'सत्या' मधला 'मौका सभी को मिलता है' या डॉयलॉगचा समर्पक वापर करून टाळ्या- शिट्ट्या वसूल केल्या होत्या. देशासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पण रुक्ष आणि रटाळ अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या ओळी किंवा शेरोशायरी वापरून कोरडेपणा भरलेल्या वातावरणात प्रसन्नतेचा शिडकाव करायचे.

पॉप कल्चरमध्ये ध्रुवासारखं अढळ स्थान पटकावून बसलेली काही उदाहरणं म्हणजे म्हणजे 'दिवार' सिनेमातला 'मेरे पास माँ है' सारखा डॉयलॉग, 'शोले'मधले एक से बढ़के एक डॉयलॉग, 'हम', 'दबंग' आणि 'सिंघम'सारख्या सिनेमांनी पोलिसांच्या प्रतिमेत घडवलेला बदल, 'जब वुई मेट'मधल्या करीनाच्या पात्राने मुलींच्या फॅशन सेन्सवर टाकलेला प्रभाव. ही यादी अजून खूप वाढवता येईल, पण गेल्या काही वर्षात सिनेमाचा प्रभाव तितक्या मोठ्या प्रमाणात होत नाहीये. 'रांझना', 'तमाशा', 'सैराट', 'कबीर सिंग'सारखे मोजके अपवाद वगळता सिनेमाचे संदर्भ लोकांच्या वागण्या-बोलण्यात येत नाहीयेत. सिनेमाचा पडद्यापलीकडे जाऊन जो एक प्रभाव असतो तो जवळपास अनुपस्थित होत चाललाय. पहिला पाऊस पडला की लोकांना अजूनही नव्वदच्या दशकातली गाणी आठवतात. सध्याच्या गाण्यांना आणि सिनेमाला हे जमत नाही. आजही 'फादर्स डे' आला की नवीन पिढीला पण 'घातक'मधला सनी देओल, अमरीश पुरीचा ट्रॅक आठवतो. मराठीत दादा कोंडकेंचे सिनेमे, अशी ही बनवाबनवी' आणि 'सैराट'चा असा प्रभाव लोकांवर होता. सध्याच्या सिनेमाचा बहुतांश जनतेशी असणारा संपर्क तुटत चालला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अभिनेत्यांमधून स्टार्स आणि सुपरस्टार्स बनण्याची प्रक्रिया जवळपास बंद पडली आहे.

व्यक्तिकेंद्रित देशात नेहमी स्टार्स हेच पॉप कल्चरचे वाहक असतात; पण सोशल मीडियाने स्टार्सच्या भोवती जे एक गूढ आणि आकर्षक वलय होतं, ते संपवलंय. सिनेमा चित्रपटगृहात बघणं हे प्रचंड महागही झालं आहे. सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे सिनेमा चालला आहे. सध्याच्या राजकीय ध्रुवीकरणाचा आणि राजकारण्यांमुळे घराघरात झालेल्या दुफळीचा परिणाम सिनेमावर होत आहे. सिनेमा लोकांना बिघडवतो अशी समजूत असणारा एक संस्कारी वर्ग होताच, त्यात सिनेमात काम करणारे लोक देशद्रोही आहेत या नवीन नरेटिव्हची भर पडली आहे. चित्रपट क्षेत्राला सतत काही अंतराने वेगवेगळी आव्हाने मिळत गेली. महायुद्ध असो, नैसर्गिक आपत्ती असो, आर्थिक मंदी असो, टेलिव्हिजनचं आगमन असो, इंटरनेटवरून होणारी पायरसी असो, कोरोनाची लाट असो वा आताच ओटीटीने दिलेलं जोरदार आव्हान असो, सिनेमा प्रत्येक वेळी तावून सुलाखून बाहेर पडला आहे. सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात सिनेमाबद्दल असलेलं प्रचंड आकर्षण. हे आकर्षणच कमी होतं चाललं आहे का? याचं उत्तर नकारात्मक असावं आणि सिनेमाचं पॉप कल्चरमध्ये पुनरागमन व्हावं, अशीच चित्रपटरसिकांची इच्छा असावी.

टॅग्स :cinemaसिनेमा