शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

माणूस रानटी होऊ लागलाय, तो का?

By संदीप आडनाईक | Published: December 30, 2023 7:34 AM

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेला एक संवाद!

मुलाखत : संदीप आडनाईक

ग्रामीण भागात तुमचे वास्तव्य आहे. फारशा सोयी नसलेल्या ठिकाणी गेलेल्या बालपणाचा लिखाणावर परिणाम झाला का?

-अर्थातच. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या निकमवाडी या छोट्या गावात मी शिकलो. चौथीपर्यंतच शाळा होती. गावात कोणाच्याही घराला कधी कुलूप लागलेले पाहिले नाही. कुणाकडे चोरून नेण्यासारखे काहीच नसायचे. मी नववी, दहावीला आल्यानंतरच एसटी पाहिली. पुढचे शिक्षण पन्हाळा हायस्कूलमध्ये झाले. गडाखालून चालत पोहोचावे लागे. जिथे शिकलो त्याच संस्थेच्या कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे येथे शिक्षक म्हणून १९९३-९४ मध्ये नोकरीस लागलो. तिथे मला समृद्ध ग्रंथालय मिळाले आणि आपणही लिहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. वाचन हा लेखकाचा रियाज असतो. लेखकाला स्वतःचे काही सापडण्यासाठी वाचन असावे लागते. देशोदेशीचे वाचायला मिळाले, तेव्हा आपल्याकडेही तसेच काही असल्याचे लक्षात आले आणि मग मी लिहायला लागलो. कादंबरी कशी लिहायची हे कुणीही सांगितले नाही, ती कशी लिहायची याचे तंत्र माहीत नसताना ती लिहिली. त्याबाबतीत मुळातले अज्ञानच फायदेशीर ठरले. जे लिहिले त्याला लोक कादंबरी म्हणायला लागल्यानंतर ती कादंबरी आहे, हे मला समजले; पण यामुळे बेबंद लिहिता आले. कोणाचाही दबाव नव्हता. मी लिहितो स्वत:च्या समाधानासाठी. मला ज्या शब्दांत व्यक्त व्हावे असे वाटले, समोर जे दिसले ते लिहीत गेलो.

आपल्या लिखाणात विविधता आहेच, पण वेगळेपणही आहे; याची जाणीव प्रथम केव्हा झाली? 

कोल्हापूरपासून २० ते २५ किलोमीटवर आमचा गाव. जिल्हा जरी समृद्ध असला तरीही डोंगरकपारीतील गावे मागास होती, आहेत. वाचायला लागल्यावर आपल्याकडे लिहिण्यासारखे काहीतरी आहे, आपण ते योग्य पद्धतीने मांडू शकतो, हे माझ्या लक्षात आले. मी गांभीर्याने केलेले सकस लेखन वाचत होतो.  आपण जे जगतो, ते साहित्यात मुखर करायचे असेल तर या सगळ्या जगण्याकडे गंभीरपणे पाहावे लागेल याची जाणीव झाली. त्यामुळे मी हे विषय हाताळत असताना आपसूकच गंभीर लेखनच घडले असावे. 

‘रिंगाण’ या कादंबरीपूर्वी आपल्या ‘गावठान’,’ रौदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’ अशा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तुमच्या लेखनाचे विषय ग्रामीणच आहेत...

- साहित्यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशी विभागणी करू नये, साहित्य हे साहित्यच असते. अभ्यासकांच्या सोयीसाठी ही विभागणी केली असावी, असे मला वाटते. मी शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असल्याने मला या मातीतले कष्टच अधिक भावतात. प्रत्येक गावातल्या, प्रत्येक खेड्यातल्या समस्या वेगळ्या असतात. माझ्या कादंबरीत आलेले विषय, त्याचे अर्थ हे खेड्यातील लोकांनीच माझ्या लक्षात आणून दिले आहेत.

‘रिंगाण’ या कादंबरीबद्दल थोडेसे सांगा? 

-चांदोलीच्या अभयारण्यात खूप फिरलो. तेव्हा जे टिपले, जो अनुभव घेतला, त्याचा वापर योग्यवेळी केला. एक माणूस म्हणाला, या पाळीव म्हशी आता रानटी झाल्यात, ते माझ्या मनात इतके पक्के बसले की हा शब्द वर्तुळासारखा डोक्यात फिरू लागला. हे रानटी होणे याचा शोध घेता आला पाहिजे. मी धरणग्रस्त वसाहतींना भेटी दिल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथे फिरल्यानंतर इथला पाळीव प्राणी जसा रानटी झाला आहे तसा इथला माणूससुद्धा आता रानटी होणार आहे, याची जाणीव झाली. त्यादृष्टीने आता त्याची वाटचाल सुरू आहे. विस्थापनाचा मार्ग फक्त रानटी होण्याइतपत मर्यादित नाही, तर आपण अनेक अंगांनी याचा विचार करू शकतो. काही जण स्वेच्छेने विस्थापन स्वीकारत असतील; पण या कादंबरीतले विस्थापन हे सक्तीने केले गेलेले आहे, त्यामुळे त्यांचे नैसर्गिक जगणे आपल्या व्यवस्थेने संपवून टाकले आहे. या व्यवस्थेमुळे लेखक म्हणून मी अस्वस्थ होतो. या  अस्वस्थपणामुळेच माझ्याकडून ही कादंबरी लिहिली गेली. 

 

टॅग्स :sahitya akademi awardसाहित्य अकादमी पुरस्कारsahitya akademiसाहित्य अकादमी