शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
3
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
4
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
5
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
6
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
7
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
8
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
9
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
10
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
11
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
12
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
14
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
15
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
16
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
17
अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
18
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
19
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
20
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्याचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:59 IST

८० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास खरंच गांभीर्याने सुरू आहे का, की राजकीय दबावतंत्राचा तो भाग आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना वारंवार भेडसावत असतो.

८० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास खरंच गांभीर्याने सुरू आहे का, की राजकीय दबावतंत्राचा तो भाग आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना वारंवार भेडसावत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना या घोटाळ्यावरून तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला धारेवर धरायचे. विधिमंडळाच्या याच हिवाळी अधिवेशनात ते या घोटाळ्याचे बैलबंडीभर पुरावेही घेऊन गेले होते. भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागेल आणि खरे गुन्हेगार गजाआड होतील, असा विश्वास सा-यांनाच होता. सुरुवातीच्या काळात या घोटाळ्याच्या कारवाईची दिशा योग्य मार्गानेच होती. पण, नंतर मात्र राजकीय कुरघोडीचा भाग म्हणून सरकारच्या कारवाईकडे बघितले जात आहे. जनमंच या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यामुळे आणि न्यायालयात वेळोवेळी या घोटाळ्याची सुनावणी होत असल्यामुळे सरकारवर काही प्रमाणात अंकुश तरी आहे, अन्यथा आतापर्यंत हा घोटाळा निकालात निघून सर्व आरोपी निर्दोषही सुटले असते. भाजपाशी युती करून शिवसेना राज्यात सत्तेवर आली असली तरी या पक्षाच्या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे फडणवीसांना संकटकाळात राकाँची मदत लागू शकते. त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या राकाँ नेत्यांना दुखवायचे कसे, हाही प्रश्न फडणवीस सरकारपुढे असतो. परवा काँग्रेस-राकाँचा हल्लाबोल मोर्चा विधिमंडळावर धडकल्यानंतर लगेच काही अधिकाºयांवर गुन्हे दाखल झाले. मोर्चात आक्रमक असलेले नेते अचानक बॅकफूटवर गेले. साधारणत: असे विशाल मोर्चे निघाले की त्याची तीव्रता कायम ठेवण्यासाठी आंदोलनकर्ते, नेते अधिक आक्रमक होत असतात. इथे नेमके उलटे झाले. राकाँचे नेते दुसºया दिवसापासून अचानक शांत झाले. त्यांच्या मौनाचे रहस्य सिंचन घोटाळ्याच्या गुन्ह्यात दडलेले तर नाही ना, अशी शंका येते. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा मतितार्थ असा की, सरकारला राजकीय गुन्हेगार पकडायचे नाहीत. अधिका-यांवर कारवाई करून हे प्रकरण थंड करायचे आहे आणि या प्रकरणाचा जमेल तेवढा राजकीय लाभही उठवायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कितीही प्रामाणिक इच्छा असेल पण तरीही ते या घोटाळ्यातील राजकीय नेत्यांवर कारवाई करायला पुढे धजावणार नाहीत. त्यांची ही हतबलता वेळोवेळी दिसून येत असते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस