शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
2
Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
3
T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
4
"मी फक्त म्हातारी नाही, तर तरुण मुलाला..."; 12 वर्षांचं अंतर, मलायकाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
5
Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"
6
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
7
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
8
'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज
9
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
10
कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
11
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
12
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
13
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
14
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
15
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
17
Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!
18
"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य
19
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
20
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा

माणूस रानटी होऊ लागलाय, तो का?

By संदीप आडनाईक | Published: December 30, 2023 7:34 AM

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेला एक संवाद!

मुलाखत : संदीप आडनाईक

ग्रामीण भागात तुमचे वास्तव्य आहे. फारशा सोयी नसलेल्या ठिकाणी गेलेल्या बालपणाचा लिखाणावर परिणाम झाला का?

-अर्थातच. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्या गावात मी शिकलो. चौथीपर्यंतच शाळा होती. गावात कोणाच्याही घराला कधी कुलूप लागलेले पाहिले नाही. कुणाकडे चोरून नेण्यासारखे काहीच नसायचे. मी नववी, दहावीला आल्यानंतरच एसटी पाहिली. पुढचे शिक्षण पन्हाळा हायस्कूलमध्ये झाले. गडाखालून चालत पोहोचावे लागे. जिथे शिकलो त्याच संस्थेच्या कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे येथे शिक्षक म्हणून १९९३-९४ मध्ये नोकरीस लागलो. तिथे मला समृद्ध ग्रंथालय मिळाले आणि आपणही लिहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. वाचन हा लेखकाचा रियाज असतो. लेखकाला स्वतःचे काही सापडण्यासाठी वाचन असावे लागते. देशोदेशीचे वाचायला मिळाले, तेव्हा आपल्याकडेही तसेच काही असल्याचे लक्षात आले आणि मग मी लिहायला लागलो. कादंबरी कशी लिहायची हे कुणीही सांगितले नाही, ती कशी लिहायची याचे तंत्र माहीत नसताना ती लिहिली. त्याबाबतीत मुळातले अज्ञानच फायदेशीर ठरले. जे लिहिले त्याला लोक कादंबरी म्हणायला लागल्यानंतर ती कादंबरी आहे, हे मला समजले; पण यामुळे बेबंद लिहिता आले. कोणाचाही दबाव नव्हता. मी लिहितो स्वत:च्या समाधानासाठी. मला ज्या शब्दांत व्यक्त व्हावे असे वाटले, समोर जे दिसले ते लिहीत गेलो.

आपल्या लिखाणात विविधता आहेच, पण वेगळेपणही आहे; याची जाणीव प्रथम केव्हा झाली? 

कोल्हापूरपासून २० ते २५ किलोमीटवर आमचा गाव. जिल्हा जरी समृद्ध असला तरीही डोंगरकपारीतील गावे मागास होती, आहेत. वाचायला लागल्यावर आपल्याकडे लिहिण्यासारखे काहीतरी आहे, आपण ते योग्य पद्धतीने मांडू शकतो, हे माझ्या लक्षात आले. मी गांभीर्याने केलेले सकस लेखन वाचत होतो.  आपण जे जगतो, ते साहित्यात मुखर करायचे असेल तर या सगळ्या जगण्याकडे गंभीरपणे पाहावे लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी हे विषय हाताळत असताना आपसूकच गंभीर लेखनच घडले असावे. 

‘रिंगाण’ या कादंबरीपूर्वी आपल्या ‘गावठान’,’ रौदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’ अशा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तुमच्या लेखनाचे विषय ग्रामीणच आहेत...

- साहित्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशी विभागणी करू नये, साहित्य हे साहित्यच असते. अभ्यासकांच्या सोयीसाठी ही विभागणी केली असावी, असे मला वाटते. मी शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असल्याने मला या मातीतले कष्टच अधिक भावतात. प्रत्येक गावातल्या, प्रत्येक खेड्यातल्या समस्या वेगळ्या असतात. माझ्या कादंबरीत आलेले विषय, त्याचे अर्थ हे खेड्यातील लोकांनीच माझ्या लक्षात आणून दिले आहेत.

‘रिंगाण’ या कादंबरीबद्दल थोडेसे सांगा? 

-चांदोलीच्या अभयारण्यात खूप फिरलो. तेव्हा जे टिपले, जो अनुभव घेतला, त्याचा वापर योग्यवेळी केला. एक माणूस म्हणाला, या पाळीव म्हशी आता रानटी झाल्यात, ते माझ्या मनात इतके पक्के बसले की हा शब्द वर्तुळासारखा डोक्यात फिरू लागला. हे रानटी होणे याचा शोध घेता आला पाहिजे. मी धरणग्रस्त वसाहतींना भेटी दिल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथे फिरल्यानंतर इथला पाळीव प्राणी जसा रानटी झाला आहे तसा इथला माणूससुद्धा आता रानटी होणार आहे, याची जाणीव झाली. त्यादृष्टीने आता त्याची वाटचाल सुरू आहे. विस्थापनाचा मार्ग फक्त रानटी होण्याइतपत मर्यादित नाही, तर आपण अनेक अंगांनी याचा विचार करू शकतो. काही जण स्वेच्छेने विस्थापन स्वीकारत असतील; पण या कादंबरीतले विस्थापन हे सक्तीने केले गेलेले आहे, त्यामुळे त्यांचे नैसर्गिक जगणे आपल्या व्यवस्थेने संपवून टाकले आहे. या व्यवस्थेमुळे लेखक म्हणून मी अस्वस्थ होतो. या  अस्वस्थपणामुळेच माझ्याकडून ही कादंबरी लिहिली गेली. 

 

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कारsahitya akademiसाहित्य अकादमी